शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मानवी हक्क आयोगाच्या नोटिसीचा ठामपाला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 22:37 IST

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ६१ जणांच्या मृत्यूची नोंद केली नव्हती. यासंदर्भात तक्र ार आल्यानंतर ही नोंद का केली नाही ? याबाबत महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने ठामपाला नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितले होते. या नोटिसीनंतर शनिवारी पालिका प्रशासनाने ६१ जणांचे मृत्यु हे खासगी रुग्णालयात झाल्याची कबूली दिली आहे.

ठळक मुद्देखाजगी रुग्णालयातील ६१ मृत्यूची नोंदणी झाली नाहीमहापालिकेची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येबाबत माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या ठाणे महापालिकेने मानवी हक्क आयोगाच्या नोटिसीनंतर धक्कादायक खुलासा केला आहे. ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ६१ जणांच्या मृत्यूची नोंद केली नव्हती. यासंदर्भात तक्र ार आल्यानंतर ही नोंद का केली नाही ? याबाबत महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने ठामपाला नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितले होते. या नोटिसीनंतर शनिवारी पालिका प्रशासनाने ६१ जणांचे मृत्यु हे खासगी रुग्णालयात झाल्याची कबूली दिली आहे.महापालिकेच्या या खुलाशानंतर आतापर्यंत मृत्यूची ही आकडेवारी का लपविण्यात आली? ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी आयोगाची नोटीस येण्याची वाट का बघावी लागली ? तसेच ठाणे महापालिकेकडे दररोज मृत झालेल्यांची नोंद घेतली जात नाही का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.ठाण्यात मोठया संख्येने रु ग्णसंख्या वाढत असल्याने मार्चमध्ये असलेला मृत्यूचा दर हा एप्रिल महिन्यात चौपट झाला आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक कमी म्हणजे ०.३४ मृत्यूचा दर नोंदवला गेला. या महिन्यात केवळ ५० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, एप्रिल महिन्यात केवळ २२ दिवसांमध्ये १४८ ठाणेकरांचा या महामारीमध्ये मृत्यु झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील मृत्यूदर हा १.३० वर झेपावला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात रु ग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढली असून मृत्युची टक्केवारी देखील वाढली आहे. दररोज स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पालिका प्रशासन जाहीर करीत असलेली मृत्यूची आकडेवारी आणि प्रत्यक्षात तीन स्मशानभूमीमध्ये नोंद केलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे . ठाणे महापालिका हद्दीतील कोरोनामुळे मृत्यु होणाºया संख्येबाबत संभ्रम निर्माण झाल्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करून यासंदर्भात महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाकडे तक्र ार केली. यातक्र ारीमध्ये ६२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याचे त्यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आयोगाने ठाणे महापालिकेला यासंदर्भात १९ एप्रिल रोजी नोटीस पाठवून तीन आठवडयामध्ये खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शनिवारी पालिकेने आपल्या डॅशबोर्डमध्ये आतापर्यंत नोंद न झालेल्या ६१ जणांचा मृत्यू हा खाजगी हॉस्पिटलमध्ये झाला असल्याचे सांगत खाजगी हॉस्पिटलकडून प्राप्त झालेल्या ६१ मृत्यूचे पुनिर्योजन केले असल्याचे पालिका प्रशासनाने शनिवारी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस