शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

आयुक्त नोकरदार नाही तर स्वत:ला हुकमशहा समजतात, महापौरांनी डागली आयुक्तांवर तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 4:13 PM

ठाणे महापालिका आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे यापुढे माझा अपमान केला गेला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशारा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना दिला आहे.

ठळक मुद्देमहापौर आणि आयुक्तांमधील शितयुध्द आणखी पेटण्याची चिन्हेपुन्हा अपमान झाल्यास माझ्या अधिकाराचा वापर करेन

ठाणे - महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरुन आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुध्द आता आणखीनच पेटण्याची चिन्हे आहेत. आयुक्त हे ठाणेकरांचे नोकरदार आहेत, परंतु ते हेच विसरले असून ते हुकमशाही पध्दतीनेच काम करीत असल्याचा आरोप महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी ठाणेकरांची माफी मागावी असे सुतोवाचही त्यांनी केले आहेत. तसेच यापुढे जर माझा अपमान झाला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशाराही त्यांनी दिला.               मंगळवारी महासभा सुरु झाल्यानंतर लक्षवेधी आणि प्रश्नउत्तरांच्याच तासामुळे लांबली. त्यामुळे ती सभा तहकुब करुन बुधवारी पुन्हा ही सभा लावण्यात आली होती. मात्र, दुपारी दीड वाजले तरी पालिका सचिवांव्यतिरीक्त एकही अधिकारी या सभेला उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे सभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे एकीकडे महासभा सुरु असतांनाच दुसरीकडे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्बन रिर्सच सेंटर येथे सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक लावली. मार्च अखेरच्या कामांमध्ये प्रशासकीय अधिकारी व्यस्त असून काही अधिकारी विधिमंडळ अधिवेशन आणि न्यायालयीन सुनावणीसाठी गेले आहेत अशी सबब प्रशासनातर्फे देण्यात आली. त्यामुळे सभेसाठी अधिकारी येणार नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर आता महासभा केव्हा लावायची हे मी ठरविणार असल्याचेही महापौरांनी प्रशासनाला सुनावले होते. आता या पुढे जाऊन महापौरांनी पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप लावले आहेत. पालिका आयुक्तांच्या हुकूमशाहीचा मात्र चांगलाच समाचार घेतला आहे. जे सरकारी नोकर आहेत ते स्वत:ला हुकूमशहा समजत आहेत, तुम्ही समोरा समोर चर्चा करायला घाबरता, दम असेल तर चर्चा करा असे थेट आव्हानच त्यांनी आयुक्तांना दिले आहे. नगरसेवक विरोधात बोलले तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात, महासभेला अनुपिस्थत राहून त्यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. महापौरांचे अधिकार अजून मी वापरलेले नाहीत मात्र वर्तणूक सुधारली नाही तर ते मी वापरू शकते, सभागृहात हक्कभंग ही येऊ शकतो, कसले ठाणे स्मार्ट करत आहात? स्वत:ला की शहराला? नागरिकांना उध्वस्त करून शहर स्मार्ट कसे होणार? असे विविध प्रश्न उपस्थित करत महापौरांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर तोफ डागली तर ज्या वेळी गावदेवीचे गाळे उद्धवस्त केले गेले तेव्हाच ठाणेकरांनी आंदोलन करायला हवे होते अशी भुमीका महापौर शिंदे यांनी यावेळी मांडली.निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही गप्प -दुर्देवाने आज नगरसेवक देखील खुलेपणाने प्रशासनाला विरोध करायला घाबरत आहेत. काही अडचणीमुळे कदाचित लोकप्रतिनिधी आयुक्तांसमोर बोलायला घाबरतात किंवा खोट्या केस दाखल करू नये म्हणूनही लोकप्रतिनिधी शांत बसतात. मात्र जनतेचे प्रश्न मी मांडू शकत नाही तर त्या खुर्चीत बसण्याचा अधिकार काय आहे मला ? त्यामुळे पक्षाच्या भूमिकेपेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे असून ते मांडतच राहणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त