शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘बारवी’त वाढीव पाणीसाठा?

By admin | Updated: July 11, 2016 02:00 IST

मुरबाड-अंबरनाथ तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून जिल्हाभर पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवण्याचे काम झालेले असले

पंकज पाटील,  अंबरनाथमुरबाड-अंबरनाथ तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून जिल्हाभर पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवण्याचे काम झालेले असले तरी अद्याप या धरणात अतिरिक्त पाणीसाठा साठवलेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण करून तेथे वाढीव पाणीसाठा साठवण्याची तयारी एमआयडीसीने सुरू केली आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांचे कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण १९७२ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर, १९८६ आणि पुन्हा १९९८ मध्ये या धरणाची उंची वाढवली. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण्याची क्षमता होती. आता नव्याने धरणाची उंची ९ मीटर वाढवल्याने हीच क्षमता दुप्पट झाली असून आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. धरणाच्या उंचीवाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलित दरवाजांचे कामही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, धरणाची उंची वाढल्याने बाधित होणाऱ्या गावांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसनासोबत धरणग्रस्तांना रोजगाराची संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी एमआयडीसी एकटी पूर्ण करू शकत नसल्याने आता या धरणातून ज्या महापालिका आणि नगरपालिकांना पाण्याची गरज भासणार आहे, अशा महापालिका आणि नगरपालिकांनी येथील धरणग्रस्तांना नोकरी देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यासोबत, त्यांच्या ज्या इतर मागण्या आहेत, त्या मान्य करून ती गावे स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण करून येथे वाढीव पाणी साठवण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिकारी उघडपणे बोलत नसले तरी यंदाच्या पावसाळ्यात वाढीव पाणीसाठा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. जिल्ह्याला वाढीव पाणीसाठा देण्यासाठी अद्याप एकाही धरणाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे वाढीव पाण्यासाठी जिल्ह्याला उल्हास नदी आणि बारवी धरणावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. बारवीच्या वाढलेल्या उंचीतून जो धरणात अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होईल, त्यावरच जिल्ह्याची तहान भागेल.