शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनसेला महाआघाडीत घेतल्यास काँग्रेसची पोलखोल करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 00:47 IST

अबू आझमींचा इशारा : महाआघाडीकडून अद्याप निमंत्रण नाही

भिवंडी : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास उत्तर भारतातील सर्व राज्यांच्या प्रचारांत समाजवादी पक्षातर्फे काँग्रेसची पोलखोल करण्याचा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आसीम आझमी यांनी शुक्रवारी दिला. महाआघाडीकडून अद्याप आपल्याला निमंत्रण आले नाही. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा लढवण्याची घोषणा आझमी यांनी यावेळी केली.

शहरातील एका सभागृहात समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये समाजवादी पक्षाला अद्याप समाविष्ट करून घेतलेले नाही. समाजवादी पक्षाने भिवंडी, मुंबई अथवा नांदेड या तीनपैकी एक जागा मागितली आहे. त्यापैकी भिवंडी लोकसभा हे आमचे पहिले लक्ष्य आहे. आपल्या मागणीचा विचार न झाल्याने समाजवादी पक्ष सहा जागांवर उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे आमच्यावर मतविभाजनाचा आरोप कुणी करू नये. काँग्रेसची सत्ता आली, तरी ‘कंट्रोल’ समाजवादीचाच असेल, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना लगावला.

लष्करामध्ये तीन टक्के मुस्लिम समाजाची भरती केली जाते; पण काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सहा टक्के मुस्लिम मारले गेले. त्यामध्ये काश्मीरच्या मुस्लिम जवानांचा समावेश होता, असे सांगताना अबू आझमी म्हणाले की, काश्मीर आपल्या देशाचा भाग आहे, असे पंतप्रधान समजतात, तर काश्मीरमधील लोकांनादेखील आपले समजायला पाहिजे. प्रत्येक काश्मिरीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी आजमी यांनी यावेळी केली.जवान शहीद होत असताना सरकारने बघ्याची भूमिका घेण्याऐवजी, पाकिस्तानला नेस्तनाबूत करावे, असे मत आजमी म्हणाले. मी मराठी शिकतो. महाराष्ट्र माझा आहे, असे ते मराठी भाषेच्या एका प्रश्नावर म्हणाले.मोदींचे समर्थन करणाऱ्या मुलायम सिंग यांच्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, अखिलेश यादव हे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. तिकीटवाटप तेच करणार आहेत, असे सांगून आझमी यांनी या विषयावर पडदा टाकला.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीMNSमनसेthaneठाणे