शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाला निधी देण्यापेक्षा पालिकेच्या शाळा सुधारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 01:23 IST

मागील काही महिने महापौर आणि आयुक्त यांच्या वादावर विराम आला होता.

ठाणे : मागील काही महिने महापौर आणि आयुक्त यांच्या वादावर विराम आला होता. परंतु मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याच्या आयुक्तांच्या भूमिकेवरून पुन्हा महापौर आणि आयुक्तांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. उपकेंद्राला निधी देण्याऐवजी महापालिका शाळांची दुरवस्था आधी सुधारवा असा शेलका आहेर शुक्रवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिला.काही महिन्यांपूर्वी आयुक्त आणि महापौर यांच्यात काही मुद्यांवरून वाद निर्माण झाले होते. परंतु ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्वत: मध्यस्थी करून हा मिटविला. त्यानंतर महापालिकेतील कारभार काहिसा सुरळीत झाला होता. परंतु, आता मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी आयुक्तांनी २० कोटींचा निधी देण्याची भूमिका घेतल्याने त्यावर तीव्र आक्षेप महापौरांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे, मालमत्ताकर व पाणीपट्टी व्यावसायिक दराऐवजी शैक्षणिक दराने आकारण्याची मागणीही आयुक्त जयस्वाल यांनी मान्य केली आहे. मालमत्ताकर व पाणीपट्टी शैक्षणिक दराने आकारण्यास कोणाचाच विरोध असणार नाही. परंतु, विद्यापीठाचे निधीचे स्वत:चे असंख्य स्त्रोत असताना आणि प्राथमिक व माध्यमिक शाळा ही महापालिकेची जबाबदारी असताना २० कोटींचा निधी उपकेंद्रासाठी खर्च कशासाठी असा सवालच महापौरांनी आयुक्तांना केला.मुंबई विद्यापीठाचे ठाणे केंद्र हे ठाणे व त्यापुढील लाखो विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. या विद्यार्थ्यांचा मुंबईपर्यंतचा फेरा वाचावा, त्रास वाचावा, तसेच विद्यापीठाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण होऊन त्यांना अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षण व विविध अभ्यासक्र म उपलब्ध व्हावेत, या हेतूने महापालिकेने विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी अत्यंत नाममात्र दरात सुमारे २७ हजार चौरस मीटर जमीन विद्यापीठाला दिली. तिचा बाजारभाव शेकडो कोटी रु पयांच्या घरात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने अणि ठाणेकर नागरिकांनी आपला वाटा उचलेला असताना आणखी २० कोटींची खिरापत कशासाठी असा खोचक सवालही महापौरांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाला राज्य सरकार, केंद्र सरकार, युनिर्व्हसिटी ग्रँट कमिशन अशा विविध स्त्रोतांकडून कोट्यवधींचा निधी मिळत असतो. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी विशेष बाब म्हणून मुंबई विद्यापीठाला १०० कोटी रु पयांचा निधी दिला होता. तसेच, दरवर्षी विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांकडूनही शुल्करु पाने कोट्यवधी रु पये जमा होतात. तो शिक्षणविषयक पायाभूत सुविधांवर विद्यापीठाने खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे न करता महापालिकेने उपकेंद्रातील नवीन इमारतीचा भार उचलणे योग्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.>महापालिका शाळांसाठी निधी खर्च करा!महापालिकेच्या स्वत:च्या शाळांना आज आधुनिकीकरणासाठी निधीची गरज आहे. २० कोटींचा निधी महापालिका शाळांसाठी वापरला तर अनेक शाळांचा कायापालट होईल, शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल आणि या शाळांची पटसंख्या वाढण्यासही मदत होईल. त्यामुळे सदरचा निधी विद्यापीठासाठी खर्च न करता महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी खर्च करावा अशी मागणीही महापौरांनी केली.