शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

वाढवण बंदरविरोधी एकजूट दाखवणार; अनेक गावांत रविवारी पार पडल्या बैठका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 07:03 IST

१५ डिसेंबर रोजी किनारपट्टी बंदचे आवाहन

- हितेन नाईकपालघर : वाढवण बंदराला फक्त वाढवण व आजूबाजूच्या ३-४ गावांचाच विरोध आहे, असे यंत्रणांना भासवून किनारपट्टीवरील इतर गावांत बंदरातील कामांच्या ठेक्यासह अन्य आमिषे देणाऱ्यांना आपल्या एकजुटीची ताकद दाखविण्यासाठी मुंबईच्या कफ परेड ते झाई-बोर्डी दरम्यानची किनारपट्टी सज्ज झाली आहे. मंगळवारी १५ डिसेंबर रोजी किनारपट्टीवरील सर्व गावांनी बंद ठेवून बंदरविरोधी एकजुटीची ताकद शासनाला दाखवून देण्यासाठी अनेक गावांनी रविवारी बैठकांचे आयोजन केले होते.कोणत्याही परिस्थितीत वाढवण बंदर होणारच, अशा अफवा पसरवून वाढवण बंदराविरोधातील वाढत चाललेल्या ताकदीला तोडण्याचे काम काही आपल्यातलेच समाजद्रोही करीत असल्याचा कट आता स्थानिकांच्या लक्षात आला असून लोकशाही मार्गाने एकजुटीचा लढा उभारून हे बंदर कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा विडा उचलण्यात आला आहे. त्याचे एक पाऊल म्हणून १५ डिसेंबर रोजी किनारपट्टी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद यशस्वी व्हावा यासाठी चिंचणी ते झाई, मुरबे ते तारापूर, सातपाटी ते दातीवरे, अर्नाळा ते उत्तन, गोराई-वर्सोवा-कफ परेड अशा भागासाठी टीम बनवून लोकांमध्ये फिरून बंदमधील सहभाग नोंदविण्याबाबत जनजागृती सुरू असल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले.विविध संघटनांचे बळआपल्या एकजुटीची ताकद अभेद्य असल्याचे जगाला दाखवून देण्याची संधी १५ डिसेंबरच्या निमित्ताने मिळालेली असून वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ आदी संघटनांचे बळ मिळणार असल्याचे नॅशनल फिश वर्कर्सचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.‘बंदर गुजरातमध्ये नेऊन दुपटीने विकास साधा’; स्थानिकांमध्ये संताप, संघर्षाचा निर्धारपालघर : गुजरात राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या भाजपच्या केंद्र सरकारने मुंबईतील आयएफएससी केंद्र, पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील प्रशिक्षण केंद्र आदी विकासाला पोषक ठरणाऱ्या बाबी गुजरातमध्ये नेल्या. त्याच धर्तीवर केंद्र सरकारने वाढवण बंदरही गुजरातमध्ये नेऊन आपला दुपटीने विकास साधावा, असे आता स्थानिक ठणकावून सांगू लागले आहेत.‘शेवटपर्यंत संघर्ष करेन, एक वेळ मृत्यू पत्करेन, पण इथल्या वाढवणच्या भूमीवर एक फावडेही मारू देणार नाही,’ असा एल्गार इथल्या तरुण, वृद्ध, महिला, लहान मुलांनी एकत्र येत जाहीर केला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली आमची फसवणूक आता आमच्या लक्षात आली असून पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला हा लढा लढायचा असल्याचे वाढवणविरोधी लढ्यातून तरुणांनी दाखवून दिले आहे. लोकांची एकजूट दिवसेंदिवस वाढत असताना ही ताकद फोडण्याचे काम काही स्थानिक गद्दार पैशासाठी करू पाहत असल्याने अशा गद्दारांना वेळीच ठेचण्यासाठी वाढवणविरोधी तरुण आता पेटून उठला असल्याचे दिसून येत आहे.देशाला अणुऊर्जेमध्ये सशक्त बनविण्याच्या नावाखाली पोफरण-अक्करपट्टीवासीयांच्या घरांवर नांगर फिरवून त्यांना ज्या नरकयातना भोगायला लावल्या ते पाहता आज स्थानिकांना सरकारवर आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींवर फारसा विश्वास राहिलेला नाही. आजही ज्यांच्या घरांवर नांगर फिरवून उभ्या राहिलेल्या ३ आणि ४ अणुऊर्जा प्रकल्पांत साध्या कंत्राट पद्धतीनेही नोकऱ्या स्थानिकांना मिळत नाहीत, त्यांना नोकऱ्या मिळविण्यासाठी झगडावे लागत असून त्यांच्या मतावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांना नोकऱ्या मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. उलट प्रकल्पग्रस्त म्हणून आपल्या हक्काच्या, अधिकाराच्या नोकरीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या स्थानिकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. विश्वास टिकवावा मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर आदींचा आतापर्यंत राजकीय पक्षांनी फक्त व्होट बँक म्हणून वापर केल्याने त्यांचे प्रश्न, समस्या आजही जैसे थे आहेत. मात्र जिल्ह्यातील खासदार आणि सर्व आमदारांनी वाढवण बंदराला विरोध दर्शविल्याने लोकांमध्ये समाधान असून हा विश्वास टिकवून ठेवण्याची लोकप्रतिनिधींपुढे संधी असल्याचे सांगितले जाते.