शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून कोकण विभागातील सर्व रिक्षा-टॅक्सी बेमुदत बंद; महासंघाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 17:12 IST

मागील काही दिवसात सी.एन.जी इंधन दरात भरमसाठ वाढ झालेली असून त्यामुळे रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे

ठाणे- वाढत्या सीनएजी दराच्या पार्श्वभूमीवर रिक्षा भाडेवाढ लागू करावी तसेच रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांच्या इतर प्रलंबित न्याय मागण्या सोडविण्याबाबत राज्य सरकार व केंद्र सरकाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून कोकण विभागातील सर्व रिक्षा-टॅक्सी बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

मागील काही दिवसात सी.एन.जी इंधन दरात भरमसाठ वाढ झालेली असून त्यामुळे रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे. प्रवासी वाहतुक क्षेत्रात प्रचंड वाढलेली जिवघेणी स्पर्धा, वाहनांची वाढलेली संख्या अशा विविध कारणास्तव रिक्षा व्यवसाय डबघाईस आलेला आहे. परंतु शासन परिवहन प्रशासन इंधन दरवाढ नियंत्रण, किंवा महागाई निर्देशांकानुसार रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ करण्यास अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. रिक्षा-टॅक्सी चालक मालकांचा सी.एन.जी. दरवाढीच्या बाबतीत प्रचंड असंतोष आहे. मागील दोन वर्षात सी.एन.जी. गॅस दरामध्ये किलो मागे सरारसी 28 रुपये इतकी वाढ झालेली आहे. वारंवार रिक्षा-टॅक्सी भाडे दरवाढ आम्हाला व प्रवाशांना ही परवडणारी नाही. 

वास्तविक सार्वजनिक प्रवासी वाहतुक क्षेत्रातील वाहनांना इंधनावर सबसिडी देणे अत्यावश्यक आहे. किंवा सी.एन.जी. गॅस इंधन दरवाढी वरील अकबारी कर कमी करून रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा देणे गरजेचे आहे. परंतु याकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ऑटो रिक्षा-टॅक्सी प्रलंबित भाडे दरवाढ विनाविलंब लागू करावी या प्रमुख मागणी सह  शासन परिवहन विभागाने ऑटोरिक्षा-टॅक्सी परवाने वाटप तात्काळ बंद करावे किंवा 10 ते 15 वर्षे स्थगिती द्यावी. 

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलनाद्वारे दंड आकारणी (वाहतुक पोलिस विभागामार्फत मोबाईल फोटोद्वारे करण्यात येणारी वसुली) बंद करावी. ऑटोरिक्षा -टॅक्सी व्यावसायिकां करीता महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयी सुविधा पुरवाव्यात. थर्ड पार्टी विमा (इन्शुरन्स) रक्कमेत झालेली भरमाठ वाढ कमी करावी. ऑटोरिक्षा पासिंग, योग्यता प्रमाणपत्र नुतनिकरण करीता होणारा विलंब, समस्या व अडचणी यावर उपाययोजना कराव्यात आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर बेमुदत बंद पुकारण्यात येत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील न्याय मिळत नसल्याने रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांमध्ये शासन, प्रशासन, परिवहन विभाग यांच्या विरोधात प्रचंड संताप व चिड निर्माण झालेली आहे. मागील काळात कोरोना विषाणूचा पार्श्वभुमीवर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण रिक्षा-टॅक्सी व्यवसाय ठप्प झालेला आहे. अडचणीच्या या काळात व्यावसायिकांना सरकारी आर्थिक मदत, सोयीसुविधा, सवलत मिळणे गरजेचे होते. परंतु शासनाने ही बाब गांभिर्याने घेतलेली नाही. कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना शेतकऱ्याप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशी मागणीही करण्यात आली आहे. 

ऑटोरिक्षा-टॅक्सी व्यावसायाशी संबंधित न्याय मागण्या सोडविण्याबाबत शासन परिवहन विभागाने 30 जुलै पर्यंत संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा, विचार, विनिमय करून निर्णय घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने 1 ऑगस्ट 2022 रोजी (31 जुलै 2022 च्या मध्यरात्री पासून) कोकण विभागातील सर्व रिक्षा-टॅक्सी बेमुदत बंद राहतील, यांची कृपया गांभिर्याने नोंद घ्यावी अशी मागणी करून रिक्षा-टॅक्सी चालकाचे संभाव्य आंदोलन चिघळल्यास व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन, परिवहन प्रशासन व संबंधित यंत्रणांची राहिल, अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख विनायक सुर्वे व रविंद्र राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाTaxiटॅक्सीthaneठाणे