शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘बारवी’त वाढीव पाणीसाठा?

By admin | Updated: July 11, 2016 02:00 IST

मुरबाड-अंबरनाथ तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून जिल्हाभर पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवण्याचे काम झालेले असले

पंकज पाटील,  अंबरनाथमुरबाड-अंबरनाथ तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून जिल्हाभर पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवण्याचे काम झालेले असले तरी अद्याप या धरणात अतिरिक्त पाणीसाठा साठवलेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण करून तेथे वाढीव पाणीसाठा साठवण्याची तयारी एमआयडीसीने सुरू केली आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांचे कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण १९७२ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर, १९८६ आणि पुन्हा १९९८ मध्ये या धरणाची उंची वाढवली. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण्याची क्षमता होती. आता नव्याने धरणाची उंची ९ मीटर वाढवल्याने हीच क्षमता दुप्पट झाली असून आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. धरणाच्या उंचीवाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलित दरवाजांचे कामही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, धरणाची उंची वाढल्याने बाधित होणाऱ्या गावांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसनासोबत धरणग्रस्तांना रोजगाराची संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी एमआयडीसी एकटी पूर्ण करू शकत नसल्याने आता या धरणातून ज्या महापालिका आणि नगरपालिकांना पाण्याची गरज भासणार आहे, अशा महापालिका आणि नगरपालिकांनी येथील धरणग्रस्तांना नोकरी देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यासोबत, त्यांच्या ज्या इतर मागण्या आहेत, त्या मान्य करून ती गावे स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण करून येथे वाढीव पाणी साठवण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिकारी उघडपणे बोलत नसले तरी यंदाच्या पावसाळ्यात वाढीव पाणीसाठा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. जिल्ह्याला वाढीव पाणीसाठा देण्यासाठी अद्याप एकाही धरणाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे वाढीव पाण्यासाठी जिल्ह्याला उल्हास नदी आणि बारवी धरणावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. बारवीच्या वाढलेल्या उंचीतून जो धरणात अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होईल, त्यावरच जिल्ह्याची तहान भागेल.