शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

"गेल्या १५ वर्षांत राजकीय पक्षांचे मराठी भाषेकडे दुर्लक्ष"; कादंबरीकार विश्वास पाटील यांचे मत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 10, 2024 16:48 IST

"सध्याच्या एका महामार्गाचा खर्च हा साहित्य संस्कृतीवरील ५० वर्षांचा खर्चासमान"

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेल्या १५ वर्षांत राजकीय पक्षाने मराठी भाषेकडे दुर्लक्ष केले आहे. या भाषेकडे तुच्छतेने पाहिले आहे. त्या वृत्तीचा मी निषेध करतो. मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी काही लोक दिल्लीकडे धाव घेतात, त्यांनी त्यांच्या पायाखाली काय जळतंय, हे पाहावे. यशवंतराव चव्हाण यांना स्वर्गात खंत वाटत असेल की त्यांनी ग्रंथ चळवळ सुरू केली आणि आता ग्रंथालये बंद पडत आहेत. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार दिला जात नाही. एका महामार्गाचा खर्च आणि साहित्य संस्कृतीवरील ५० वर्षांचा खर्च समानच असेल, अशी खंत सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.

डॉ. महेश केळुस्कर यांनी लिहीलेल्या बुक्के, जहरमाया, आणि ग्रंथोपजीविये, नभोनाट्य आणि रुपक या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे कृष्णा प्रकाशन, शारदा प्रकाशन, सृजनसंवाद, नवचैतन्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

राजकीय पक्षांवर टीका करताना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पाटील म्हणाले की, अटलजींचा सेतू हा दगडाचा नव्हे तर साहित्य संस्कृतीचा होता. पुर्वीच्या नेत्यांचा साहित्याशी जवळचा संबंध होता आताचे राजकारणी ग्रंथदूर झाले आहेत आणि यावर साहित्यिक काहीच बोलत नाहीत. निवडणूकीनिमित्त लावण्यात येणारे फ्लेक्स यावर लाखो रुपयांची उधळण केली जाते आणि दुसरीकडे ग्रंथालयांकडे दुर्लक्ष केले जाते. जे ग्रंथ विसरतात त्यांच्या आयुष्यात अंधकाराशिवाय दुसरे काहीच नसते. साहित्य संमेलनाच्या मांडवात मिरवायला मिळते म्हणून हे राजकारणी कोटीच्या कोटी रुपये फेकतात पण साहित्य संस्कृतीकडे मात्र पाठ फिरवतात हे बरे नव्हे अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली.

पुढे ते म्हणाले की, राजकारण असो वा साहित्य, जो मुहुर्त नेमका गाठतो तो दिवस त्याचा असतो. त्यामुळे एकीकडे पंतप्रधान शपथ घेत आहेत तर दुसरीकडे डॉ. केळुसकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. डॉ. केळुसकर यांनी साहित्याचा न्यायाधीश हा काळ असतो. जो आमिष आणि धमक्यांना घाबरत नाही तो राजकीय लेखक टिकून राहतो.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. अनंत देशमुख आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्यासह कृष्णा प्रकाशनचे विद्याधर ठाणेकर, शारदा प्रकाशनचे संतोष राणे, सृजनसंवादचे गीतेश शिंदे तर नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रकाश बोर्डे यांनी केले.

टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील thaneठाणे