शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

हटके स्टोरी - जलसंवर्धन अभियानाला अध्यात्माची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 23:36 IST

पाड्यांमध्ये पाणीपुरवठा। पालेभाज्यांचे घेतात उत्पादन

पंकज पाटील 

बदलापूर : शहापूर तालुका हा मुंबईची तहान भागवणारा तालुका असला, तरी त्या तालुक्यातील ग्रामस्थ हे पाण्यासाठी भटकंती करतात. या समस्येवर तोडगा काढण्यात सरकारलाही अपयश आले आहे. मात्र, आता शहापूर तालुक्यातील अध्यात्मिक गुरूंनी या तालुक्याला पाणीदार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जलसंवर्धन मोहिमेला अध्यात्माची जोड दिल्याने शहापूर तालुक्यातील आष्टी आणि परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला. आता उन्हाळ्यातही ग्रामस्थ पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत.

चांगले काम हीच परमेश्वराची प्रार्थना, हा अध्यात्म विचारांचा मूळ गाभा प्रत्यक्षात आणत शहापूर तालुक्यातील सत्संग परिवाराने परिसरातील शेकडो गावपाड्यांच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई दूर करण्याचा निर्धार केला. शहापूरमधील टाकीपठार येथील फुलनाथबाबा यांचे हजारो शिष्यगण आहेत. आपल्या भोवतालची परिस्थिती बदलायची असेल, तर त्याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी, या भावनेने यंदा फुलनाथबाबा यांनी स्वत: त्यांच्या शिष्यांसोबत डिसेंबरपासून ओढ्यातील गाळउपसा मोहीम सुरू केली. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी लागणारा खर्च भक्तांनी दिलेली वर्गणी, देणगी आणि मठातील निधीतून भागवला जातो. लोकसहभागाच्या माध्यमातून येणाऱ्या यंत्रणेचा वापर करून ते काम अविरतपणे सुरू आहे. स्वत: फुलनाथबाबा या कामावर लक्ष ठेवून आहेत.खरेतर, तालुक्यातील सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी मुसोई, आडिवलीसारखी छोटी धरणे, पाझर तलाव आहेत. याशिवाय, सरकारने नैसर्गिक ओढे, नाले आणि नद्याांवर बंधारे बांधले आहेत. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी बहुतेक बंधाऱ्यांचा जलसंचयनासाठी उपयोग होत नाही. त्यामुळे सत्संग परिवाराने तहसीलदार, वनविभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेऊन त्यांनी विविध नाले तसेच नदीपात्रातील गाळ काढण्याची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत भर्डेपाडा, भोईपाडा, चिखलगाव, मानेखिंड, अष्टे, वेहळोली मुका ओहोळ आदी ठिकाणचा गाळ उपसून झाला आहे. या मोहिमेत काम करणाºया सर्व कामगारांना रोज मजुरी दिली जाते. याव्यतिरिक्त सकाळी नाश्ता, पिण्याचे पाणी, दुपारचे जेवण मठावरून कामाच्या ठिकाणी पाठवले जाते. तालुक्यातील शिष्यगण आपले काम सांभाळून या मोहिमेला हातभार लावत आहे.पाऊस पडेपर्यंत सुरू राहणार मोहीमपाऊस पडेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे फुलनाथबाबा यांनी सांगितले. फुलनाथबाबा हे स्वत: कृषी सहायक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या अनुभवाचा फायदा या मोहिमेला होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी