शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?; न्यायालयात जावे, भातखळकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 03:51 IST

अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी यांच्यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली, परंतु, आजही अनेक शेतकरी यांना ती मदत मिळू शकलेली नाही.

ठाणे : प्रताप सरनाईक यांना ईडीची भीती वाटत असेल, तर ज्या पद्धतीने अर्णव गोस्वामींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, तसे त्यांनाही अधिकार आहेत. त्यासाठी क्वारंटाइन होण्याची गरज नाही. कर नाही त्याला डर कशाला, असे आवाहन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केले.

भातखळकर म्हणाले की, महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे, हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा ॲड, माधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, गटनेते संजय वाघुले आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी यांच्यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. परंतु, आजही अनेक शेतकरी यांना ती मदत मिळू शकलेली नाही. वाडा, पालघर येथील भातखरेदी केंद्र बंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेबरोबर जाणार का? असा सवाल त्यांना केला असता, भाजप सर्वच निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वच स्तरांवर सरकार ठरले अपयशीबोईसर : शिवसेनेच्या बदलत्या भगव्या रंगाबरोबर जनतेला लुटण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या वेळी ठाकरे सरकारच्या १० घोटाळ्यांचा पाढा त्यांनी वाचून तर दाखवला. तसेच कोरोनाच्या नावाने केलेल्या घोटाळ्याचा उल्लेख करून मुंबईच्या महापौरांसह, मंत्री अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीचाही समाचार घेतला. कोरोनास्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे मत सोमय्या यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :BJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरpratap sarnaikप्रताप सरनाईक