शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

हुश्श, अर्धी पाणीकपात मागे

By admin | Updated: May 7, 2017 06:07 IST

मे महिन्यातील उन्हाचे पोळून काढणारे चटके सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सध्या सोसावी लागणारी १४ टक्के

सुरेश लोखंडे/ लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मे महिन्यातील उन्हाचे पोळून काढणारे चटके सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सध्या सोसावी लागणारी १४ टक्के पाणीकपात अचानक निम्म्याने कमी करून ७ टक्के केल्याने उन्हाच्या झळा सोसणाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा मात्र तुलनेने कमी सोसाव्या लागणार आहेत.गतवर्षी चांगला पाऊस होऊनही लागू केलेल्या १४ टक्के पाणीकपातीमुळे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांमधील गृहिणींना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, पाणीपुरवठा विभागाने अचानक कपात ७ टक्क्यांवर आणल्याने महिलांना सुखद धक्का बसला आहे. आतापर्यंत महिनाभरात चार दिवस पाणीकपात लागू होती. आता महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांना केल्या आहेत. पाणीटंचाईचा यापूर्वीचा कटू अनुभव लक्षात घेऊन नोव्हेंबर महिन्यापासूनच वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यात आले होते. १५ जुलैपर्यंत पाणी पुरवणे आवश्यक असल्यामुळे जादा पाणी उचलणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले होते. पाण्याचे आॅडिट करून काही महापालिकांना दंडासह पाणी बंद करण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. सुमारे १० टक्क्यांपर्यंत जादा पाणी उचलण्यास अनुमती देताना महापालिकांनी त्या बदल्यात आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण निश्चित केले होते. डिसेंबरपासून ७ टक्के लागू केलेली पाणीकपात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात १४ टक्के करण्यात आली. परिणामी, महिन्यातून चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता. आता धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन ही कपात ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत दुप्पट साठा धरणात आहे. त्यामुळे ऐन मे महिन्याच्या कडकडीत उन्हाळ्यात कपात कमी करून दिलासा दिला आहे. बारवी धरणासह उल्हासनदी, बदलापूर बंधारा आणि मोहने बंधारा यातून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांप्रमाणेच अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांची पाणीकपात ७ टक्क्यांनी कमी केली आहे. परिणामी, महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण एमआयडीसी, एमजेपी, शहाड-टेमघर आणि महापालिकांच्या पाणीपुरवठा यंत्रणांकडून अवलंबले जाणार आहे. निवडणूक काळात राजकीय नेत्यांनी कपात रद्द करून जादा पाणीपुरवठ्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. ‘शहरात येणारे जादा पाणी रहिवाशांऐवजी अवैध धंदे, बांधकामे, कारखाने, हॉटेलवाले यांना जात आहे’, असे खडे बोल गृहिणींनी राजकीय नेते व उमेदवार यांना सुनावले होते. कपात रद्द झाली असली तरी नागरिकांनी पाण्याचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व महापालिका आणि नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्याएवढेच पाणी आताही उचलावे लागणार आहे. त्यानुसार, आम्ही महापालिकांना पाणीपुरवठा करीत आहोत.- विवेकानंद चौधरी, व्यवस्थापकीय संचालक, शहाड-टेमघरपाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा दनघमीमध्ये आजचा साठा, टक्केवारी आणि मागील वर्षी आजच्या दिवसाच्या पाणीसाठ्याची टक्केवारी धरणएकूण साठा आजचा साठायंदाची % मागीलवर्षाची %भातसा९४२.१०४१२.७८४३.८१३७.२२मोडक१२८.९३८२.२८६३.८२१२.४६तानसा१४५.०८४८.२८३३.२८३०.१८बारवी१८०.०३१०२.११४३.८११९.९१आंध्रा३३९.१४९६.००२८.३११४.५२