शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

मेट्रो न आल्यास कोर्टात जाणार

By admin | Updated: October 21, 2016 04:29 IST

भिवंडीत मेट्रो येणार असल्याचे आम्हाला दु:ख नाही, पण डोंबिवलीसह बदलापूरपर्यंतच्या आणि कळवा ते दिव्यापर्यंतच्या २५ लाख रेल्वेप्रवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

- अनिकेत घमंडी,  डोंबिवली

भिवंडीत मेट्रो येणार असल्याचे आम्हाला दु:ख नाही, पण डोंबिवलीसह बदलापूरपर्यंतच्या आणि कळवा ते दिव्यापर्यंतच्या २५ लाख रेल्वेप्रवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सापत्न वागणूक दिल्याची खंत वाटते. एमएमआरडीएने तळोजापर्यंत येणारी मेट्रो तातडीने डोंबिवलीसह पुढे न्यावी आणि येथील प्रवाशांना न्याय द्यावा, अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत, अशी भूमिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केली.बदलापूर ते ठाणेदरम्यान रेल्वे प्रवासात रोज सरासरी सात प्रवाशांचा अपघात होतो. त्यातील बहुतांशी प्रवाशांचा मृत्यू होतो, ही बाब गंभीर आहे. या मार्गावरील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील का नाही, असा सवाल त्यांनी केला. आधी महापालिका निवडणुकांच्या वेळी ६ हजार ५०० कोटींचे पॅकेज, त्यानंतर माणकोली पुलाच्या भूमिपूजनाचा उपक्रम आणि आता मेट्रो प्रकरण या एकापाठोपाठच्या घटनांमधून सरकारने येथील नागरिकांवर अन्यायच केला आहे. तो मनसे सहन करणार नाही. त्यासाठी जनआंदोलन केले जाईल, अशी भूमिका उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मांडली.खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि डोंबिवलीचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे सगळे हातचे सर्व जात असूनही गप्प का बसले आहेत? नागरिकांनी त्यांना यासाठीच निवडून दिले आहे का? आता तरी नागरिकांनी सतर्क व्हावे. वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. तरच यातून काही मार्ग निघणे सोपे होईल.सरकार सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळत आहे. त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवत असल्याची टीका त्यांनी केली. फडणवीस यांनी येथील नागरिकांसाठी मेट्रो प्रकल्पास मंजुरी द्यावी. एमएमआरडीएने सुधारित आराखडा तयार करावा. मूळ आराखड्यात बदल करता येऊ शकतो, त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली. आधी पालिका निवडणुकीच्या वेळी पॅकेजबाबत जशी फसवणूक झाली, तशाी आता होऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.