शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

सगळंच गेलं की हो! आता जगायचं कसं ते सांगा?; उल्हासनगरातील बेहाल पुरग्रस्तांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 16:45 IST

उल्हासनगरातील अनेक भागांना पुराचा फटका, शेकडो जण बेघर, महापालिका शाळेत आश्रय

- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील वालधुनी नदी किनाऱ्यावरील मीनाताई ठाकरेनगर, प्रबुद्धनगर, करोतीयानगर आदी परिसरतील शेकडो जणांना उल्हास नदीच्या ब्लॅक पाण्याचा फटका बसला. शेकडो जणांच्या घरात पाणी घुसल्याने, त्यांच्यात एकच धावपळ उडाली. लहान मुले, वृद्ध, महिला आदींना आपत्कालीन पथकांच्या जवानांनी बोट रबरी ट्यूबने बाहेर काढण्यात आले. 

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा सर्वाधिक धोका किनाऱ्यावरील झोपडपट्टीला असतो. मात्र बुधवारी रात्री २ वाजण्याच्या दरम्यान नदीचे पाणी भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, दुर्गानगर आदी परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान उल्हास नदीचे काळे पाणी वालधुनी नदीत आल्याने करोतीयानगर, प्रबुद्धनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरे नगरात घुसल्याने, नागरिकांत पळापळ सुरू झाली. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला पुराचे पाणी झोपडपट्टी परिसरात घुसल्याची माहिती मिळताच, पथकाने धाव घेऊन पुरात अडकलेल्या वृद्ध, महिला, लहान मुलासह नागरिकांना बाहेर काढण्यात आले. महापालिका शाळे मध्ये बेघर झालेल्या नागरिकांना ठेवण्यात आले. 

महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे, आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके आदींनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बेघर झालेल्या नागरिकांना राहणे व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केली असून अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, टीव्ही व इतर इलेक्ट्रिक साहित्य खराब झाले. आता जगायचे कसे? असा प्रश्न शेकडो नागरिका समोर उभा ठाकला असून शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी होत आहे. बेघर झालेल्या नागरिकांत वृद्ध, लहान मुले, बिमार नागरिकांची गैरसोय होत असून महापालिकेनेही मदतीसाठी पुढे येण्याची मागणी होत आहे. महापालिका बेघर झालेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे संकेत महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. 

सामाजिक संस्था व दानशूरांनी पुढे यावे- उपमहापौर शहरातील शेकडो जनाला पुराचा फटका बसला असून अश्यावेळी शासनासह सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी पुढे यावे. असे आवाहन उपमहापौर भगवान भालेराव यांनी केले. महापालिका पुराचा फटका बसलेल्या नागरिकां सोबत असून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भालेराव म्हणाले.

टॅग्स :Rainपाऊस