शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

कल्याण ते शीळफाटादरम्यान बससाठी होणार स्वतंत्र रस्ता

By admin | Updated: May 24, 2017 01:12 IST

पुण्यातील बीआरटीएस प्रकल्पाच्या धर्तीवर कल्याण ते शीळफाटा मार्गावर बससाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचा विचार कल्याण-डोंबिवली पालिका करत आहे.

मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पुण्यातील बीआरटीएस प्रकल्पाच्या धर्तीवर कल्याण ते शीळफाटा मार्गावर बससाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचा विचार कल्याण-डोंबिवली पालिका करत आहे. असा स्वतंत्र मार्ग तयार करणे कितपत शक्य आहे, याचे सर्वेक्षण करण्याची तयारी सीआयआरटीने (सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सफोर्ट) दर्शविली आहे. त्याला ४० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचा प्रस्ताव प्रशासनाने परिवहनला दिला आहे. त्यावर ते काय निर्णय घेतात यानुसारच हा स्वतंत्र मार्ग बांधायचा की नाही, ते ठरणार आहे. कल्याणहून नवी मुंबईला जाताना शीळफाट्यापर्यंतचा प्रवास त्रासदायक होतो. त्या मार्गावर जसजशी बांधकामे होत गेली, तशी तेथील कोंडीही वाढत गेली आहे. या मार्गावर इतर वाहनांपेक्षा सार्वजनिक बस वाहतूकीला चांगला प्रतिसाद आहे. मात्र स्वतंत्र मार्ग नसल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी पुण्याच्या धर्तीवर बीएरटीएस-बस रॅपिड ट्रान्झिट स्किम प्रकल्प तयार करण्याचा कल्याण-डोंबिवली महापालिकेचा प्रस्ताव आहे. हा मार्ग कल्याण ते शीळफाटादरम्यान बससाठी असेल आणि तो स्वतंत्र असेल. त्यामुळे कल्याण ते शीळफाटा हे अंतर लवकर कापता येईल. भिवंडी-कल्याण-शीळ हा २१ किलोमीटरचा मार्ग रस्ते विकास महामंडळाने विकसित केला आहे. त्याचा काही भाग हा कल्याण शहरातून जातो. त्यावर कल्याणचा शिवाजी चौक, पत्रीपूल, सूचकनाका, नेतीवली चौक, मानपाडा, लोढा हेवन येथे नेहमी वाहतूक कोंडी होते. रस्ते विकास महामंडळाने हा रस्ता खाजगी कंत्राटी कंपनीच्या माध्यमातून विकसित केला असला तरी या रस्त्यावर प्रवासी वाहतुकीचा भार सगळ््यात जास्त आहे. या रस्त्यावरूनच उरणच्या, खास करून जवाहरलाल नेहरू बंदराच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक होते. मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक मार्गांना जोडणारा मार्ग म्हणूनही त्याला महत्त्व आहे. दुचाकी, रिक्षा, खाजगी बसेस, खाजगी चारचाकी वाहने, सहा आसनी रिक्षा, खाजगी टॅक्सीसेवा अशी विविध प्रकारची वाहने धावत असल्याने वाहतुकीची गती मंदावते. शिवाय केडीएमसी, नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या बस येथून धावतात. एसटीच्या बसेसने दररोज लाखो प्रवासी नवी मुंबईकडे जातात. विविध माहिती-तंत्रज्ञानाच्या कंपन्या, रासायनिक कारखाने, येथे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी स्वस्त प्रवासाचे वाहन सार्वजनिक बससेवा आहे. पण यासाठी वेगळा मार्ग नाही. तसा तो विकसित केल्यास इतर वाहतुकीतून बससेवा वेगळी होईल आणि स्वतंत्र मार्गिकेमुळे बसच्या गतीत आणि फेऱ्यांतही वाढ होईल, असा अंदाज आहे.अमृतअंतर्गत प्रस्ताव : केंद्र सरकारच्या अमृत विकास योजनेअंतर्गत महापालिकेने पाणीपुरवठा, भुयारी गटार योजनेचे प्रस्ताव तयार करुन ते राज्य व केंद्र सरकारकडे पाठविले. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सुधारणेसाठी अमृत अंतर्गत बीआरटीएस योजना राबविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिली. बस वाढविणे शक्य : कल्याण ते शीळफाटा पर्यंत स्वतंत्र वेगळा मार्ग केवळ सार्वजनिक बस वाहतुकीसाठी विकसित केल्यास या मार्गावर जादा बस चालविणे, वाढविणेही शक्य होईल. बीआरटीएस योजनेला केंद्राकडून निधी मिळतो. केंद्राच्याच प्रकल्पातून पालिका परिवहन ताफ्यात आणखी बस दाखल होणार आहेत. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास कल्याण ते नवी मुंबई मार्गावर अधिक बस चालविणे शक्य होईल. ग्रोथ आणि बिझनेस सेंटरला पूरक कल्याण-शीळ रोडवर कोन गाव ते शीळफाटादरम्यान एलिव्हेटेट रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्यालगतच २७ गावे असून त्यातील १० गावांकरीता एक हजार ८९ कोटींच्या खर्चाचे कल्याण ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे. तेथे एक लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कल्याण- शीळ रोडलगत कोळेगावात सेंट्रल बिझनेस सेंटर उभारले जाणार आहे. कल्याण- डोंबिवली रिंग रोडही ८०० कोटींच्या खर्चाचा आहे.