शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

येऊरच्या हुमायून बंधाऱ्याची होणार डागडुजी; वनविभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:51 IST

येऊर जंगलातील जलस्रोतांकडे लक्ष देण्याची गरज

सुरेश लोखंडेठाणे : शहरास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य जीव, प्राणी, पशू पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या प्राण्यांच्या पाण्यासाठी जंगलात बांधलेल्या हुमायून बंधाºयास गळती लागली आहे. त्यातील पाणी उन्हाळ्यात प्राण्यांना मिळत नाही. यावर मात करण्यासाठी त्याची डागडुजी करण्याचे काम वनविभाग हाती घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, या जंगलातील इतरही पाणीस्रोतांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वन्यप्रेमींचे मत आहे.

येऊरच्या जंगलात हरीण, बिबटे, काळवीट, माकड, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांप्रमाणेच दुर्मीळ जातींच्या पक्ष्यांचा मुक्तसंचार आहे. त्यांच्या पाण्यासाठी पाणवठ्यांच्या जवळपास बंधारेही येऊरमध्ये आहेत. पण, त्यांना गळती लागल्यामुळे त्यातील पाणी पावसाळ्याच्या काही कालावधीतच संपलेले असते. यापैकी हुमायून बंधारा हा एक आहे. येऊरमधील वायुसेना दलाच्या केंद्राजवळ हा बंधारा आहे. त्याची डागडुजी केल्यास त्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा तयार होईल आणि प्राण्यांनाही त्याचा वापर होईल. यासाठी त्याची डागडुजी करण्यासाठी वायुसेना दलाच्या कार्यालयाची सहमती घेण्याकरिता वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.

येऊरमध्ये बांधलेल्या या हुमायून बंधाºयास बरीच वर्षे झाली आहेत. या बंधाºयातील पाणी खाली सोडता यावे, याकरिता तीन दरवाजेदेखील या बंधाºयास आहेत. मात्र, त्यांचे लोखंडी फाळके अस्तित्वात नाही, त्यांची फ्रेमही जीर्ण झाली आहे. याशिवाय, बांधकामातून पाण्याचे फवारे उडत आहेत. या बंधाºयात गाळ साचलेला असल्यामुळे त्यात आवश्यक पाणीसाठा होत नाही. यामुळे या बंधाºया खाली असलेल्या पाणवठ्यांमध्येदेखील पाणी साचलेले नसल्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी जंगलभर भटकंती करावी लागते. यावर मात करण्यासाठी वनखात्याने येऊरच्या जंगलातील हुमायूनसह अन्यही ठिकठिकाणचे बंधारे, पाणवठ्यांची डागडुजी करून पाण्याचे स्रोत मोकळे करण्याचे काम हाती घेतले आहे.हे पाणीस्रोतही मजबूत करण्याची गरजयेऊरमधील या हुमायून बंधाºयानंतर चिखलाचे पाणी, कोंजरीचा पाणवठा, पटेलक्वारी, चेणा नदीजवळ ओवळा परिसरात चांभारखोंडा, टाकाचानाला, आंब्याचे पाणी, तर नागलाबंदरच्या सारजामोरी परिसरात तलावलीचा पाणवठा, तर ससूनवघर येथील करलेचे पाणी, कोरलाईचा व करंदीचा पाणवठा या घोडबंदर परिसरातील पाणवठ्यांचे पाणीस्रोत मजबूत करण्याची गरज आहे.

टॅग्स :forestजंगल