शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

विद्यापीठाला निधी देण्यापेक्षा पालिकेच्या शाळा सुधारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 01:23 IST

मागील काही महिने महापौर आणि आयुक्त यांच्या वादावर विराम आला होता.

ठाणे : मागील काही महिने महापौर आणि आयुक्त यांच्या वादावर विराम आला होता. परंतु मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याच्या आयुक्तांच्या भूमिकेवरून पुन्हा महापौर आणि आयुक्तांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. उपकेंद्राला निधी देण्याऐवजी महापालिका शाळांची दुरवस्था आधी सुधारवा असा शेलका आहेर शुक्रवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिला.काही महिन्यांपूर्वी आयुक्त आणि महापौर यांच्यात काही मुद्यांवरून वाद निर्माण झाले होते. परंतु ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्वत: मध्यस्थी करून हा मिटविला. त्यानंतर महापालिकेतील कारभार काहिसा सुरळीत झाला होता. परंतु, आता मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी आयुक्तांनी २० कोटींचा निधी देण्याची भूमिका घेतल्याने त्यावर तीव्र आक्षेप महापौरांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे, मालमत्ताकर व पाणीपट्टी व्यावसायिक दराऐवजी शैक्षणिक दराने आकारण्याची मागणीही आयुक्त जयस्वाल यांनी मान्य केली आहे. मालमत्ताकर व पाणीपट्टी शैक्षणिक दराने आकारण्यास कोणाचाच विरोध असणार नाही. परंतु, विद्यापीठाचे निधीचे स्वत:चे असंख्य स्त्रोत असताना आणि प्राथमिक व माध्यमिक शाळा ही महापालिकेची जबाबदारी असताना २० कोटींचा निधी उपकेंद्रासाठी खर्च कशासाठी असा सवालच महापौरांनी आयुक्तांना केला.मुंबई विद्यापीठाचे ठाणे केंद्र हे ठाणे व त्यापुढील लाखो विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. या विद्यार्थ्यांचा मुंबईपर्यंतचा फेरा वाचावा, त्रास वाचावा, तसेच विद्यापीठाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण होऊन त्यांना अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षण व विविध अभ्यासक्र म उपलब्ध व्हावेत, या हेतूने महापालिकेने विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी अत्यंत नाममात्र दरात सुमारे २७ हजार चौरस मीटर जमीन विद्यापीठाला दिली. तिचा बाजारभाव शेकडो कोटी रु पयांच्या घरात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने अणि ठाणेकर नागरिकांनी आपला वाटा उचलेला असताना आणखी २० कोटींची खिरापत कशासाठी असा खोचक सवालही महापौरांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाला राज्य सरकार, केंद्र सरकार, युनिर्व्हसिटी ग्रँट कमिशन अशा विविध स्त्रोतांकडून कोट्यवधींचा निधी मिळत असतो. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी विशेष बाब म्हणून मुंबई विद्यापीठाला १०० कोटी रु पयांचा निधी दिला होता. तसेच, दरवर्षी विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांकडूनही शुल्करु पाने कोट्यवधी रु पये जमा होतात. तो शिक्षणविषयक पायाभूत सुविधांवर विद्यापीठाने खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे न करता महापालिकेने उपकेंद्रातील नवीन इमारतीचा भार उचलणे योग्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.>महापालिका शाळांसाठी निधी खर्च करा!महापालिकेच्या स्वत:च्या शाळांना आज आधुनिकीकरणासाठी निधीची गरज आहे. २० कोटींचा निधी महापालिका शाळांसाठी वापरला तर अनेक शाळांचा कायापालट होईल, शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल आणि या शाळांची पटसंख्या वाढण्यासही मदत होईल. त्यामुळे सदरचा निधी विद्यापीठासाठी खर्च न करता महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी खर्च करावा अशी मागणीही महापौरांनी केली.