शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात श्वान दत्तक योजना राबवा, प्रताप सरनाईक यांची मागणी

By अजित मांडके | Updated: September 19, 2022 17:39 IST

सध्या राज्यभरात भटक्या श्वानांच्या समस्या ही चिंतेचा विषय आहे. भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण झाले आहेत असल्याचं केलं वक्तव्य.

ठाणे  : सध्या राज्यभरात भटक्या श्वानांच्या समस्या ही चिंतेचा विषय आहे. भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. भटक्या श्वानांमुळे शहरातील वातावरण आणि मानवी आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. ठिकठिकाणी श्वानदंशाच्या घटना घडत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिक यात जखमी होतात तर भटके श्वान मागे लागल्याने वाहनांचे अपघातही होतात. अशा अनेक गोष्टींचा त्रास होत आहे. परंतु माणुसकीच्या दृष्टीने भटक्या श्वानांनाही जगण्याचा अधिकार असल्याने शहरातील भटक्या श्वानांची समस्या दूर करण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने स्पष्ट धोरण ठरवून श्वान दत्तक योजना सुरु  करावी, अशी सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्येकडे केली आहे.

भटक्या श्वानांनी दंश केल्याने हजारो लोक वर्षाला जखमी होत असतात, अशी वेगवेगळ्या  शहरांची आकडेवारी सांगते. त्यातील गरीब-मध्यमवर्गीय लोक सरकारी व पालिकेच्या आरोग्य केंद्रात उपचार - इंजेक्शन घेण्यासाठी जातात. तर खासगी रूग्णालयातही श्वान दंशाचे पेशंट मोठ्या संख्येने वाढत आहेत. मात्न वाढत्या शहरीकरणामुळे महानगरात भटक्या श्वानांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भटक्या श्वानांनी लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक वैतागले असून देखील त्यांच्यासाठी अनेक प्राणीमित्र चांगले काम करीत आहेत. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जखमी आजारी भटक्या श्वानांसाठी शासकीय पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालये, खासगी पाळीव प्राण्यांचे दवाखाने, श्वान निबिर्जीकरण केंद्रे यांच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करणो व नसबंदीबाबत मार्ग काढणो शक्य असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. 

परंतु असे होताना दिसत नसून अनेक नगरपालिका, महापालिका यांचे याबाबत कोणतेही धोरण नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर उपाय केले पाहिजेत. भटक्या श्वानांच्या निबिर्जीकरण शस्त्रक्रियेनंतर त्यांचे लसीकरण व त्यांना ठणठणीत बरे करून मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी श्वान दत्तक योजना राबविली जावी. तसेच याबाबत जनतेत जनजागृती केल्यास भटक्या श्वानांची संख्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल असा दावा त्यांनी केला आहे. या योजनेतून भटके श्वान दत्तक दिल्यामुळे रस्त्यावरून हळूहळू हे श्वान कमी होतील. जेणोकरून नागरिकांना होणारा उपद्रवही कमी होईल. असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक