शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

स्वतंत्र डोंबिवली महापालिका हवी - मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 06:30 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवली शहरातील एकही प्रकल्प समाविष्ट केला नसल्याने डोंबिवली शहराला सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवली शहरातील एकही प्रकल्प समाविष्ट केला नसल्याने डोंबिवली शहराला सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. त्यामुळे स्वतंत्र डोंबिवली महापालिकेची स्थापना करण्याची मागणी मनसेने केली आहे.महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, डोंबिवली शहर साहित्य व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहे. डोंबिवलीच्या विकासाबाबत शिवसेना, भाजपाने कायम अन्याय केला आहे. दोन हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवलीचा एकही प्रकल्प घेण्यात आलेला नाही. डोंबिवलीच्या प्रकल्पाचा समावेश करा, अशी मागणी केल्यावर एमएमआरडीए आयुक्तांनी अशा प्रकारे आता समावेश करता येणार नाही, असे सांगितले. डोंबिवली शहरातून महापालिकेच्या तिजोरीत सगळ्यात जास्त महसूल जमा होतो, असा दावा करून हळबे म्हणाले की, तरीही डोंबिवलीतील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे. फेरीवाल्यांचे प्रश्न सुटलेले नाही. रस्ते अरुंद आहेत. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सक्षम अधिकारी दिला जात नाही. स्मार्ट सिटीत शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेल्या सिटी पार्कचा समावेश करण्यात आला.हा समावेश करण्यात एमएमआरडीएला अडचण आली नाही. मग, डोंबिवलीच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात नेमकी कशी काय अडचण आहे. डोंबिवलीचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात होणार नसल्यास डोंबिवली महापालिकेतून वेगळी करून तिची स्वतंत्र महापालिका स्थापन करावी, अशी मागणी हळबे यांनी केली आहे.२७ गावांचाही समावेश करण्याची सूचना\कल्याण ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी एक हजार ८९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. एमएमआरडीए कार्यक्षेत्रात असलेल्या महापालिकांच्या लगत असलेल्या गावांच्या विकासाचा प्रश्न अधिक बिकट आहे. त्यांना सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डोंबिवली शहर, २७ गावे, नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली १४ गावे व ठाणे महापालिकेतील २२ गावे यांची डोंबिवली महापालिका स्थापन केल्यास भौगोलिकदृष्ट्या एकसंधता येऊ शकते.मनसेचे नेते राजू पाटील यांनी यापूर्वीच अशी मागणी केली होती. मनसेच्या जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभुदेसाई यांनी सांगितले की, २७ गावांना स्वतंत्र पालिका हवी आहे. त्यांना महापालिकेत राहायचे नाही. सरकारने डोंबिवली स्वतंत्र महापालिका स्थापन केल्यास या २७ गावांचे पालकत्व मनसे घेण्यास तयार आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMNSमनसे