शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Maharashtra election 2019 : सत्ता दिली, तर जाब पण विचारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 06:46 IST

राज ठाकरेंचे आवाहन : विकासाच्या मुद्द्यावर सरकारवर घणाघाती टीका

डोंबिवली : स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींच्या पॅकेजची निव्वळ आकडेमोड करणारे सरकार लोकांना पाणी, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधाही देऊ शकले नाही. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून, त्यामुळे लोकांचे नाहक बळी जात आहेत. सर्वत्र अत्यंत विदारक परिस्थिती असतानाही ज्याला बहुमताची सत्ता दिली, त्या सरकारला आपण जाब का विचारत नाही, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील जाहीर सभेत मंगळवारी केला. मतदारांना जागरूक होण्याचे आवाहन करतानाच, त्यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीकाही केली.

डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानात मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील आणि डोंबिवलीचे उमेदवार मंदार हळबे यांची प्रचारसभा मंगळवारी सायंकाळी पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. डोंबिवली हा संघाचा बालेकिल्ला समजला जातो. मग, डोंबिवलीच्या बकाल अवस्थेबाबत भाजपच्या कामगिरीचे संघ का मूल्यमापन करत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. डोंबिवली हे सुशिक्षित लोकांचे बकाल शहर झाले आहे. या शहरातून चार्टर्ड अकाउंटंट होणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांनी शहराच्या परिस्थितीचे आॅडिट करावे. ६५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा करणाºया सरकारला या शहरातील साधे खड्डेही बुजवता आले नाही. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या लोकांची यादी वाचून दाखवताना, लोकांना या भीषण परिस्थितीचा संताप का येत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. राज्यात सव्वा लाख विहिरी बांधल्याचा दावा सरकारकडून केला जातो. कदाचित, हा आकडा खड्ड्यांचा असावा, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला.

१४ वर्षे राम वनवासात होते. या काळात सेतू बांधण्यापासून कितीतरी मोठी कामं त्यांनी केली. इथे फक्त सी-लिंक बांधायला १४ वर्षे लागल्याचा चिमटाही त्यांनी सरकारला घेतला. महाराष्ट्राची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतून येणारी मंडळीही महाराष्ट्राची तुलना त्यांच्या राज्यांशी करू लागली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगून, त्यांनी मनसेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेdombivali-acडोंबिवली