शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

असुरक्षितता असेल तर डॉक्टर काम कसे करतील?

By admin | Updated: March 25, 2017 01:11 IST

गेली अनेक वर्षे मूलभूत प्रश्नांकडेही दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी डॉक्टरांकडे संपाशिवाय दुसरा उपाय नव्हता आणि नाही.

स्रेहा पावसकर / ठाणेगेली अनेक वर्षे मूलभूत प्रश्नांकडेही दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी डॉक्टरांकडे संपाशिवाय दुसरा उपाय नव्हता आणि नाही. एखादा रुग्ण दगावला की, मृत्यू नैसर्गिक असतो, हे कोणी मान्य करत नाही. डॉक्टरचीच चूक मानून नातेवाइकांकडून त्याला मारहाण होते. मात्र,जेव्हा रुग्णाला एखाद्या अवयवाची किंवा रक्ताची गरज असते, तेव्हा हेच नातेवाईक कुठे जातात, अशी असुरक्षितता असेल तर डॉक्टरांनी काम करायचे कसे, असे सवाल प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.विजय सुरासे यांनी उपस्थित केले.डॉक्टरही माणूसच आहे आणि रुग्णसेवेचे व्रत आम्ही स्वेच्छेने स्वीकारलेले असते. ज्ञान आणि उपलब्ध साधनांच्या आधारे रुग्णाला बरे करणे आम्हाला आवडते. मात्र, डॉक्टर हे देवासारखे असले, तरी देव नाहीत. प्रत्येक व्यवसायात चांगलीवाईट माणसे आहेत. अनेकदा रुग्णाच्या वाईट सवयींमुळे झालेला आजार, चुकीमुळे झालेला अपघात मृत्यूला कारणीभूत असतो, हे अनेकजण मान्य करत नाहीत. उलट, डॉक्टर आणि त्यातही निवासी डॉक्टर यांना लक्ष्य केले जाते. निवासी डॉक्टर हे २४ तासच नव्हे, तर कधीकधी ३६ तास सलग काम करतात. एकावेळी अनेक रुग्णांचा ताण त्यांच्यावर असतो. त्यांना सुट्या नसतात. खाजगी,कौटुंबिक आयुष्य त्यांना जगता येत नाही. त्यांच्या राहण्याची योग्य सोय नसते. मात्र, डॉक्टर ही राजकारण्यांची व्होटबँक नसल्याने आमच्या या प्रश्नांकडे शासन गंभीरपणे पाहत नाही, अशा शब्दांत डॉ.सुरासे यांनी खंत व्यक्त केली. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील, तर हॉस्पिटलमधील संवेदनशील विभागात विमानतळाप्रमाणे सुरक्षा असावी. सीआरपीएफचे जवान तैनात असावेत. सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांतील सोयीसुविधा अपग्रेड कराव्या आणि २४ तास उपलब्ध असाव्या. डॉक्टरांची संख्या वाढण्याकरिता भरती करावी. वैद्यकीय महाविद्यालयातील सीट वाढवाव्या. तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांवर निर्बंध असावेत, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.