शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भिवंडीत वेठबिगार मजूर शासकीय दाखल्यांपासून वंचित; तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन

By नितीन पंडित | Updated: July 1, 2024 19:45 IST

आंदोलनकर्त्या महिलेने हाती राजदंड घेऊन होत असलेल्या अन्यायाविरोधात व्यक्त केला निषेध

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: वीटभट्टी वर तुटपुंज्या मजुरीवर वर्षोंनवर्षे राबवून घेतल्या जाणाऱ्या आदिवासी वेठबिगार यांच्या मुक्ती नंतर त्यांना शासकीय दाखले व प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याने चाळीस वर्षांपूर्वी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून वेठबिगार मुक्त झालेल्या ताईबाई गायकर या महिलेने भिवंडी तहसीलदार कार्यालया बाहेर हाती राजदंड धरून या घटनेचा निषेध केला असून जोपर्यंत दाखला मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.

श्रमजीवी संघटनेच्या प्रयत्नातून सुनील भोये वय १८ वर्ष या वेठबिगार मजुरास भिवंडी तालुक्यातून मुक्त करण्यात आले होते.त्यास सहा महिने उलटून गेले तरी सुध्दा सुनील भोये यास आधारकार्ड बनवून देण्यात आला नाही.ज्यामुळे त्याचे बँक खाते उघडण्यास अडचण येत असल्याने वेठबिगार मुक्ती पुनर्वसन निधीचा लाभ मिळण्यात पासून तो वंचित राहिला आहे.

वेठबिगार मुक्ती नंतर हाताला काम नसल्याने व शासकीय दाखले मिळत नसल्याने सुनील भोये यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सुनील भोये यास न्याय मिळवून देण्यासाठी ४० वर्षां पूर्वी वेठबिगार मुक्त झालेल्या ताईबाई गायकर यांनी पुढाकार घेतला आहे.त्यांनी सोमवारी भिवंडी तहसीलदार कार्यालय गाठत तहसीलदार अभिजित खोले हे कार्यालयात नसल्याने कार्यालया बाहेर हाती राजदंड धरून आंदोलन केले.सुनील भोये यास न्याय मिळे पर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी भावना ताईबाई गायकर यांनी बोलून दाखवली आहे.

वेठबिगार मुक्ती नंतर संबंधित मुक्त झालेल्या मजुरास तात्काळ बंध मुक्तीचा दाखल दिला जातो. सुनील भोये यांना जॉब कार्ड सुध्दा बनवून देण्यात आले आहे.परंतु वास्तव्याचा पुरावा नसल्याने आधारा कार्ड बनविण्यात अडचण येत आहे. त्याबाबत तात्काळ कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया निवासी तहसीलदार विशाल इंदुलकर यांनी दिली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी