शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

येऊरच्या हुमायून बंधाऱ्याची होणार डागडुजी; वनविभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:51 IST

येऊर जंगलातील जलस्रोतांकडे लक्ष देण्याची गरज

सुरेश लोखंडेठाणे : शहरास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य जीव, प्राणी, पशू पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या प्राण्यांच्या पाण्यासाठी जंगलात बांधलेल्या हुमायून बंधाºयास गळती लागली आहे. त्यातील पाणी उन्हाळ्यात प्राण्यांना मिळत नाही. यावर मात करण्यासाठी त्याची डागडुजी करण्याचे काम वनविभाग हाती घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, या जंगलातील इतरही पाणीस्रोतांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वन्यप्रेमींचे मत आहे.

येऊरच्या जंगलात हरीण, बिबटे, काळवीट, माकड, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांप्रमाणेच दुर्मीळ जातींच्या पक्ष्यांचा मुक्तसंचार आहे. त्यांच्या पाण्यासाठी पाणवठ्यांच्या जवळपास बंधारेही येऊरमध्ये आहेत. पण, त्यांना गळती लागल्यामुळे त्यातील पाणी पावसाळ्याच्या काही कालावधीतच संपलेले असते. यापैकी हुमायून बंधारा हा एक आहे. येऊरमधील वायुसेना दलाच्या केंद्राजवळ हा बंधारा आहे. त्याची डागडुजी केल्यास त्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा तयार होईल आणि प्राण्यांनाही त्याचा वापर होईल. यासाठी त्याची डागडुजी करण्यासाठी वायुसेना दलाच्या कार्यालयाची सहमती घेण्याकरिता वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.

येऊरमध्ये बांधलेल्या या हुमायून बंधाºयास बरीच वर्षे झाली आहेत. या बंधाºयातील पाणी खाली सोडता यावे, याकरिता तीन दरवाजेदेखील या बंधाºयास आहेत. मात्र, त्यांचे लोखंडी फाळके अस्तित्वात नाही, त्यांची फ्रेमही जीर्ण झाली आहे. याशिवाय, बांधकामातून पाण्याचे फवारे उडत आहेत. या बंधाºयात गाळ साचलेला असल्यामुळे त्यात आवश्यक पाणीसाठा होत नाही. यामुळे या बंधाºया खाली असलेल्या पाणवठ्यांमध्येदेखील पाणी साचलेले नसल्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी जंगलभर भटकंती करावी लागते. यावर मात करण्यासाठी वनखात्याने येऊरच्या जंगलातील हुमायूनसह अन्यही ठिकठिकाणचे बंधारे, पाणवठ्यांची डागडुजी करून पाण्याचे स्रोत मोकळे करण्याचे काम हाती घेतले आहे.हे पाणीस्रोतही मजबूत करण्याची गरजयेऊरमधील या हुमायून बंधाºयानंतर चिखलाचे पाणी, कोंजरीचा पाणवठा, पटेलक्वारी, चेणा नदीजवळ ओवळा परिसरात चांभारखोंडा, टाकाचानाला, आंब्याचे पाणी, तर नागलाबंदरच्या सारजामोरी परिसरात तलावलीचा पाणवठा, तर ससूनवघर येथील करलेचे पाणी, कोरलाईचा व करंदीचा पाणवठा या घोडबंदर परिसरातील पाणवठ्यांचे पाणीस्रोत मजबूत करण्याची गरज आहे.

टॅग्स :forestजंगल