शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

डोंबिवलीत वर्दळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST

डोंबिवली: ब्रेक द चेन अंतर्गत बुधवार रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली. परंतु, नेमके काय उघडे, काय बंद याबाबतची ...

डोंबिवली: ब्रेक द चेन अंतर्गत बुधवार रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली. परंतु, नेमके काय उघडे, काय बंद याबाबतची माहिती मिळत नसल्याने नागरिकांनी गुरुवारी शहरभर पाहणी करण्याच्या उद्देशाने फेऱ्या मारल्या. त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर वर्दळ दिसून आली.

सातत्याने पोलीस, महापालिका यंत्रणा याबाबत सतर्क करत असूनही सकाळच्या वेळेत नागरिक भाजी खरेदीसाठी बाहेर पडले होते. फडके पथ, चिमणी गल्ली, रामनगर, गोग्रासवाडी, शेलारनाका, ठाकुर्ली पोलीस चौकी, आजदे, सांगाव, सागरली परिसर तसेच पश्चिमेला गरिबाचा वाडा, उमेशनगर, घनश्याम गुप्ते पथ या ठिकाणी दिवसभर वर्दळ दिसून आली. खाद्यपदार्थ, अन्य जीवनावश्यक दुकाने सुरू असल्याने फारसा गोंधळ कुठेही दिसून आला नाही. कपडा, सुवर्ण, इलेक्ट्रिक आदी दुकाने बंद होती.

* रिक्षा, बस वाहतूक सुरू असल्याने त्यांची वाहतूक शहरात सर्वत्र दिसून आली, विविध स्टॅण्डवर रिक्षा दिसून आल्या नाहीत. मात्र, तरीही रिक्षा न मिळाल्याने कोणाचीही गैरसोय झाली नाही, सगळे काही सुरळीत सुरू होते.

* लोकल सेवा सुरू होत्या, गर्दी सकाळच्या वेळी होती. त्यानंतर दुपारी काहीशी कमी झाली असली तरी कामावर जाणारे प्रवासी होतेच. संध्याकाळी चाकरमानी कामावरून घरी परतत असल्याने तेव्हादेखील लोकलमध्ये गर्दी असल्याचे मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

----///-----/---------