शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे न वगळल्यास डिसेंबरनंतर करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 23:58 IST

सरकारने केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अजूनही पूर्तता झालेली नाही.

कल्याण : सरकारने केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अजूनही पूर्तता झालेली नाही. त्यामुळे २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीची फसवणूक झाली आहे. समितीने सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. या काळात निर्णय न झाल्यास समिती डिसेंबरनंतर आंदोलन करणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याला समिती जबाबदार राहणार नाही, असे समितीने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना सूचित केले आहे.समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, अर्जुन चौधरी, बळीराम तरे, विजय भाने आदी पदाधिकाऱ्यांनी फणसळकर यांची सोमवारी भेट घेतली. केडीएमसीतून २७ गावे वेगळण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये दिले होते. मात्र, त्यांनी ते अजूनही पाळलेले नाही. गावांबाबत महिनाभरात निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे समितीने आता केवळ दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. डिसेंबरपर्यंत गावे न वगळल्यास समितीतर्फे आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, याकडे समितीने लक्ष वेधले.केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे सोयीसुविधांच्या बाबतीत बैठक घेऊनही त्या पुरविल्या गेलेल्या नाहीत. गावे वगळली जात नाहीत, तसेच महापालिकेकडून सोयीसुविधाही मिळत नसल्याने गावे दुहेरी कचट्यात सापडली आहेत. याविषयीचे सविस्तर निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने फणसळकर यांना दिले. त्यावर त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री व केडीएमसी आयुक्तांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन समितीच्या पदाधिकाºयांना दिले आहे.समितीच्या २२ पदाधिकाºयांच्या विरोधात मानपाडा पोलिसांनी दाखल केलेले एमआरटीपीचे गुन्हे मागे घ्यावेत. हे गुन्हे खोटे असून, त्यांना नाहक त्रास दिला जात आहे, असा मुद्दाही समितीने मांडला. याविषयी फणसळकर यांनी कल्याणच्या पोलीस उपायुक्तांकडे मोबाइलद्वारे विचारणा करून माहिती घेतली.>उपजिल्हाधिकाºयांना दिले निवेदनठाणे जिल्हाधिकाºयांनाही समितीने भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे समितीने उपजिल्हाधिकाºयांची भेट घेत निवेदन दिले. उपजिल्हाधिकाºयांनी समितीच्या भावना सरकार दरबारी पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका