शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची लगीनघाई! कसारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोबदल्याची अजूनही पंचाईत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:56 IST

असंख्य शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनींचा मोबदला अजूनही प्रलंबित असल्याने या उदघाट्नाला महाराष्ट्र दिनी मोठा विरोध होणार आहे.

कसारा, शाम धुमाळ |

येत्या १ मे महाराष्ट्र दिनी नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गचा अखेरचा टप्पा इगतपुरी ते भिवंडी हा ७५ किमी अंतराचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रगतीपथावर सुरु असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तारीख व वेळ देखील मिळाली असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. रस्ता खुला करण्याची घाई जरी महामंडळ करत असले तरी शहापूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनींचा मोबदला अजूनही प्रलंबित असल्याने या उदघाट्नाला महाराष्ट्र दिनी मोठा विरोध होणार आहे.

इगतपुरी ते भिवंडी या ७५ किलोमीटर कामाला सर्वात जास्त कालावधी लागला आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गची घोषणा झाल्यापासून जमिनीच्या खरेदी - विक्रीला विरोध करत जनआंदोलन उभे केले होते. वाढत्या विरोधाला शांत करण्यासाठी त्यावेळेचे पालकमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात समृद्धी महामार्गाच्या जमिनीचे पैसे जमा होतं नाही तोपर्यंत सब रजिस्टर कार्यालयातच अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसोबत थांबवण्याचा फंडा वापरत तालुक्यातील जनतेला शासनाबाबत जागरूक करत जमिनी खरेदी - विक्रीला चालना दिली होती. मात्र तदनंतर जमिनी खरेदी - विक्रीचा सावळागोंधळ पाहवयास मिळाला व याचा सर्वात मोठा फटका तालुक्यातील आदिवासी, कातकरी, दलित समाजातील शेतकऱ्यांना बसला तर काही व्यापाऱ्यांना देखील यांचा फटका बसला.

नावाला तालुका पेसा, मात्र आदिवासी मोबदल्यापासून अलिप्त 

शहापूर तालुका हा पेसामध्ये मोडत असल्याने तालुक्यातील बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. त्यातच येथे येणारे अधिकारी, कर्मचारी हे देखील आदिवासी समाजाचे आहेत. असे असताना देखील नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गत अनेक आदिवासी कुटुंबाच्या शेतजमिनी बाधित झालेल्या आहेत त्यातील अनेक कुटुंबाना अजूनही मोबदला मिळाला नाही, विशेष म्हणजे तालुक्यातील भूमिहीन आदिवासी कुटुंबाच्या कल्याणासाठी व आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी शासनाने त्यांना जमिनी दिलेल्या आहेत. त्यांचे वनहक्क दावे मंजूर होऊन वनपट्टे देखील जाहीर झालेले आहे. असे असताना देखील मागील सात वर्षांपासून या आदिवासी कुटुंबांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी शासनाचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. तालुक्यातील वाशाळा, फुगाळे, कसारा बु, शेलवली या गावातील बाधित ग्रामस्थांचे वनहक्क दावे मंजूर असून त्यातील काही शेतकऱ्यांकडे सनद देखील आहेत तरीसुद्धा हक्काच्या मोबदल्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे. यांचसोबत अनेक व्यापारी व शेतकऱ्यांच्या वादातील प्रकरणांचा आर्थिक मोबदला भूसंपादन अधिकारी यांनी न्यायालयात जमा केल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिले आहेत. गुरुवारी सकाळपासून फुगाळे व वाशाळा गावातील समृद्धी बाधित आदिवासी शेतकऱ्यांनी फुगाळा बोगदा येथे ठिय्या आंदोलन सूरु केले असून जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.

शासनाकडून आमची घोर फसवणूक होत असल्याने आम्ही  गुरुवार पासून फुगाळे वाशाळा येथील सर्व शेतकरी कुटुंब वाशाळा बोगद्या जवळ या आंदोलनाला बसलो असून जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही - एकनाथ भला, फुगाळे शेतकरी.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार