शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ७२ तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमतेत हाेणार वाढ

By सुरेश लोखंडे | Updated: May 27, 2023 16:42 IST

पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच पशूंसाठी सातत्याने पाण्याची गरज असते.

ठाणे : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत होणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीसाठी प्रचार रथ जिल्हा दाैर्यावर जात आहे. या रथाला अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांनी हिरवा झेंडा दाखवून या प्रचार यात्रेचा शुभारंभ केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्य प्रांगणात हा प्रचार यात्रा शुभारंभ साेहळा पार पडला. यावेळी विभागीय वन अधिकारी कांचन पवार, उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण, तहसिलदार राजाराम तवटे, ठाणे जिल्हा परिषदचे जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार, वसुंधरा संजीवनी मंडळ संस्थापक आनंदजी भागवत आदी उपस्थित होते. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत पहिल्या टप्यात ठाणे जिल्हयातील कल्याण,अंबरनाथ,मुरबाड,शहापूर भिवंडी या तालुक्यातील ७२ तलावातील गाळ काढण्यात येत आहे.

पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच पशूंसाठी सातत्याने पाण्याची गरज असते. हवामानामध्ये तीव्र गतीने बदल होत चालले आहेत. पाऊस पडणे बेभरवशाचे झाले आहे. या संकटाला सामोरे जायचे असेल, तर प्रत्येक गावाने पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यास अनुसरून प्रत्येक गाव, तालुक्यामध्ये पाणी साठविण्यासाठी विहिरी, गाव तलाव, पाझर तलाव तसेच लहान-मोठे तलाव व धरणे आणि तलावांमधील गाळ काढून पाणी साठविण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे.

'जलयुक्त शिवार, 'जल जीवन मिशन या योजनांच्या माध्यमातून कामे सहजरीतीने करता येऊ शकतात. यासाठी ग्रामपंचायतींना व पाणी समित्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन सक्षम केल्यास, आपल्या परिसरातील सर्व तलावांचा गाळ प्रशासनाच्या माध्यमाने काढला जाऊ शकतो व निगा राखण्याचे कायमस्वरूपाचे काम केले जाऊ शकते. ज्या ग्रामपंचायती आपले गाव 'जल-आत्मनिर्भर' करण्यासाठीची ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतील, अशा ग्रामपंचायतीकडून https://bjsindia.org/mwsd किंवा https://gf3f4aec40f890c-appprod.adb.ap-mumbai-1.oraclecloudapps.com/ords/r/mission100/mission100/login मागणी अर्ज मागविण्यात येत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी