शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:17 IST

दुकानदारांची धावपळ; बदलापूर पालिकेची धडक कारवाई

बदलापूर : मागील काही महिन्यांपासून सातत्याने रखडत असलेली बदलापूरमधीलअतिक्रमणविरोधी कारवाई अखेर गुरुवारी पार पडली. या वेळी पूर्व भागातील शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. तर पालिकेच्या कारवाईचा जोर पाहता गाफील असलेल्या दुकानदारांनी अचानक आपले नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण काढण्यासाठी धावपळ सुरू केली. पुढील दोन दिवस ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी स्पष्ट केले.बदलापूरमध्ये गेल्या काही वर्षांत अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांनी डोके वर काढले आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात रस्ता रुंदीकरणाचे काम सातत्याने रखडत असल्याने अतिक्रमणे वाढत होती. पूर्व भागातून जाणाऱ्या काटई - कर्जत महामार्गाशेजारीही अशाच प्रकारचे अतिक्रमण वाढले होते. कंपन्यांचे शोरूम, हॉटेल्स, दुकानांचे शेड बेकायदा उभे केले जात होते. तर अनेक बांधकामे थेट अर्धवट रस्त्यापर्यंत येऊन ठेपली होती. यावर कारवाईसाठीही यापूर्वीच्या मुख्याधिकाºयांनी हात आखडता घेतला होता. मात्र मुख्याधिकारी बोरसे यांनी पूर्वेतील ७६८ अतिक्रमणांना नोटीस दिली होती. त्यानुसार एकदा रखडलेली कारवाई अखेर गुरुवारी झाली. पूर्वेतील वेंकीस हॉटेलच्या अतिक्रमणापासून कारवाई सुरू होत पुढे घोरपडे चौकापर्यंत आली. या वेळी कित्येक वर्षे जुन्या अतिक्रमणांवर पहिल्यांदा कारवाई झाली. बोरसे यांच्याबरोबरच नगररचनाकार, शहर अभियंते, इतर विभागाचे अधिकारी, सफाई कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा या कारवाईसाठी मागवण्यात आला होता. कारवाईदरम्यान होणारे वाद टाळण्यासाठी नागरिकांना दूर ठेवण्यात आले होते. तर महामार्गावरची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचीही फौज तैनात केली होती. यापूर्वी अनेक कारवायांमध्ये घोरपडे चौक ते शिरगाव प्रवेशद्वारापर्यंतच्या अतिक्रमणांवर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे पालिकेच्या नोटिसीनंतरही दुकानदार निर्धास्त राहत होते.दुकानदारांनीही केले सहकार्यगुरुवारी सुरू झालेल्या कारवाईचे स्वरूप पाहता सकाळी १०नंतर अचानक सर्वच दुकानदारांनी आपापली अतिक्र मणे काढण्यास सुरुवात केली.अनेक दुकानदारांनी स्वखर्चाने जेसीबी मागवत बांधकाम तोडले. ही कारवाई दोन दिवसांत पूर्ण करून अतिक्र मणे काढली जातील, असे बोरसे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बदलापूर-कर्जत महामार्ग अखेर मोकळा श्वास घेणार आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणbadlapurबदलापूर