शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मंत्री एकनाथ शिंदेंचं मौन, शिवसैनिकांचं लक्ष; ठाण्यातील शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:13 IST

ठाण्यात शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करणे याचा अर्थ राष्ट्रवादीला बळ प्राप्त करून देणे हाच आहे. भविष्यात ते शिवसेनेला मारक ठरू शकते, असे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

ठाणे : शिवसेना-भाजप यांच्यातील युती ही नैसर्गिक असल्याने टिकणारी आहे, या महापौर नरेश म्हस्के यांच्या वक्तव्याची ठाण्यातील शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी जोरदार चर्चा सुरू होती. सोशल मीडिया व ठाण्यातील कट्ट्यांवर सध्या एकमेकांच्या उरावर बसलेले हे पक्ष पुन्हा एकत्र येणार का, याच गप्पागोष्टी सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा भाजप केव्हाही बरी, अशी भावना शिवसेनेच्या काही जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मात्र भाजपमधील मंडळी युतीबाबत सध्या अधिक सावधपणे बोलत आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिका निवडणुकीत आघाडी करायचीच नाही. परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे आम्ही एकत्र लढण्यास तयार होतो; पण स्थानिकांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही, असे दाखवायचे आहे, असे बोलले जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे याबाबत कधी मौन सोडतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे.

शेवटच्या महासभेत महापौर म्हस्के यांनी शिवसेना, भाजपच्या युतीबाबत भाष्य केल्याने त्याचे स्वागत काही शिवसैनिकांनी केले. राज्यात महाविकास आघाडी असली तरी ठाण्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच प्रतिस्पर्धी राहिले आहेत. भाजपची ताकद ठाण्यात मर्यादित आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करणे याचा अर्थ राष्ट्रवादीला बळ प्राप्त करून देणे हाच आहे. भविष्यात ते शिवसेनेला मारक ठरू शकते, असे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे. दोन महिन्यांपासून या दोन्ही पक्षांत श्रेयाचे राजकारण सुरू आहे. प्रभाग रचनेवरूनदेखील वाद आहेत. त्यामुळे म्हस्के यांनी शिवसैनिकांची नस बरोबर पकडली आहे, असे शिवसेनेतील काही ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक शिवसैनिकांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी हवी असल्याने यावर नावानिशी प्रतिक्रिया द्यायला ते तयार नाहीत. शिवाय ईडी, सीबीआयच्या कारवाया सेना नेत्यांवर सुरू असल्याने भाजपसोबत युतीचे समर्थन करण्यात त्यांना जोखीम वाटते. एकनाथ शिंदे यांनी भूमिका जाहीर केल्यावर बोलू, असे शिवसैनिक सांगतात.

भाजपचे नेते याबाबत बोलायला तयार नाहीत. आम्ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत दोन हात करून पुन्हा राज्यात सत्तेवर येऊ व वेगवेगळ्या शहरांमध्ये सत्ता प्राप्त करू. त्यामुळे म्हस्के यांचे वक्तव्य हे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे, असे नेत्यांचे मत आहे. पण, जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांच्या वक्तव्याचे खासगीत स्वागत केले. शिवसेना व राष्ट्रवादीसोबत संघर्ष करून स्वबळावर सत्ता आणणे हे स्वप्न असू शकते. परंतु वास्तवात या दोन्हीपैकी एका पक्षासोबत सत्ता येऊ शकते. दोन्ही पक्षांना आपण दुष्मन बनवले तर सत्तेपासून दूर जाण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र होऊ शकतो. त्यामुळे म्हस्के हे चुकीचे बोलले नाहीत, असे भाजपच्या या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे