शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आला रे आला... पाऊस आला !

By admin | Updated: June 12, 2016 01:06 IST

पाणीटंचाईमुळे तोंडचे पाणी पळालेल्या ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात शनिवारी सकाळी वळवाच्या सरी पडल्या आणि वातावरणात आल्हाददायक गारवा पसरला. गेले चार दिवस मान्सूनपूर्व

ठाणे : पाणीटंचाईमुळे तोंडचे पाणी पळालेल्या ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात शनिवारी सकाळी वळवाच्या सरी पडल्या आणि वातावरणात आल्हाददायक गारवा पसरला. गेले चार दिवस मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज फक्त व्यक्त होत होता. उकाडाही दिवसेंदिवस असह्य होत होता. मात्र, वरुणराजाने दमदार दर्शन घडवत वातावरणाचा नूर पालटून टाकला. या पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. रेल्वेला तडाखा बसला. झाडे उन्मळून पडण्याच्या काही घटना घडल्या. सकाळी शहरात १३ मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. तापमानही ३५ ते ३७ अंशांवरून ३१ ते ३२ अंशांदरम्यान खाली आले. जूनचे १० दिवस उलटूनही पावसाचा पत्ता नसल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होईल, अशी स्थिती गेल्या चार दिवसांत निर्माण झाली होती. यंदाही ७ जूनचा मुहूर्त पावसाने चुकवला. कोकणात दोन दिवसांपूर्वी वळवाच्या सरी कोसळल्याने ठाणे जिल्ह्यात तो कधी दाखल होईल, याचीच प्रतीक्षा होती. गेले चार-पाच दिवस ढग दाटून येत होते, पण पाऊस पडत नव्हता. मात्र, शनिवारी सकाळी पावसाने दर्शन दिले. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह ढग दाटून आले, तर काही भागांत गडगडाटी आवाज करत वरुणराजाने आगमनाची वर्दी दिली. कुठे तुरळक सरी, तर कुठे जोरदार तडाखे देत पावसाने नांदी दिली. अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला. पावसाने हजेरी लावताच सोशल मीडियावर पहिल्या पावसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. कवितांची जणू काही मैफलच रंगली. (प्रतिनिधी)कल्याण-डोंबिवलीत शिडकावाडोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातही पावसाचा शिडकावा झाला. सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते. पुन्हा वातावरणाने ११ वाजल्यापासून रूप पालटले. पुन्हा वातावरणात उकाडा सुरू झाला. दुपारनंतर मात्र पुन्हा कडकडीत ऊन पडले. पावसात मुंब्य्राची बत्ती गुलमुंब्रा : पावसाच्या पहिल्याच किरकोळ सरींनी मुंब्य्रातील वीजपुरवठा चार तास बंद झाला. दुपारी १ च्या दरम्यान तो पुन्हा खंडित झाला. दिवसभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले होते. ऐरोलीतील तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित झाल्याची माहिती महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने दिली.मीरा-भार्इंदरमध्ये बरसल्या सरीमीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये सकाळी आणि संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्या. आल्हाददायक गारवा निर्माण झाला. अचानक आलेल्या पावसाने घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. बालगोपाळांसह मोठ्यांनीही पावसात भिजण्याचा आनंद लुटला. शहरात ठिकठिकाणी नागरिकांसह वाहनचालकांवर चिखलातून मार्ग काढण्याची वेळ आली. पालिकेच्या गलथानपणामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत. पावसात डांबरीकरण सुरू होईल, पण ते टिकणार नाही. पाऊस यंदा लवकर येणार, अशी शक्यता हवामान खात्याने वारंवार व्यक्त केली असली तरी पालिकेने ती गांभीर्याने घेतली नाही. परिणामी, भूमिगत गटारांसाठी खणलेले रस्ते, अंतर्गत रस्ते, गटारांची कामे रखडली आहेत.८० वर्षीय जीर्ण झाड कोसळलेपावसाच्या पहिल्याच दिवशी झाडे कोसळण्याच्या घटना शहरातील विविध भागांत घडल्या. नौपाडा परिसरातील एस.व्ही. रोड येथे तब्बल ८० वर्षांहून अधिक जीर्ण झालेले ३५ फुटी झाड कोसळले. या घटनेत वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी मात्र टळली.एस.व्ही. रोड हा वर्दळीचा रोड असून आजूबाजूला इमारती आहेत. तसेच तेथे क्लासेसही आहेत. संध्याकाळी क्लास सुटल्यावर येथे विद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र, ते सुटण्यापूर्वीच ४ च्या सुमारास रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेले झाड मोठा आवाज करत कोसळले. झाडाच्या आजूबाजूला कोणीही नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. झाड पडल्याचा मोठा आवाज आल्याने आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी धावत आले. झाड पडल्याने तीन दुचाकींचे नुकसान झाले. झाडाच्या समोरील बाजूला आणि झाडाच्या बाजूला असलेली जाळी तुटली. तसेच, समोरील भिंतीलादेखील तडे गेल्याने कार्यालयाच्या समोरील भागही तुटला. झाड मुळापासून उखडून निघाले.रस्त्याच्या मध्यभागीच झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. येण्याजाण्याचा रस्ताही बंद झाला. झाड कोसळल्याची घटना समजताच आपत्कालीन विभागाचे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. रस्ता सुरळीत सुरू करण्यासाठी तब्बल दोन तासांहून अधिक वेळ लागला.