शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

Maharashtra election 2019 : सत्ता दिली, तर जाब पण विचारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 06:46 IST

राज ठाकरेंचे आवाहन : विकासाच्या मुद्द्यावर सरकारवर घणाघाती टीका

डोंबिवली : स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींच्या पॅकेजची निव्वळ आकडेमोड करणारे सरकार लोकांना पाणी, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधाही देऊ शकले नाही. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून, त्यामुळे लोकांचे नाहक बळी जात आहेत. सर्वत्र अत्यंत विदारक परिस्थिती असतानाही ज्याला बहुमताची सत्ता दिली, त्या सरकारला आपण जाब का विचारत नाही, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील जाहीर सभेत मंगळवारी केला. मतदारांना जागरूक होण्याचे आवाहन करतानाच, त्यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीकाही केली.

डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानात मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील आणि डोंबिवलीचे उमेदवार मंदार हळबे यांची प्रचारसभा मंगळवारी सायंकाळी पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. डोंबिवली हा संघाचा बालेकिल्ला समजला जातो. मग, डोंबिवलीच्या बकाल अवस्थेबाबत भाजपच्या कामगिरीचे संघ का मूल्यमापन करत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. डोंबिवली हे सुशिक्षित लोकांचे बकाल शहर झाले आहे. या शहरातून चार्टर्ड अकाउंटंट होणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांनी शहराच्या परिस्थितीचे आॅडिट करावे. ६५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा करणाºया सरकारला या शहरातील साधे खड्डेही बुजवता आले नाही. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या लोकांची यादी वाचून दाखवताना, लोकांना या भीषण परिस्थितीचा संताप का येत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. राज्यात सव्वा लाख विहिरी बांधल्याचा दावा सरकारकडून केला जातो. कदाचित, हा आकडा खड्ड्यांचा असावा, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला.

१४ वर्षे राम वनवासात होते. या काळात सेतू बांधण्यापासून कितीतरी मोठी कामं त्यांनी केली. इथे फक्त सी-लिंक बांधायला १४ वर्षे लागल्याचा चिमटाही त्यांनी सरकारला घेतला. महाराष्ट्राची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतून येणारी मंडळीही महाराष्ट्राची तुलना त्यांच्या राज्यांशी करू लागली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगून, त्यांनी मनसेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेdombivali-acडोंबिवली