शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श, अर्धी पाणीकपात मागे

By admin | Updated: May 7, 2017 06:07 IST

मे महिन्यातील उन्हाचे पोळून काढणारे चटके सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सध्या सोसावी लागणारी १४ टक्के

सुरेश लोखंडे/ लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मे महिन्यातील उन्हाचे पोळून काढणारे चटके सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सध्या सोसावी लागणारी १४ टक्के पाणीकपात अचानक निम्म्याने कमी करून ७ टक्के केल्याने उन्हाच्या झळा सोसणाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा मात्र तुलनेने कमी सोसाव्या लागणार आहेत.गतवर्षी चांगला पाऊस होऊनही लागू केलेल्या १४ टक्के पाणीकपातीमुळे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांमधील गृहिणींना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, पाणीपुरवठा विभागाने अचानक कपात ७ टक्क्यांवर आणल्याने महिलांना सुखद धक्का बसला आहे. आतापर्यंत महिनाभरात चार दिवस पाणीकपात लागू होती. आता महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांना केल्या आहेत. पाणीटंचाईचा यापूर्वीचा कटू अनुभव लक्षात घेऊन नोव्हेंबर महिन्यापासूनच वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यात आले होते. १५ जुलैपर्यंत पाणी पुरवणे आवश्यक असल्यामुळे जादा पाणी उचलणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले होते. पाण्याचे आॅडिट करून काही महापालिकांना दंडासह पाणी बंद करण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. सुमारे १० टक्क्यांपर्यंत जादा पाणी उचलण्यास अनुमती देताना महापालिकांनी त्या बदल्यात आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण निश्चित केले होते. डिसेंबरपासून ७ टक्के लागू केलेली पाणीकपात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात १४ टक्के करण्यात आली. परिणामी, महिन्यातून चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता. आता धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन ही कपात ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत दुप्पट साठा धरणात आहे. त्यामुळे ऐन मे महिन्याच्या कडकडीत उन्हाळ्यात कपात कमी करून दिलासा दिला आहे. बारवी धरणासह उल्हासनदी, बदलापूर बंधारा आणि मोहने बंधारा यातून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांप्रमाणेच अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांची पाणीकपात ७ टक्क्यांनी कमी केली आहे. परिणामी, महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण एमआयडीसी, एमजेपी, शहाड-टेमघर आणि महापालिकांच्या पाणीपुरवठा यंत्रणांकडून अवलंबले जाणार आहे. निवडणूक काळात राजकीय नेत्यांनी कपात रद्द करून जादा पाणीपुरवठ्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. ‘शहरात येणारे जादा पाणी रहिवाशांऐवजी अवैध धंदे, बांधकामे, कारखाने, हॉटेलवाले यांना जात आहे’, असे खडे बोल गृहिणींनी राजकीय नेते व उमेदवार यांना सुनावले होते. कपात रद्द झाली असली तरी नागरिकांनी पाण्याचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व महापालिका आणि नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्याएवढेच पाणी आताही उचलावे लागणार आहे. त्यानुसार, आम्ही महापालिकांना पाणीपुरवठा करीत आहोत.- विवेकानंद चौधरी, व्यवस्थापकीय संचालक, शहाड-टेमघरपाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा दनघमीमध्ये आजचा साठा, टक्केवारी आणि मागील वर्षी आजच्या दिवसाच्या पाणीसाठ्याची टक्केवारी धरणएकूण साठा आजचा साठायंदाची % मागीलवर्षाची %भातसा९४२.१०४१२.७८४३.८१३७.२२मोडक१२८.९३८२.२८६३.८२१२.४६तानसा१४५.०८४८.२८३३.२८३०.१८बारवी१८०.०३१०२.११४३.८११९.९१आंध्रा३३९.१४९६.००२८.३११४.५२