शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

कोरोना संसर्गात देखील भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 15:11 IST

वाहतुक कोंडी आणि चालण्यास जागा नसल्याने नागरिक त्रस्त

मीरारोड - कोरोनाच्या संसर्गाचे नियम धाब्यावर बसवून भाईंदर पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावरील बेकायदेशीर रविवार बाजार पुन्हा जोमाने भरू लागला आहे . त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून चण्यास जागा नसल्याने नागरिक त्रासले आहेत . बाजार वसुली ठेकेदार आणि फेरीवाल्यांशी असलेल्या अर्थपूर्ण संगनमता मुळे पालिका व नगरसेवक अवाक्षर काढत नसल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत . 

पूर्वी- भाईंदर गाव असताना काही  प्रमाणात लोकांची गरज म्हणून रविवार आठवडे बाजार भारत असे . ग्रामीण पण भागातुन सुकी मासळी, भाजीपाला घेऊन येणाराया महिला बाजारात येत . पण गेल्या काही वर्षात बाजार फुगत चालला असून तो थेट शिवसेना गल्ली तर दुसरीकडे मांदली तलाव व कोंबडी गल्ली पर्यंत बेकायदेशीरपणे विस्तारला आहे . अन्य शहरातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या फेरीवाल्यानी मुख्य रस्त्यांवर बस्तान मांडले असून स्थानिक महिला मात्र गल्ली बोळात बसू लागल्या आहेत . 

फेरीवाले मात्र थेट रस्ता - पदपथावर बस्तान मांडुन एका मागोमाग एक अशा हातगाडय़ा लावत आहेत . फेरीवाल्यांच्या अतिक्रमणा मुळे भाईदर पोलीस ठाण्या पासुन शिवसेना गल्ली नाका र्पयतचा मुख्य रस्ता जाम होत आहे. वास्तविक सदर रस्ता हा भाईंदर रेल्वे स्थानका पासुन थेट उत्तन - गोराई र्पयत जाणारा असुन या मुख्य मार्गावरुन एसटी, एमबीएमटी, बेस्ट या सार्वजनिक उपक्रमांच्या बससेवांसह रिक्षा , दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. 

परंतु रविवार बाजारच्या अतिक्रमणा मुळे प्रचंड वाहतुक कोंडी होत असल्याने आपत्कालिन वेळेत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन सुध्दा जाऊ शकणार नाही अशी स्थिती आहे.  अर्धा अर्धा तास वाहतुक ठप्प होते. लांबच लांब रांगा लागतात व प्रवासी अडकुन पडतात. पालिकेच्या बस स्थानकांना सुध्दा फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे.

भुरटे चोर, पाकिटमारांसह महिला - मुलींची छेड काढणारया रोडरोमीयों मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे . बाजार आटोपल्यावर फेरीवाले, भाजीवाले कचरा तसाच टाकुन जातात. बंदी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर होतो. साफसफाईचा भुर्दंड मात्र पालिकेलाच सोसावा लागतो. 

डिसेंबर २०१५ च्या महासभे मध्ये बेकायदा विस्तारीत बाजार बंद करण्यासह भाजी व सुकीमासळी विक्रेत्या स्थानिकांना वगळुन अन्य बाजार सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ हलवण्याचा ठराव केला गेला होता. पण पाच वर्ष झाली तरी महापालिका, नगरसेवक व राजकारणी मात्र ह्या बेकायदा आठवडे बाजारावर ठोस कारवाई करण्यास अवाक्षर काढत नाहीत . 

फेरीवाल्यांकडून मोठी वसुली होत असल्याने बाजार वसुली ठेकेदाराच्या आर्थिक फायद्यासाठी कारवाई टाळली जातेच पण ह्यात काही नगरसेवक  - राजकारणी, फेरीवाला पथक , कनिष्ठ अभियंता , प्रभाग अधिकारी सह अन्य अधिकारी आदींचे अर्थपूर्ण वरदहस्त असल्याने ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी नंदकिशोर बडगुजर यांनी केला आहे . कोरोना संसर्गाचे नियम - निर्देश सुद्धा सर्रास धुडकावले जात आहेत .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे