शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

"मी एकनाथ संभाजी शिंदे..."; सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री, एक विलक्षण प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:09 IST

डोळ्यादेखत पाण्यात मुले बुडाली, तेव्हा सोडले होते राजकारण...

ठाणे  : घरची गरीब परिस्थिती... रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना ‘शिवसेना’ या चार अक्षरांशी जोडले गेलेले एकनाथ शिंदे हे आता राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा हा राजकीय प्रवास अतिशय खडतर, नानाविध संकटे व आव्हाने यांनी भरलेली मालिका आहे. शिवसेनेचे चौथे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना लाभला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांची वाटचाल शक्य झाली आहे. बघूया त्यांचा जीवनप्रवास...

असे बनले जनतेचे नेते -शिंदे यांचा जन्म अहिर येथे (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) ६ मार्च १९६४ रोजी झाला. परंतु त्यांची कार्यभूमी ठाणेच राहिली. शिंदे यांनी १९९७ साली महापालिकेची निवडणूक लढवली व ते नगरसेवक झाले. शिंदे यांच्या जीवनात अचानक एका अपघातामुळे मोठा आघात झाला. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या शिंदे यांच्या मनाला उभारी देण्याकरिता आनंद दिघे यांनी २००१ मध्ये त्यांची सभागृहनेतेपदी निवड केली. या पदावर त्यांनी तीन वर्षे उत्तम काम करुन आपल्यातील नेतृत्व गुणांची चमक दाखवली. ठाणे जिल्हा पिंजून काढला. २००४ साली त्यांनी पहिल्यांदा ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढविली व निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेने त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. जिल्हाप्रमुख व आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच नेते होते. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये शिंदे यांनी भाग घेतला. गरजवंतांना स्वस्तात धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी केलेले आंदोलन, टंचाईच्या काळात नागरिकांना पामतेल उपलब्ध करुन देणे, नागरिकांच्या समस्यांसाठी प्रशासनाच्या विरोधात अनेक आंदोलने केल्याने शिंदे जनतेचे नेते बनले. २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या विजय झाला. २०१४ मध्ये ते विरोधी पक्षनेतेही झाले.

विधिमंडळातील कामगिरी -२००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला, ठाण्यातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा जटिल प्रश्न सोडवण्याकरिता ठाणेकरांच्या जिव्हाळ्याची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, मेट्रो, नवीन ठाणे स्थानक, पोलीस दलाचे आधुनिकीकरण अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला व सत्ता प्राप्त होताच समस्यांवर मात केली.

एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन -मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी निर्मिती करण्यात आलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) पुढे आर्थिक आव्हान उभे राहिले होते. मृत्युशय्येवर असलेल्या या विभागाला पुनरुज्जीवित करण्याचे काम शिंदे यांनी केले. समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अल्पावधीत केलेली प्रभावी अंमलबजावणी बघून विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर देण्यात आली.

आरोग्यमंत्री म्हणून पाडली छाप -२०१९ मध्ये शिंदे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी आली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले.

सीमाप्रश्नावरून भोगला तुरुंगवास -अनेक आक्रमक आंदोलनांमुळे शिंदे यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. एवढेच नाही तर १९८६ मध्ये सीमाप्रश्नावरून झालेल्या आंदोलनात शिंदे यांनी आक्रमकपणे भाग घेतला होता. या आंदोलनामुळे शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी शिंदे हे ४० दिवस बेल्लारी तुरुंगात होते.

डोळ्यादेखत पाण्यात मुले बुडाली, तेव्हा सोडले होते राजकारण -२ जून २००० रोजी एकनाथ शिंदे त्यांचा ११ वर्षांचा मुलगा दिपेश आणि ७ वर्षांची मुलगी शुभदा यांना घेऊन सातारा येथे गेले होते. बोटिंग करत असताना अपघात झाला आणि दोन्ही मुले डोळ्यासमोर बुडाली. त्यावेळी शिंदे यांचे तिसरे अपत्य श्रीकांत अवघे १४ वर्षांचे होते. एका मुलाखतीत या वेदनादायक घटनेची आठवण करून देताना शिंदे म्हणाले होते, “तो माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. मी पूर्णपणे तुटलो होतो. मी सर्वकाही सोडण्याचा निर्णय घेतला, राजकारणही.” या घटनेला आता २२ वर्षे झाली आहेत. त्यावेळी शिंदे यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा आनंद दिघे यांनीच त्यांना परत आणले.

मुलाला केले डॉक्टर, नंतर खासदार -परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले, तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. श्रीकांत एकनाथ शिंदे हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा