शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

वाढवण बंदरविरोधी एकजूट दाखवणार; अनेक गावांत रविवारी पार पडल्या बैठका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 07:03 IST

१५ डिसेंबर रोजी किनारपट्टी बंदचे आवाहन

- हितेन नाईकपालघर : वाढवण बंदराला फक्त वाढवण व आजूबाजूच्या ३-४ गावांचाच विरोध आहे, असे यंत्रणांना भासवून किनारपट्टीवरील इतर गावांत बंदरातील कामांच्या ठेक्यासह अन्य आमिषे देणाऱ्यांना आपल्या एकजुटीची ताकद दाखविण्यासाठी मुंबईच्या कफ परेड ते झाई-बोर्डी दरम्यानची किनारपट्टी सज्ज झाली आहे. मंगळवारी १५ डिसेंबर रोजी किनारपट्टीवरील सर्व गावांनी बंद ठेवून बंदरविरोधी एकजुटीची ताकद शासनाला दाखवून देण्यासाठी अनेक गावांनी रविवारी बैठकांचे आयोजन केले होते.कोणत्याही परिस्थितीत वाढवण बंदर होणारच, अशा अफवा पसरवून वाढवण बंदराविरोधातील वाढत चाललेल्या ताकदीला तोडण्याचे काम काही आपल्यातलेच समाजद्रोही करीत असल्याचा कट आता स्थानिकांच्या लक्षात आला असून लोकशाही मार्गाने एकजुटीचा लढा उभारून हे बंदर कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा विडा उचलण्यात आला आहे. त्याचे एक पाऊल म्हणून १५ डिसेंबर रोजी किनारपट्टी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद यशस्वी व्हावा यासाठी चिंचणी ते झाई, मुरबे ते तारापूर, सातपाटी ते दातीवरे, अर्नाळा ते उत्तन, गोराई-वर्सोवा-कफ परेड अशा भागासाठी टीम बनवून लोकांमध्ये फिरून बंदमधील सहभाग नोंदविण्याबाबत जनजागृती सुरू असल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले.विविध संघटनांचे बळआपल्या एकजुटीची ताकद अभेद्य असल्याचे जगाला दाखवून देण्याची संधी १५ डिसेंबरच्या निमित्ताने मिळालेली असून वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ आदी संघटनांचे बळ मिळणार असल्याचे नॅशनल फिश वर्कर्सचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.‘बंदर गुजरातमध्ये नेऊन दुपटीने विकास साधा’; स्थानिकांमध्ये संताप, संघर्षाचा निर्धारपालघर : गुजरात राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या भाजपच्या केंद्र सरकारने मुंबईतील आयएफएससी केंद्र, पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील प्रशिक्षण केंद्र आदी विकासाला पोषक ठरणाऱ्या बाबी गुजरातमध्ये नेल्या. त्याच धर्तीवर केंद्र सरकारने वाढवण बंदरही गुजरातमध्ये नेऊन आपला दुपटीने विकास साधावा, असे आता स्थानिक ठणकावून सांगू लागले आहेत.‘शेवटपर्यंत संघर्ष करेन, एक वेळ मृत्यू पत्करेन, पण इथल्या वाढवणच्या भूमीवर एक फावडेही मारू देणार नाही,’ असा एल्गार इथल्या तरुण, वृद्ध, महिला, लहान मुलांनी एकत्र येत जाहीर केला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली आमची फसवणूक आता आमच्या लक्षात आली असून पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला हा लढा लढायचा असल्याचे वाढवणविरोधी लढ्यातून तरुणांनी दाखवून दिले आहे. लोकांची एकजूट दिवसेंदिवस वाढत असताना ही ताकद फोडण्याचे काम काही स्थानिक गद्दार पैशासाठी करू पाहत असल्याने अशा गद्दारांना वेळीच ठेचण्यासाठी वाढवणविरोधी तरुण आता पेटून उठला असल्याचे दिसून येत आहे.देशाला अणुऊर्जेमध्ये सशक्त बनविण्याच्या नावाखाली पोफरण-अक्करपट्टीवासीयांच्या घरांवर नांगर फिरवून त्यांना ज्या नरकयातना भोगायला लावल्या ते पाहता आज स्थानिकांना सरकारवर आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींवर फारसा विश्वास राहिलेला नाही. आजही ज्यांच्या घरांवर नांगर फिरवून उभ्या राहिलेल्या ३ आणि ४ अणुऊर्जा प्रकल्पांत साध्या कंत्राट पद्धतीनेही नोकऱ्या स्थानिकांना मिळत नाहीत, त्यांना नोकऱ्या मिळविण्यासाठी झगडावे लागत असून त्यांच्या मतावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांना नोकऱ्या मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. उलट प्रकल्पग्रस्त म्हणून आपल्या हक्काच्या, अधिकाराच्या नोकरीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या स्थानिकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. विश्वास टिकवावा मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर आदींचा आतापर्यंत राजकीय पक्षांनी फक्त व्होट बँक म्हणून वापर केल्याने त्यांचे प्रश्न, समस्या आजही जैसे थे आहेत. मात्र जिल्ह्यातील खासदार आणि सर्व आमदारांनी वाढवण बंदराला विरोध दर्शविल्याने लोकांमध्ये समाधान असून हा विश्वास टिकवून ठेवण्याची लोकप्रतिनिधींपुढे संधी असल्याचे सांगितले जाते.