शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

हटके स्टोरी - जलसंवर्धन अभियानाला अध्यात्माची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 23:36 IST

पाड्यांमध्ये पाणीपुरवठा। पालेभाज्यांचे घेतात उत्पादन

पंकज पाटील 

बदलापूर : शहापूर तालुका हा मुंबईची तहान भागवणारा तालुका असला, तरी त्या तालुक्यातील ग्रामस्थ हे पाण्यासाठी भटकंती करतात. या समस्येवर तोडगा काढण्यात सरकारलाही अपयश आले आहे. मात्र, आता शहापूर तालुक्यातील अध्यात्मिक गुरूंनी या तालुक्याला पाणीदार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जलसंवर्धन मोहिमेला अध्यात्माची जोड दिल्याने शहापूर तालुक्यातील आष्टी आणि परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला. आता उन्हाळ्यातही ग्रामस्थ पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत.

चांगले काम हीच परमेश्वराची प्रार्थना, हा अध्यात्म विचारांचा मूळ गाभा प्रत्यक्षात आणत शहापूर तालुक्यातील सत्संग परिवाराने परिसरातील शेकडो गावपाड्यांच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई दूर करण्याचा निर्धार केला. शहापूरमधील टाकीपठार येथील फुलनाथबाबा यांचे हजारो शिष्यगण आहेत. आपल्या भोवतालची परिस्थिती बदलायची असेल, तर त्याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी, या भावनेने यंदा फुलनाथबाबा यांनी स्वत: त्यांच्या शिष्यांसोबत डिसेंबरपासून ओढ्यातील गाळउपसा मोहीम सुरू केली. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी लागणारा खर्च भक्तांनी दिलेली वर्गणी, देणगी आणि मठातील निधीतून भागवला जातो. लोकसहभागाच्या माध्यमातून येणाऱ्या यंत्रणेचा वापर करून ते काम अविरतपणे सुरू आहे. स्वत: फुलनाथबाबा या कामावर लक्ष ठेवून आहेत.खरेतर, तालुक्यातील सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी मुसोई, आडिवलीसारखी छोटी धरणे, पाझर तलाव आहेत. याशिवाय, सरकारने नैसर्गिक ओढे, नाले आणि नद्याांवर बंधारे बांधले आहेत. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी बहुतेक बंधाऱ्यांचा जलसंचयनासाठी उपयोग होत नाही. त्यामुळे सत्संग परिवाराने तहसीलदार, वनविभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेऊन त्यांनी विविध नाले तसेच नदीपात्रातील गाळ काढण्याची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत भर्डेपाडा, भोईपाडा, चिखलगाव, मानेखिंड, अष्टे, वेहळोली मुका ओहोळ आदी ठिकाणचा गाळ उपसून झाला आहे. या मोहिमेत काम करणाºया सर्व कामगारांना रोज मजुरी दिली जाते. याव्यतिरिक्त सकाळी नाश्ता, पिण्याचे पाणी, दुपारचे जेवण मठावरून कामाच्या ठिकाणी पाठवले जाते. तालुक्यातील शिष्यगण आपले काम सांभाळून या मोहिमेला हातभार लावत आहे.पाऊस पडेपर्यंत सुरू राहणार मोहीमपाऊस पडेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे फुलनाथबाबा यांनी सांगितले. फुलनाथबाबा हे स्वत: कृषी सहायक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या अनुभवाचा फायदा या मोहिमेला होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी