शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

कोरोनाकाळात वाढली चिंता, असुरक्षिततेची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग एका मोठ्या संकटात लोटले गेले. एकीकडे या आजारापासून ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग एका मोठ्या संकटात लोटले गेले. एकीकडे या आजारापासून बचाव करणे, तर दुसरीकडे आर्थिक विवंचनेतून मार्ग काढणे, अशी दोन मोठी खडतर आव्हाने प्रत्येकापुढे उभी राहिली. मात्र, त्यातून मार्ग काढताना विविध स्तरांवर चिंता, असुरक्षिततेची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेले अनेक जण उपचारांसाठी आल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. त्यामुळे अनेकांचा रोजगार, व्यवसाय गेला. सर्वच व्यवहार ठप्प झाले. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक महिने नागरिकांना घरात बसावे लागले. आजवर अशा बंधनाची सवय कोणालाच नव्हती. त्यामुळे अचानक आलेल्या या संकटांचा परिणाम समाजातील सर्वच स्तरांमध्ये पाहायला मिळाला. सर्वसामान्य नागरिकांना आधी कोरोना होईल का, याची आणि त्यानंतर नोकरी सुरक्षित राहील का? या चिंतेने ग्रासले होते, तर दुसरीकडे आयसोलेशनमुळे एकटेपणाची भावना नागरिकांमध्ये वाढीस लागल्याचे निरीक्षण शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ही उदासीनता येणे ही गंभीर बाब आहे, वास्तविक ही अवस्था यायला नको, त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

डिप्रेशन का वाढले?

- कोरोना का झाला, कसा झाला, याच चिंतेने मुळात आधी नागरिक त्रस्त झाल्याचे लक्षात येत आहे.

- कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. अनेकांचा व्यवसाय बुडाला. रोजगारही गेला, तसेच अनेकांच्या पगारात कपात झाली. त्यामुळे कामाशी निगडित असुरक्षितता वाढली.

- कोरोना झाल्यावर नातेवाईक, समाज काय म्हणेल, वाळीत टाकेल का, याचाही तणाव नागरिकांच्या मनावर असल्याचे दिसून आले.

--------------------

हे टाळण्यासाठी काय कराल?

- सोशल डिस्टन्स पाळायचे असले तरी मेंटल डिस्टन्स ठेवू नका, म्हणजे काय तर मन मोकळे करा.

- कामाचे नियोजन करावे.

- घरातील कामाची विभागणी करणे गरजेचे.

- वर्क फ्रॉम होम करताना घरातील लहान- मोठ्यांना वेळ देण्यासाठी शेड्यूल बनवा.

- नकारात्मक बातम्या बघण्याऐवजी सकारात्मक बातम्या बघा. सोशल मीडियावर ‘डाएट’ ही संकल्पना राबवून मोबाइलवर जेवढेच तेवढेच बघावे.

-----------------

कोट

कोरोना झाला तरी त्याची चिंता करण्यात वेळ घालवू नये. त्यावर उपाय करून स्वतःला सकारात्मक ऊर्जेत ठेवावे. तणावाचे नियोजन करायला हवे. वेळेवर झोपणे, उठणे, योगासने करणे महत्त्वाचे आहे. घरात लहान मुले, वृद्ध यांची सांगड घालावी. त्यामुळे वाद होत नाहीत, त्याचा त्रास होत नाही. भावना दाबू नका, त्या मोकळ्या करा, बोला, व्यक्त व्हा.

-डॉ. विजय चिंचोले, मानसोपचारतज्ज्ञ

------

कोरोना झालेला असल्यावर बरे झाले की, पुन्हा कोरोना होऊ शकतो का? याची चिंता नागरिकांना असते. त्यात औषधांचा परिणाम की काय, हे माहीत नाही; परंतु चिडचिडेपणा, एकटेपणाची भावना वाढीस लागली होती. आर्थिक विवंचनाही अनेकांना सतावत आहे. यामुळे अन्य रोगांना आमंत्रण देण्याची शक्यता असते. त्यासाठी कोणीही लगेच खचून जाऊ नये. वृद्धांना त्यांच्या मित्रांशी बोलणे करून देण्यासाठी व्हिडिओ कॉल लावा, व्हाॅटस्‌ॲपवर फोटो बघू द्या, असे उपक्रम करून मनमोकळे करू द्या.

-मानसोपचारतज्ज्ञ

--------

मुळात कोरोनाकाळात जरी नागरिक परस्पर औषध मागायला आले, तर ते काय मागत आहेत, हे आम्हाला समजत होते. शासन मार्गदर्शनानुसारच आम्ही औषधे दिली, तसेच डॉक्टरांची चिठ्ठी असली तरच औषध दिली गेली. त्यामुळे सरसकट कोणालाही औषधे दिली गेली नाहीत.

-औषध विक्रेता

-----------