शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेतील गुणांकन सुधारूनही भिवंडीकरांमध्ये मात्र नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:27 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८-१९ मध्ये भिवंडी महापालिकेचा देशात ८४ वा, तर राज्यात २३ वा क्रमांक आला आहे. दोन वर्षांपूर्वी देशात शहराचा क्रमांक ३९२ वा, तर मागील वर्षी ९८ वा क्रमांक होता. स्वच्छतेवर भर दिल्यानेच १४ गुणांची आघाडी मिळाली आहे.

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीस्वच्छ सर्वेक्षण २०१८-१९ मध्ये भिवंडी महापालिकेचा देशात ८४ वा, तर राज्यात २३ वा क्रमांक आला आहे. दोन वर्षांपूर्वी देशात शहराचा क्रमांक ३९२ वा, तर मागील वर्षी ९८ वा क्रमांक होता. स्वच्छतेवर भर दिल्यानेच १४ गुणांची आघाडी मिळाली आहे. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केवळ रस्त्यावरील साफसफाई केली जाते. उर्वरित इतर सर्व कामे कंत्राटदारांकडून करवून घेतली जातात. स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने या कंत्राटदारांमध्ये वाढ केली होती. मात्र, तेव्हापेक्षा आता जनजागृतीची मोहीम थंडावली आहे.मागील सर्वेक्षणात तत्कालीन आयुक्त योगेश म्हसे यांनी शाळेच्या मुलांना संदेश लिहिण्यास प्रवृत्त करून त्यांचा सत्कार केला. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश आपोआप नवीन पिढीपर्यंत पोहोचला. परंतु, जेथे मुलांनी आकर्षक चित्रे काढली होती, तेथेच यंदा कंत्राटदारांमार्फत रंगरंगोटी करून नवीन चित्रे काढण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गावर चित्रे काढण्यापेक्षा पालिकेच्या, शाळेच्या व इतर संस्थेच्या भिंतीवर ही चित्रे काढून संदेश दिला असता, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रभावीपणे जागृती झाली असती.स्वच्छतेची शिस्त लागावी, यासाठी पालिकेने मागील वर्षी कचराडबे नागरिकांना वाटले. मात्र, सध्या अर्धेअधिक डबे गायब झाले आहेत. किती डबे शिल्लक आहेत व त्यांची स्थिती काय, याची माहितीच आरोग्य विभागाला नाही. तर, जेथे डबे आहेत, तेथील कचरा दुपारपर्यंतही उचलला जात नाही. महापालिकेने भित्तीपत्रके लावून, हॅण्डबिले वाटून, ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले. मात्र, वर्गीकरण केलेला कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्या वा कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी कार्यालयांत बसून मिळवलेले गुणांकन भविष्यात घसरण्यास वेळ लागणार नाही, हे तेवढेच खरे.चालू वर्षात चाविंद्रा येथील डम्पिंगवर दोन व टेमघरमध्ये एक असे तीन बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याची घोषणा महापालिकेने केली आहे. परंतु, सध्या रामनगर, चाविंद्रा येथे प्रस्तावित असलेल्या डम्पिंग जागा उद्यानासाठी आरक्षित आहे. डम्पिंगला नागरिकांचा विरोध असल्याने अनेकवेळा विविध संघटना व राजकीय पक्षांनी आंदोलने केली आहेत. बायोगॅस प्रकल्प महापालिका राबवणार असली, तरी हा परिसर दाटीवाटीचा आहे. त्यामुळे प्रकल्प राबवल्यास त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहेत.शहरात सुमारे सात लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग आहेत. त्यातील कचरा हा रस्त्यावर पडलेला असतो अथवा गटारे, नाल्यातून वाहतो. त्यामुळे गटारे तुंबून त्यातील पाणी रस्त्यावरून वाहते. परंतु, घंटागाड्या यंत्रमाग कारखान्यांमधील कचरा गोळा करत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली पाठ थोपटताना आपण शहरातील नागरिकांना खरोखर न्याय दिला आहे काय, याचे चिंतन करावे.शहरातील गटारे, नाले, कचराकुंड्यांची सफाई नियमित होत नाही. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली कीटकनाशके, जंतुनाशके व पावडरची फवारणी नियमितपणे केली जात नाही. त्यामुळे या जंतुनाशकांचे काय होते, हा प्रश्न नेहमीच पडतो.शहराला फायदा झाला का?शहरात भुयारी गटाराच्या दुसºया टप्प्याचे काम सुरू आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील योजनेचा नागरिक तसेच शहराला फायदा झाला का, हेच समजू शकलेले नाही. त्यामुळे योजना यशस्वी झाली का, याचा निष्कर्ष काढता आलेला नाही. त्यामुळे हे काम नागरी हितासाठी की कंत्राटदारांसाठी, असा सवाल केला जात आहे.पण सुविधाच पोहोचत नाहीशहरातील समस्या नागरिकांच्या सहकार्याशिवाय सुटणार नाहीत. त्यासाठी योग्य जनजागृती केली, तर ते सहकार्यही करतील. परंतु, त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचत नाहीत. त्यामुळे संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी कमी पडत आहेत, हे स्पष्ट होते.च्गतिमान स्वच्छतेकडे जाणारे शहर म्हणून भिवंडी महापालिकेला केंद्राकडून मागील वर्षी बक्षीस मिळाले.च्महापालिका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून शहराचे रूपडे प्रथम पालटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.च्परंतु, नियमित स्वच्छता राहावी, यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच या विभागातील भ्रष्टाचारही बाहेर येत आहे.

टॅग्स :thaneठाणे