शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५०१३ रुग्णांची वाढ; ४२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 21:38 IST

ठाणे शहरात एक हजार ५९३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख सहा हजार ३२४ झाली आहे. या शहरात पाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ५५२ नोंद झाली.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार १३ रुग्ण रविवारी आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्येत एक आठवड्यापासून एक हजार पेक्षा अधिक रुग्णांची घट झाली आहे. मात्र मृतांची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली. आजही जिल्ह्यात ४२ जणांचे निधन झाले आहे. जिल्ह्यात आता चार लाख १६ हजार ३८१ रुग्णांसह मृतांची संख्या सहा हजार ९४२ नोंदली आहे.

ठाणे शहरात एक हजार ५९३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख सहा हजार ३२४ झाली आहे. या शहरात पाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ५५२ नोंद झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार ४७५ रुग्णांची वाढ झाली असून पाच मृत्यू झाले आहेत. आता एक लाख सहा हजार ३३ बाधितांसह  एक हजार ३२२ मृत्यूची नोंंद करण्यात आली आहे. 

उल्हासनगरमध्ये १८० रुग्ण सापडले असून चार मृत्यू आहेत. येथील बाधितांची संख्या १७ हजार २७० झाली. तर, ३९८ मृतांची नोंद आहे. भिवंडीला ७१ बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत नऊ हजार १९० असून मृतांची संख्या ३७७ आहे. मीरा भाईंदरमध्ये ३३७ रुग्ण आढळले असून ११ मृत्यू झाले आहे. या शहरात बाधितांची संख्या ३७ हजार ५८१ असून मृतांची संख्या ९१६ आहे.

अंबरनाथमध्ये १२२ रुग्ण आढळले असून तीन मृत्यू झाले. येथे बाधीत १५ हजार २८२ असून मृत्यू ३४२ झाले आहेत. बदलापूरमध्ये २२७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १६ हजार २५२ झाले आहेत. या शहरातही तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या १३३ नोंद आहे. ग्रामीणमध्ये १८७ रुग्णांची वाढ असून तीन मृत्यू झाले. तर बाधीत २३ हजार ४०९ असून आतापर्यंत ६३४ मृत्यू नोंदले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या