शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

स्मार्ट सिटी परियोजनेच्या जागेवर बेकायदा चाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:56 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पास पूरक असलेल्या विकास परियोजनेच्या प्रस्तावित जागेवर बेकायदा चाळी उभ्या राहत आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पास पूरक असलेल्या विकास परियोजनेच्या प्रस्तावित जागेवर बेकायदा चाळी उभ्या राहत आहे. त्या हटवण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने परियोजना अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिकेने स्मार्ट सिटीचा दोन हजार ३०० कोटींचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यात २५ प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. याच स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या धर्तीवर कल्याण पश्चिमेतील सापर्डे व उंबर्डे या परिसरांत दोन टप्प्यांत प्रकल्प राबवणे प्रस्तावित आहे. त्यासाठी तत्कालीन महापौर आणि आयुक्तांनी कोरियन कंपनीची भेट त्यांच्या देशात जाऊन घेतली होती. त्यानंतर, त्यांना कल्याणमध्ये पाचारण करण्यात आले होते. कोरियन कंपनी जवळपास दोन ते चार हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यानुसार, सापर्डे व उंबर्डे येथे सुनियोजित विकास प्रस्तावित आहे. कोरियन कंपनीशी झालेल्या करारानुसार महापालिकेने विकास परियोजना राबवण्याचा प्रस्ताव महासभेसमोर मांडला. त्याचे सादरीकरण महासभेस दिले. त्यानंतर, तसा ठराव राज्य सरकारकडे पाठवला. त्यावर, सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. ज्या जागेवर विकास परियोजना राबवली जाणार आहे, त्याठिकाणी बेकायदा चाळी उभ्या राहत आहे. याकडे महापालिका कानाडोळा करत आहे.विकास परियोजनेसाठी कोरियन कंपनी दोन ते चार हजार कोटींची गुंतवणूक करणार असेल, तर योजनेची प्रस्तावित जागा मोकळी असणे आवश्यक आहे. सापर्डे व उंबर्डे परिसरांचा विकास झालेला नाही. विकास परियोजनेमुळे येथील विकासाला चालना मिळू शकते. येथील नागरिक घनकचरा प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र, विकास परियोजनेला त्यांनी विरोध केलेला नाही.तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्याचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना पत्रकार परिषदेमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण स्टेशन परिसराच्या विकासाचा आराखडा दाखवला होता. त्यासाठी लवकरच निविदा काढली जाईल, असेही सांगितले होते. त्याचबरोबर खाडीकिनाऱ्याचा विकास आणि सिटी पार्कची निविदा काढल्याची माहिती दिली होती. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर महापौरपदाची निवडणूक झाली. त्यानंतर, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली.आचारसंहितेमुळे प्रकल्पाच्या कामात अडसरनिवडणूक आचारसंहितेमुळे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांच्या कामात अडसर आला. आता आचारसंहिता संपल्याने गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची बैठक अजून झालेली नाही.यापूर्वीच्या क्रिसील या सल्लागार कंपनीची महापालिकेने हकालपट्टी केल्याने नव्या सल्लागाराच्या नेमणुकीचा विषय सुरू झाला. या कचाट्यात स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाची गती मंद झाली आणि सापर्डे व उंबर्डे येथील विकास परियोजनेच्या जागेवर बेकायदा चाळी उभारणाºयांना संधी मिळाली. ही परियोजना राबवण्यासाठी पालिकेला पहिल्यांदा तातडीने हे अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे.

टॅग्स :kalyanकल्याणnewsबातम्या