शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात श्वान दत्तक योजना राबवा, प्रताप सरनाईक यांची मागणी

By अजित मांडके | Updated: September 19, 2022 17:39 IST

सध्या राज्यभरात भटक्या श्वानांच्या समस्या ही चिंतेचा विषय आहे. भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण झाले आहेत असल्याचं केलं वक्तव्य.

ठाणे  : सध्या राज्यभरात भटक्या श्वानांच्या समस्या ही चिंतेचा विषय आहे. भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. भटक्या श्वानांमुळे शहरातील वातावरण आणि मानवी आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. ठिकठिकाणी श्वानदंशाच्या घटना घडत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिक यात जखमी होतात तर भटके श्वान मागे लागल्याने वाहनांचे अपघातही होतात. अशा अनेक गोष्टींचा त्रास होत आहे. परंतु माणुसकीच्या दृष्टीने भटक्या श्वानांनाही जगण्याचा अधिकार असल्याने शहरातील भटक्या श्वानांची समस्या दूर करण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने स्पष्ट धोरण ठरवून श्वान दत्तक योजना सुरु  करावी, अशी सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्येकडे केली आहे.

भटक्या श्वानांनी दंश केल्याने हजारो लोक वर्षाला जखमी होत असतात, अशी वेगवेगळ्या  शहरांची आकडेवारी सांगते. त्यातील गरीब-मध्यमवर्गीय लोक सरकारी व पालिकेच्या आरोग्य केंद्रात उपचार - इंजेक्शन घेण्यासाठी जातात. तर खासगी रूग्णालयातही श्वान दंशाचे पेशंट मोठ्या संख्येने वाढत आहेत. मात्न वाढत्या शहरीकरणामुळे महानगरात भटक्या श्वानांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भटक्या श्वानांनी लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक वैतागले असून देखील त्यांच्यासाठी अनेक प्राणीमित्र चांगले काम करीत आहेत. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जखमी आजारी भटक्या श्वानांसाठी शासकीय पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालये, खासगी पाळीव प्राण्यांचे दवाखाने, श्वान निबिर्जीकरण केंद्रे यांच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करणो व नसबंदीबाबत मार्ग काढणो शक्य असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. 

परंतु असे होताना दिसत नसून अनेक नगरपालिका, महापालिका यांचे याबाबत कोणतेही धोरण नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर उपाय केले पाहिजेत. भटक्या श्वानांच्या निबिर्जीकरण शस्त्रक्रियेनंतर त्यांचे लसीकरण व त्यांना ठणठणीत बरे करून मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी श्वान दत्तक योजना राबविली जावी. तसेच याबाबत जनतेत जनजागृती केल्यास भटक्या श्वानांची संख्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल असा दावा त्यांनी केला आहे. या योजनेतून भटके श्वान दत्तक दिल्यामुळे रस्त्यावरून हळूहळू हे श्वान कमी होतील. जेणोकरून नागरिकांना होणारा उपद्रवही कमी होईल. असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक