शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

"गेल्या १५ वर्षांत राजकीय पक्षांचे मराठी भाषेकडे दुर्लक्ष"; कादंबरीकार विश्वास पाटील यांचे मत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 10, 2024 16:48 IST

"सध्याच्या एका महामार्गाचा खर्च हा साहित्य संस्कृतीवरील ५० वर्षांचा खर्चासमान"

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेल्या १५ वर्षांत राजकीय पक्षाने मराठी भाषेकडे दुर्लक्ष केले आहे. या भाषेकडे तुच्छतेने पाहिले आहे. त्या वृत्तीचा मी निषेध करतो. मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी काही लोक दिल्लीकडे धाव घेतात, त्यांनी त्यांच्या पायाखाली काय जळतंय, हे पाहावे. यशवंतराव चव्हाण यांना स्वर्गात खंत वाटत असेल की त्यांनी ग्रंथ चळवळ सुरू केली आणि आता ग्रंथालये बंद पडत आहेत. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार दिला जात नाही. एका महामार्गाचा खर्च आणि साहित्य संस्कृतीवरील ५० वर्षांचा खर्च समानच असेल, अशी खंत सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.

डॉ. महेश केळुस्कर यांनी लिहीलेल्या बुक्के, जहरमाया, आणि ग्रंथोपजीविये, नभोनाट्य आणि रुपक या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे कृष्णा प्रकाशन, शारदा प्रकाशन, सृजनसंवाद, नवचैतन्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

राजकीय पक्षांवर टीका करताना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पाटील म्हणाले की, अटलजींचा सेतू हा दगडाचा नव्हे तर साहित्य संस्कृतीचा होता. पुर्वीच्या नेत्यांचा साहित्याशी जवळचा संबंध होता आताचे राजकारणी ग्रंथदूर झाले आहेत आणि यावर साहित्यिक काहीच बोलत नाहीत. निवडणूकीनिमित्त लावण्यात येणारे फ्लेक्स यावर लाखो रुपयांची उधळण केली जाते आणि दुसरीकडे ग्रंथालयांकडे दुर्लक्ष केले जाते. जे ग्रंथ विसरतात त्यांच्या आयुष्यात अंधकाराशिवाय दुसरे काहीच नसते. साहित्य संमेलनाच्या मांडवात मिरवायला मिळते म्हणून हे राजकारणी कोटीच्या कोटी रुपये फेकतात पण साहित्य संस्कृतीकडे मात्र पाठ फिरवतात हे बरे नव्हे अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली.

पुढे ते म्हणाले की, राजकारण असो वा साहित्य, जो मुहुर्त नेमका गाठतो तो दिवस त्याचा असतो. त्यामुळे एकीकडे पंतप्रधान शपथ घेत आहेत तर दुसरीकडे डॉ. केळुसकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. डॉ. केळुसकर यांनी साहित्याचा न्यायाधीश हा काळ असतो. जो आमिष आणि धमक्यांना घाबरत नाही तो राजकीय लेखक टिकून राहतो.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. अनंत देशमुख आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्यासह कृष्णा प्रकाशनचे विद्याधर ठाणेकर, शारदा प्रकाशनचे संतोष राणे, सृजनसंवादचे गीतेश शिंदे तर नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रकाश बोर्डे यांनी केले.

टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील thaneठाणे