शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

वाचनातून शब्दभांडार वाढवा; चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा जगेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 00:36 IST

अश्विनी शेंडे यांचे मत : मकरोत्सवामध्ये रंगला ‘शब्दांचा कॅफे’

डोंबिवली : गीत लिहिताना सर्वसामान्यांना समजतील, असे सोपे शब्द वापरण्याचा आग्रह धरला जातो. मात्र, मराठी भाषेत मोठे शब्दसामर्थ्य आहे. त्यातील चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. हे शब्दच वापरले नाहीत, तर मराठी भाषा टिकणार कशी? त्यामुळे हे शब्द वापरले पाहिजेत. मराठी भाषा जगली तरच मराठी शाळा तग धरतील, असे मत सुप्रसिद्ध गीतकार व लेखिका अश्विनी शेंडे यांनी व्यक्त केले.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी झालेल्या मकरोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘शब्दांचा कॅफे’मध्ये शेंडे बोलत होत्या. यंदाचे महोत्सवाचे दुसरे वर्ष होते. टिळकनगर शाळेच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडला. अनेक मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटांची शीर्षकगीते, पथकथा व संवाद लिखाण करणाऱ्या अश्विनी शेंडे यांच्याशी अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी संवाद साधला. यावेळी मालिकांची शीर्षकगीते आणि गाणी जयदीप बगवाडकर आणि योगिता गोडबोले यांनी सादर केली. संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.शेंडे म्हणाल्या की, प्रेक्षकांच्या मनाला साधेपणा जास्त भावतो. पण, सारखे साधे लिहिले तर चांगले मराठी शब्द कसे कळणार? सतत सोपे लिहून आपणच आपल्या भाषेचा दर्जा कमी करत आहोत. ‘लोकमत सखी मंच’च्या एका कार्यक्रमात एक बाई आपल्या मुलीला घेऊन आली. त्यांनी तुमच्या गीतातील काही शब्द कठीण वाटतात, असे सांगितले. त्यांनी ‘कवडसा’ या शब्दाचा अर्थ कवड्या असा लावला. मग, त्या मुलीला आणि तिच्या आईला कवडसाचा अर्थ समजून सांगितला. हा शब्द वापरला नसता तर त्यांना समजला नसता. नवीन पिढीला ते शब्द समजावेत, यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. मालिकेचे शीर्षकगीत लिहिताना त्यात त्या शीर्षकाचा शब्द असावा, असा आग्रह असतो. त्यामागे प्रेक्षकांना कोणती मालिका सुरू आहे, हे कळावे, हा उद्देश असतो. वेगळ्या विषयांवरील मालिकांची शीर्षकगीते लिहिण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या क्षेत्रात मी गुलजार यांना आपला गुरू मानते, असेही त्यांनी सांगितले. ते जुन्या कल्पना नवीन स्वरूपात मांडतात. त्यामुळे त्यांचे गीत किंवा कविता मनाला भिडते. केवळ रोमॅण्टिक गाणी लिहितो, असा शिक्का बसू नये, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लिखाण करण्याचा प्रयत्न केला. त्यात पंढरीची वारी आणि विशेष मुलांची वारी या दोन्हींचा वापर केलेले ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो’ हे गीत तयार केले, असे त्यांनी सांगितले.

गुलजार यांच्या गीतांवर आधारित नवीन कार्यक्रम घेऊन येत असल्याचे बगवाडकर यांनी सांगितले. त्यानंतर, त्याची झलक ही गायकांनी दाखवली. ‘मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना’ आणि ‘आप की आँखों में कुछ महके हुए से राज है’ ही दोन गाणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

टॅग्स :marathiमराठी