शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेतील गुणांकन सुधारूनही भिवंडीकरांमध्ये मात्र नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:27 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८-१९ मध्ये भिवंडी महापालिकेचा देशात ८४ वा, तर राज्यात २३ वा क्रमांक आला आहे. दोन वर्षांपूर्वी देशात शहराचा क्रमांक ३९२ वा, तर मागील वर्षी ९८ वा क्रमांक होता. स्वच्छतेवर भर दिल्यानेच १४ गुणांची आघाडी मिळाली आहे.

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीस्वच्छ सर्वेक्षण २०१८-१९ मध्ये भिवंडी महापालिकेचा देशात ८४ वा, तर राज्यात २३ वा क्रमांक आला आहे. दोन वर्षांपूर्वी देशात शहराचा क्रमांक ३९२ वा, तर मागील वर्षी ९८ वा क्रमांक होता. स्वच्छतेवर भर दिल्यानेच १४ गुणांची आघाडी मिळाली आहे. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केवळ रस्त्यावरील साफसफाई केली जाते. उर्वरित इतर सर्व कामे कंत्राटदारांकडून करवून घेतली जातात. स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने या कंत्राटदारांमध्ये वाढ केली होती. मात्र, तेव्हापेक्षा आता जनजागृतीची मोहीम थंडावली आहे.मागील सर्वेक्षणात तत्कालीन आयुक्त योगेश म्हसे यांनी शाळेच्या मुलांना संदेश लिहिण्यास प्रवृत्त करून त्यांचा सत्कार केला. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश आपोआप नवीन पिढीपर्यंत पोहोचला. परंतु, जेथे मुलांनी आकर्षक चित्रे काढली होती, तेथेच यंदा कंत्राटदारांमार्फत रंगरंगोटी करून नवीन चित्रे काढण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गावर चित्रे काढण्यापेक्षा पालिकेच्या, शाळेच्या व इतर संस्थेच्या भिंतीवर ही चित्रे काढून संदेश दिला असता, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रभावीपणे जागृती झाली असती.स्वच्छतेची शिस्त लागावी, यासाठी पालिकेने मागील वर्षी कचराडबे नागरिकांना वाटले. मात्र, सध्या अर्धेअधिक डबे गायब झाले आहेत. किती डबे शिल्लक आहेत व त्यांची स्थिती काय, याची माहितीच आरोग्य विभागाला नाही. तर, जेथे डबे आहेत, तेथील कचरा दुपारपर्यंतही उचलला जात नाही. महापालिकेने भित्तीपत्रके लावून, हॅण्डबिले वाटून, ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले. मात्र, वर्गीकरण केलेला कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्या वा कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी कार्यालयांत बसून मिळवलेले गुणांकन भविष्यात घसरण्यास वेळ लागणार नाही, हे तेवढेच खरे.चालू वर्षात चाविंद्रा येथील डम्पिंगवर दोन व टेमघरमध्ये एक असे तीन बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याची घोषणा महापालिकेने केली आहे. परंतु, सध्या रामनगर, चाविंद्रा येथे प्रस्तावित असलेल्या डम्पिंग जागा उद्यानासाठी आरक्षित आहे. डम्पिंगला नागरिकांचा विरोध असल्याने अनेकवेळा विविध संघटना व राजकीय पक्षांनी आंदोलने केली आहेत. बायोगॅस प्रकल्प महापालिका राबवणार असली, तरी हा परिसर दाटीवाटीचा आहे. त्यामुळे प्रकल्प राबवल्यास त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहेत.शहरात सुमारे सात लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग आहेत. त्यातील कचरा हा रस्त्यावर पडलेला असतो अथवा गटारे, नाल्यातून वाहतो. त्यामुळे गटारे तुंबून त्यातील पाणी रस्त्यावरून वाहते. परंतु, घंटागाड्या यंत्रमाग कारखान्यांमधील कचरा गोळा करत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली पाठ थोपटताना आपण शहरातील नागरिकांना खरोखर न्याय दिला आहे काय, याचे चिंतन करावे.शहरातील गटारे, नाले, कचराकुंड्यांची सफाई नियमित होत नाही. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली कीटकनाशके, जंतुनाशके व पावडरची फवारणी नियमितपणे केली जात नाही. त्यामुळे या जंतुनाशकांचे काय होते, हा प्रश्न नेहमीच पडतो.शहराला फायदा झाला का?शहरात भुयारी गटाराच्या दुसºया टप्प्याचे काम सुरू आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील योजनेचा नागरिक तसेच शहराला फायदा झाला का, हेच समजू शकलेले नाही. त्यामुळे योजना यशस्वी झाली का, याचा निष्कर्ष काढता आलेला नाही. त्यामुळे हे काम नागरी हितासाठी की कंत्राटदारांसाठी, असा सवाल केला जात आहे.पण सुविधाच पोहोचत नाहीशहरातील समस्या नागरिकांच्या सहकार्याशिवाय सुटणार नाहीत. त्यासाठी योग्य जनजागृती केली, तर ते सहकार्यही करतील. परंतु, त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचत नाहीत. त्यामुळे संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी कमी पडत आहेत, हे स्पष्ट होते.च्गतिमान स्वच्छतेकडे जाणारे शहर म्हणून भिवंडी महापालिकेला केंद्राकडून मागील वर्षी बक्षीस मिळाले.च्महापालिका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून शहराचे रूपडे प्रथम पालटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.च्परंतु, नियमित स्वच्छता राहावी, यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच या विभागातील भ्रष्टाचारही बाहेर येत आहे.

टॅग्स :thaneठाणे