शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

विद्यार्थ्यांना पटवले कवितेतून शिक्षणाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 22:38 IST

शिक्षण जनजागृती कविसंमेलन; खांडपे जि.प. शाळेत पार पडला कार्यक्रम

भिवंडी : शिक्षण जनजागृती कविसंमेलनाद्वारे ग्रामीण भागात शिक्षण, साक्षरतेचा प्रसार आणि प्रचार तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी शनिवारी भिवंडी तालुक्यातील भिनार केंद्रातील खांडपे जिल्हा परिषद मराठी शाळेत अनोखा उपक्रम घेण्यात आला. साक्षर करू गावं, आई मला शाळेला जायचं हाय, या कविता सादर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्थेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.भिनार केंद्रप्रमुख निहाल शेख यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. माझी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व साहित्यिक विजयकुमार भोईर, युवा कवी मिलिंद जाधव, स्थानिक नागरिक सोमनाथ पाटील, मुख्याध्यापिका राधा येवते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलम पाटील, सहशिक्षक प्रशांत भोसले, शिक्षिका जान्हवी तारे, निरूपा पाटील, साहित्यिक जगदेव भटू, कवी नवनाथ रणखांबे, कवी चेतन जाधव, कवी माधव गुरव, शिक्षक, स्थानिक नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.साहित्य व शिक्षण क्षेत्रात कालांतराने होणारे बदल याबद्दल शेख यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. या कार्यक्र मप्रसंगी कवी मिलिंद जाधव यांनी साक्षर करू गावं, आई मला शाळेला जायचं हाय, या कविता सादर केल्या. यावेळी विजयकुमार भोईर, भटू, रणखांबे, जाधव, गुरव यांनी शिक्षण जनजागृती, सावित्रीबाई फुले, अंधश्रद्धा, साक्षरता या विषयांवर आधारित स्वरचित कविता सादर करीत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रशांत भोसले यांनी, तर आभार केंद्रप्रमुख निहाल शेख यांनी व्यक्त केले.‘शिक्षणाचा अधिकार सर्वांनीच बजावावा’महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परिस्थितीशी झुंज देत घेतलेल्या शिक्षणाचा इतिहास आपण डोळ्यांसमोर ठेवावा. त्यांनी सहन केलेल्या हालअपेष्टांमुळेच आज आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहोत. शिक्षण ही मानवाच्या कल्याणाची गुरुकिल्ली आहे. म्हणून आपण शिक्षणाकडे जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतीय राज्यघटनेमुळे सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. तो अधिकार सर्वांनी बजावावा, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Teacherशिक्षकthaneठाणे