शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

By सुरेश लोखंडे | Updated: November 25, 2023 17:46 IST

आजपासून सुरू झालेल्या या माेहिमेला ४३१ ग्राम पंचायतींपैकी चार ग्राम पंचायतींनी प्रारंभ केला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येथील जिल्हा परिषद अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ गांवखेड्यांच्या ग्राम पंचायतींमध्ये आजपासून सुरू झाला आहे. यास अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात लाभला आहे. आजपासून सुरू झालेल्या या माेहिमेला ४३१ ग्राम पंचायतींपैकी चार ग्राम पंचायतींनी प्रारंभ केला आहे.

भिवंडी तालुक्यातील अस्नोली ग्रामपंचायत क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथील विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, इतर शासकीय विभागांचे अधिकारी, शासकीय लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील कार्यक्रमाचे गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी केले. संकल्प यात्रेच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी हाेउन गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन ठाेंबरे यांनी ग्रामस्थांना यावेळी केले.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्याच्या उद्देशाने ही "विकसित भारत संकल्प यात्रा" आजपासून २४ जानेवारपर्यंत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या ४ डिजिटल स्क्रीन असलेल्या व्हॅन सज्ज करण्यात आल्या आहेत. त्या जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती क्षेत्रात जनजागृती करणार आहेत. त्यापैकी भिवंडी,तालुक्यातील अस्नोलीसह शहापूरच्या बारेशती ग्रामपंचायत, अंबरनाथच्या पोसरी, कल्याणच्या जांभूळ आदी चार ठिकाणी आज सकाळच्या सत्रात या यात्रेचा शुभारंभ झाला.

टॅग्स :thaneठाणे