शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात श्वान दत्तक योजना राबवा, प्रताप सरनाईक यांची मागणी

By अजित मांडके | Updated: September 19, 2022 17:39 IST

सध्या राज्यभरात भटक्या श्वानांच्या समस्या ही चिंतेचा विषय आहे. भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण झाले आहेत असल्याचं केलं वक्तव्य.

ठाणे  : सध्या राज्यभरात भटक्या श्वानांच्या समस्या ही चिंतेचा विषय आहे. भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. भटक्या श्वानांमुळे शहरातील वातावरण आणि मानवी आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. ठिकठिकाणी श्वानदंशाच्या घटना घडत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिक यात जखमी होतात तर भटके श्वान मागे लागल्याने वाहनांचे अपघातही होतात. अशा अनेक गोष्टींचा त्रास होत आहे. परंतु माणुसकीच्या दृष्टीने भटक्या श्वानांनाही जगण्याचा अधिकार असल्याने शहरातील भटक्या श्वानांची समस्या दूर करण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने स्पष्ट धोरण ठरवून श्वान दत्तक योजना सुरु  करावी, अशी सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्येकडे केली आहे.

भटक्या श्वानांनी दंश केल्याने हजारो लोक वर्षाला जखमी होत असतात, अशी वेगवेगळ्या  शहरांची आकडेवारी सांगते. त्यातील गरीब-मध्यमवर्गीय लोक सरकारी व पालिकेच्या आरोग्य केंद्रात उपचार - इंजेक्शन घेण्यासाठी जातात. तर खासगी रूग्णालयातही श्वान दंशाचे पेशंट मोठ्या संख्येने वाढत आहेत. मात्न वाढत्या शहरीकरणामुळे महानगरात भटक्या श्वानांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भटक्या श्वानांनी लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक वैतागले असून देखील त्यांच्यासाठी अनेक प्राणीमित्र चांगले काम करीत आहेत. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जखमी आजारी भटक्या श्वानांसाठी शासकीय पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालये, खासगी पाळीव प्राण्यांचे दवाखाने, श्वान निबिर्जीकरण केंद्रे यांच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करणो व नसबंदीबाबत मार्ग काढणो शक्य असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. 

परंतु असे होताना दिसत नसून अनेक नगरपालिका, महापालिका यांचे याबाबत कोणतेही धोरण नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर उपाय केले पाहिजेत. भटक्या श्वानांच्या निबिर्जीकरण शस्त्रक्रियेनंतर त्यांचे लसीकरण व त्यांना ठणठणीत बरे करून मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी श्वान दत्तक योजना राबविली जावी. तसेच याबाबत जनतेत जनजागृती केल्यास भटक्या श्वानांची संख्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल असा दावा त्यांनी केला आहे. या योजनेतून भटके श्वान दत्तक दिल्यामुळे रस्त्यावरून हळूहळू हे श्वान कमी होतील. जेणोकरून नागरिकांना होणारा उपद्रवही कमी होईल. असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक