शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मीरा भाईंदरमध्ये फटाक्याच्या आगीत घरासह नोटांचे बंडल जळाले; २५ पेक्षा जास्त ठिकाणी आगीच्या घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 20:07 IST

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारच्या रात्री फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या मोठ्या घटना घडल्या आहेत.

मीरारोड - फटाक्यांमुळे मीरा भाईंदरमध्ये आग लागण्याच्या सुमारे २५ पेक्षा जास्त घटना घडल्या असून एका घटनेत तर घरातील सामानासह दोन लाखांचे नोटांचे बंडल जाळून खाक झाले आहे. तर शहरात मध्यरात्री २ ते अडीज वाजेपर्यंत फटाके बेकायदा फोडले जात होते. सर्वत्र फटाक्यांचा घातक धूर पसरला होता तर आवाजाने लोकांच्या कानठळ्या बसल्या. 

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारच्या रात्री फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. नया नगरमधील अस्मिता रिजन्सीमध्ये फिरोज शेख यांच्या घरात पेटते रॉकेट रात्री १०.२० च्या सुमारास शिरून घराला आग लागली. त्यावेळी घरात कोणी नव्हते. आगीत घरातील सामान जाळून खाक झाले. कपाटातील रोख ठेवलेले २ लाखांचे बंडल सुद्धा जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागल्याचे कळताच घटना स्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी शेख कुटुंबियांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. आगीमुळे इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.  

शहरातील विविध २३ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. फटाक्यांमुळे आगी लागत असल्याने ६ अग्निशमन केंद्रांसह आणखी ६ ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने व जवान तैनात केले आहेत असे अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले. या शिवाय शहरातील गोडदेव नाका येथे एका गळ्यात मोठी आग लागली. गीता नगरच्या गीता पुष्प इमारतीत राहणारे आशिष शेट्टी यांच्या घरात सुद्धा भीषण आग लागली. आगीत सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले असून घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपाट, पलंग, कपडे, वायरिंग आदी जाळून गेली. फटाक्यांमुळे आगी लागून होणारे नुकसान आणि जीवाला धोका पाहता लोकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. 

शहरात फटाक्यांमुळे प्रचंड घातक असे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण झाले आहे. फटाक्यांच्या घातक धुराचे आवरण सर्वत्र पसरल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचे सांगण्यात आले. रुग्णालय, शांतता झो परिसरात सुद्धा सर्वत्र फटाके फोडले गेले. पहाटे २ ते अडीच वाजेपर्यंत शहरात फटाके फुटत होते. फटाक्यांच्या आवाजाने कानठळ्या बसल्याचा संताप लोकांनी व्यक्त केला. ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषणाच्या वाढत्या घटनांनी पोलीस आणि पालिकेने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोडfireआग