शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो न आल्यास कोर्टात जाणार

By admin | Updated: October 21, 2016 04:29 IST

भिवंडीत मेट्रो येणार असल्याचे आम्हाला दु:ख नाही, पण डोंबिवलीसह बदलापूरपर्यंतच्या आणि कळवा ते दिव्यापर्यंतच्या २५ लाख रेल्वेप्रवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

- अनिकेत घमंडी,  डोंबिवली

भिवंडीत मेट्रो येणार असल्याचे आम्हाला दु:ख नाही, पण डोंबिवलीसह बदलापूरपर्यंतच्या आणि कळवा ते दिव्यापर्यंतच्या २५ लाख रेल्वेप्रवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सापत्न वागणूक दिल्याची खंत वाटते. एमएमआरडीएने तळोजापर्यंत येणारी मेट्रो तातडीने डोंबिवलीसह पुढे न्यावी आणि येथील प्रवाशांना न्याय द्यावा, अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत, अशी भूमिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केली.बदलापूर ते ठाणेदरम्यान रेल्वे प्रवासात रोज सरासरी सात प्रवाशांचा अपघात होतो. त्यातील बहुतांशी प्रवाशांचा मृत्यू होतो, ही बाब गंभीर आहे. या मार्गावरील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील का नाही, असा सवाल त्यांनी केला. आधी महापालिका निवडणुकांच्या वेळी ६ हजार ५०० कोटींचे पॅकेज, त्यानंतर माणकोली पुलाच्या भूमिपूजनाचा उपक्रम आणि आता मेट्रो प्रकरण या एकापाठोपाठच्या घटनांमधून सरकारने येथील नागरिकांवर अन्यायच केला आहे. तो मनसे सहन करणार नाही. त्यासाठी जनआंदोलन केले जाईल, अशी भूमिका उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मांडली.खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि डोंबिवलीचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे सगळे हातचे सर्व जात असूनही गप्प का बसले आहेत? नागरिकांनी त्यांना यासाठीच निवडून दिले आहे का? आता तरी नागरिकांनी सतर्क व्हावे. वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. तरच यातून काही मार्ग निघणे सोपे होईल.सरकार सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळत आहे. त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवत असल्याची टीका त्यांनी केली. फडणवीस यांनी येथील नागरिकांसाठी मेट्रो प्रकल्पास मंजुरी द्यावी. एमएमआरडीएने सुधारित आराखडा तयार करावा. मूळ आराखड्यात बदल करता येऊ शकतो, त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली. आधी पालिका निवडणुकीच्या वेळी पॅकेजबाबत जशी फसवणूक झाली, तशाी आता होऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.