शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात शिंदे गट 'अब तक छप्पन'; ठाकरे गट पिछाडीवर, पण 'कांटे की टक्कर' 

By सुरेश लोखंडे | Updated: October 17, 2022 19:53 IST

ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये चुरस झाली. 

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या. शिवसेनेच्या दोन्ही गटांमुळे यात कमालीची भर पडली. यात बाळासाहेबांची शिवसेनेला (शिंदे गट) ५६ जागा तर शिवसेनेला (ठाकरे गट) ४४ ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला. याशिवाय महाविकास आघाडीला २५ आणि भाजपाला १९ तर इतरांनी नऊ जागांवर विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील १५८ ग्राम पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली असता त्यात १८ बिनविरोध विजयी झाल्या. तर बहिष्कार असल्यामुळे नवी मुंबईच्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या नाही. उर्वरित १३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार झाल्या असता त्याची मतमोजणी आज पार पडली. या ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यातील ४५९ मतदान केंद्रांवर ७९.५४ टक्के मतदान झाले असता त्याची आज मतमोजणी झाली. जिल्ह्याभरातील ११९ सरपंच पदासाठी व ८५५ सदस्यांसाठी एक लाख ९० हजार  ६४७ जणांनी मतदान करून आपला उमेदवार विजयी केला. यासाठी जिल्ह्यात तीन हजार १५५ उमेदवार होते.

मतदान होऊन विजयी झालेल्या व बिनविरोध निवड झालेल्या आदी १५३ ग्राम पंचायतींवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कमी अधीक दावा केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे ठाणे ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी ५६ ग्राम पंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला. यामध्ये त्यांनी शहापूरला २९ तर मुरबाडला १५ आणि भिवंडीला श्रमजीवीला सोबत घेऊन १३ जागांवर विजय मिळवल्याचे पाटील यांनी सांगितले. याप्रमाणेच  भिवंडी, शहापूरला शिवसेनेच्या ठाकरे गटाला ४४ लागा मिळवता आल्याचे दिसून येत आहे. तर मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथच्या एका ग्राम पंचायतीसह भाजपाला १९ जागा मिळाल्याचा आंदाज आहे. याविषयी भाजपाचे आमदार संजय केळकर यांना विचारणा केली निकालाची आकडेवारी पूर्णपणे हाती आली नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. महाविकास आघाडीला २५ ग्राम पंचायती मिळाल्या असून यामध्ये शहापूर आणि कल्याण येथील ग्राम पंचायतीचा समावेश आहे. भिवंडीत मनसेला दोन जागा मिळाल्याचे आढळून आले. उर्वरित नऊ ग्राम पंचायतींवर इतरांचे वर्चस्व असल्याचे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेgram panchayatग्राम पंचायत