शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

स्मार्ट सिटी परियोजनेच्या जागेवर बेकायदा चाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:56 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पास पूरक असलेल्या विकास परियोजनेच्या प्रस्तावित जागेवर बेकायदा चाळी उभ्या राहत आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पास पूरक असलेल्या विकास परियोजनेच्या प्रस्तावित जागेवर बेकायदा चाळी उभ्या राहत आहे. त्या हटवण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने परियोजना अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिकेने स्मार्ट सिटीचा दोन हजार ३०० कोटींचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यात २५ प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. याच स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या धर्तीवर कल्याण पश्चिमेतील सापर्डे व उंबर्डे या परिसरांत दोन टप्प्यांत प्रकल्प राबवणे प्रस्तावित आहे. त्यासाठी तत्कालीन महापौर आणि आयुक्तांनी कोरियन कंपनीची भेट त्यांच्या देशात जाऊन घेतली होती. त्यानंतर, त्यांना कल्याणमध्ये पाचारण करण्यात आले होते. कोरियन कंपनी जवळपास दोन ते चार हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यानुसार, सापर्डे व उंबर्डे येथे सुनियोजित विकास प्रस्तावित आहे. कोरियन कंपनीशी झालेल्या करारानुसार महापालिकेने विकास परियोजना राबवण्याचा प्रस्ताव महासभेसमोर मांडला. त्याचे सादरीकरण महासभेस दिले. त्यानंतर, तसा ठराव राज्य सरकारकडे पाठवला. त्यावर, सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. ज्या जागेवर विकास परियोजना राबवली जाणार आहे, त्याठिकाणी बेकायदा चाळी उभ्या राहत आहे. याकडे महापालिका कानाडोळा करत आहे.विकास परियोजनेसाठी कोरियन कंपनी दोन ते चार हजार कोटींची गुंतवणूक करणार असेल, तर योजनेची प्रस्तावित जागा मोकळी असणे आवश्यक आहे. सापर्डे व उंबर्डे परिसरांचा विकास झालेला नाही. विकास परियोजनेमुळे येथील विकासाला चालना मिळू शकते. येथील नागरिक घनकचरा प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र, विकास परियोजनेला त्यांनी विरोध केलेला नाही.तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्याचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना पत्रकार परिषदेमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण स्टेशन परिसराच्या विकासाचा आराखडा दाखवला होता. त्यासाठी लवकरच निविदा काढली जाईल, असेही सांगितले होते. त्याचबरोबर खाडीकिनाऱ्याचा विकास आणि सिटी पार्कची निविदा काढल्याची माहिती दिली होती. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर महापौरपदाची निवडणूक झाली. त्यानंतर, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली.आचारसंहितेमुळे प्रकल्पाच्या कामात अडसरनिवडणूक आचारसंहितेमुळे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांच्या कामात अडसर आला. आता आचारसंहिता संपल्याने गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची बैठक अजून झालेली नाही.यापूर्वीच्या क्रिसील या सल्लागार कंपनीची महापालिकेने हकालपट्टी केल्याने नव्या सल्लागाराच्या नेमणुकीचा विषय सुरू झाला. या कचाट्यात स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाची गती मंद झाली आणि सापर्डे व उंबर्डे येथील विकास परियोजनेच्या जागेवर बेकायदा चाळी उभारणाºयांना संधी मिळाली. ही परियोजना राबवण्यासाठी पालिकेला पहिल्यांदा तातडीने हे अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे.

टॅग्स :kalyanकल्याणnewsबातम्या