शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

कोरोना संसर्गात देखील भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 15:11 IST

वाहतुक कोंडी आणि चालण्यास जागा नसल्याने नागरिक त्रस्त

मीरारोड - कोरोनाच्या संसर्गाचे नियम धाब्यावर बसवून भाईंदर पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावरील बेकायदेशीर रविवार बाजार पुन्हा जोमाने भरू लागला आहे . त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून चण्यास जागा नसल्याने नागरिक त्रासले आहेत . बाजार वसुली ठेकेदार आणि फेरीवाल्यांशी असलेल्या अर्थपूर्ण संगनमता मुळे पालिका व नगरसेवक अवाक्षर काढत नसल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत . 

पूर्वी- भाईंदर गाव असताना काही  प्रमाणात लोकांची गरज म्हणून रविवार आठवडे बाजार भारत असे . ग्रामीण पण भागातुन सुकी मासळी, भाजीपाला घेऊन येणाराया महिला बाजारात येत . पण गेल्या काही वर्षात बाजार फुगत चालला असून तो थेट शिवसेना गल्ली तर दुसरीकडे मांदली तलाव व कोंबडी गल्ली पर्यंत बेकायदेशीरपणे विस्तारला आहे . अन्य शहरातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या फेरीवाल्यानी मुख्य रस्त्यांवर बस्तान मांडले असून स्थानिक महिला मात्र गल्ली बोळात बसू लागल्या आहेत . 

फेरीवाले मात्र थेट रस्ता - पदपथावर बस्तान मांडुन एका मागोमाग एक अशा हातगाडय़ा लावत आहेत . फेरीवाल्यांच्या अतिक्रमणा मुळे भाईदर पोलीस ठाण्या पासुन शिवसेना गल्ली नाका र्पयतचा मुख्य रस्ता जाम होत आहे. वास्तविक सदर रस्ता हा भाईंदर रेल्वे स्थानका पासुन थेट उत्तन - गोराई र्पयत जाणारा असुन या मुख्य मार्गावरुन एसटी, एमबीएमटी, बेस्ट या सार्वजनिक उपक्रमांच्या बससेवांसह रिक्षा , दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. 

परंतु रविवार बाजारच्या अतिक्रमणा मुळे प्रचंड वाहतुक कोंडी होत असल्याने आपत्कालिन वेळेत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन सुध्दा जाऊ शकणार नाही अशी स्थिती आहे.  अर्धा अर्धा तास वाहतुक ठप्प होते. लांबच लांब रांगा लागतात व प्रवासी अडकुन पडतात. पालिकेच्या बस स्थानकांना सुध्दा फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे.

भुरटे चोर, पाकिटमारांसह महिला - मुलींची छेड काढणारया रोडरोमीयों मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे . बाजार आटोपल्यावर फेरीवाले, भाजीवाले कचरा तसाच टाकुन जातात. बंदी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर होतो. साफसफाईचा भुर्दंड मात्र पालिकेलाच सोसावा लागतो. 

डिसेंबर २०१५ च्या महासभे मध्ये बेकायदा विस्तारीत बाजार बंद करण्यासह भाजी व सुकीमासळी विक्रेत्या स्थानिकांना वगळुन अन्य बाजार सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ हलवण्याचा ठराव केला गेला होता. पण पाच वर्ष झाली तरी महापालिका, नगरसेवक व राजकारणी मात्र ह्या बेकायदा आठवडे बाजारावर ठोस कारवाई करण्यास अवाक्षर काढत नाहीत . 

फेरीवाल्यांकडून मोठी वसुली होत असल्याने बाजार वसुली ठेकेदाराच्या आर्थिक फायद्यासाठी कारवाई टाळली जातेच पण ह्यात काही नगरसेवक  - राजकारणी, फेरीवाला पथक , कनिष्ठ अभियंता , प्रभाग अधिकारी सह अन्य अधिकारी आदींचे अर्थपूर्ण वरदहस्त असल्याने ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी नंदकिशोर बडगुजर यांनी केला आहे . कोरोना संसर्गाचे नियम - निर्देश सुद्धा सर्रास धुडकावले जात आहेत .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे