शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वतंत्र डोंबिवली महापालिका हवी - मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 06:30 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवली शहरातील एकही प्रकल्प समाविष्ट केला नसल्याने डोंबिवली शहराला सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवली शहरातील एकही प्रकल्प समाविष्ट केला नसल्याने डोंबिवली शहराला सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. त्यामुळे स्वतंत्र डोंबिवली महापालिकेची स्थापना करण्याची मागणी मनसेने केली आहे.महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, डोंबिवली शहर साहित्य व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहे. डोंबिवलीच्या विकासाबाबत शिवसेना, भाजपाने कायम अन्याय केला आहे. दोन हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवलीचा एकही प्रकल्प घेण्यात आलेला नाही. डोंबिवलीच्या प्रकल्पाचा समावेश करा, अशी मागणी केल्यावर एमएमआरडीए आयुक्तांनी अशा प्रकारे आता समावेश करता येणार नाही, असे सांगितले. डोंबिवली शहरातून महापालिकेच्या तिजोरीत सगळ्यात जास्त महसूल जमा होतो, असा दावा करून हळबे म्हणाले की, तरीही डोंबिवलीतील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे. फेरीवाल्यांचे प्रश्न सुटलेले नाही. रस्ते अरुंद आहेत. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सक्षम अधिकारी दिला जात नाही. स्मार्ट सिटीत शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेल्या सिटी पार्कचा समावेश करण्यात आला.हा समावेश करण्यात एमएमआरडीएला अडचण आली नाही. मग, डोंबिवलीच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात नेमकी कशी काय अडचण आहे. डोंबिवलीचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात होणार नसल्यास डोंबिवली महापालिकेतून वेगळी करून तिची स्वतंत्र महापालिका स्थापन करावी, अशी मागणी हळबे यांनी केली आहे.२७ गावांचाही समावेश करण्याची सूचना\कल्याण ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी एक हजार ८९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. एमएमआरडीए कार्यक्षेत्रात असलेल्या महापालिकांच्या लगत असलेल्या गावांच्या विकासाचा प्रश्न अधिक बिकट आहे. त्यांना सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डोंबिवली शहर, २७ गावे, नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली १४ गावे व ठाणे महापालिकेतील २२ गावे यांची डोंबिवली महापालिका स्थापन केल्यास भौगोलिकदृष्ट्या एकसंधता येऊ शकते.मनसेचे नेते राजू पाटील यांनी यापूर्वीच अशी मागणी केली होती. मनसेच्या जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभुदेसाई यांनी सांगितले की, २७ गावांना स्वतंत्र पालिका हवी आहे. त्यांना महापालिकेत राहायचे नाही. सरकारने डोंबिवली स्वतंत्र महापालिका स्थापन केल्यास या २७ गावांचे पालकत्व मनसे घेण्यास तयार आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMNSमनसे