शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

आधारवाडी डम्पिंग कसे बंद करायचे?

By admin | Updated: February 10, 2017 04:12 IST

शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईसाठी प्रशासनाला जबाबदार धरले जात असतानाच दुसरीकडे

कल्याण : शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईसाठी प्रशासनाला जबाबदार धरले जात असतानाच दुसरीकडे यासंदर्भात मंजूर केलेला ठरावच स्थायी समितीने प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला नसल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस हे डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याबाबतचा मंजूर केलेला ठराव तब्बल दोन महिने रोखून ठेवण्यामागे गौडबंगाल काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर, डम्पिंग बंद करण्याचे न्यायालयाला दिलेले आश्वासन पाहता तातडीने कृती केली असताना दुसरीकडे याबाबतचा मंजूर ठरावच न आल्याने कार्यवाही करायची तरी कशी, अशा पेचात केडीएमसी प्रशासन पडले आहे.आधारवाडी डम्पिंगची कचरा साठवण्याची क्षमता संपली असतानाही तेथे घनकचरा व्यवस्थापनाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयाने महापालिका क्षेत्रात नव्या बांधकामांना बंदी घातली होती. त्यानंतरही हे डम्पिंग बंद करण्याबाबत ठोस कृती झालेली नाही. २०१३-१४ पासून एकूण नऊ वेळा निविदा मागवल्या. सुरुवातीला त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता. फेब्रुवारीत निविदेला प्रतिसाद मिळाला. त्याला मान्यताही देण्यात आली होती. परंतु, संबंधित कंत्राटदाराकडून सहा महिने उलटूनही ठोस अशी कार्यवाही झाली नाही. त्यातच, त्याने काम करण्यास असमर्थता दर्शवल्याने कचरा डम्पिंगची समस्या जैसे थे राहिली.दरम्यान, पुन्हा प्रशासनाने काढलेल्या निविदा प्रक्रियेला उशिरा का होईना प्रतिसाद मिळाला. सौराष्ट्र एनव्हायरो प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीची निविदा प्रशासनाने मान्य केली. २९ कोटी ५३ लाखांच्या या प्रस्तावाला ३० नोव्हेंबरच्या स्थायी समितीच्या सभेत मान्यताही देण्यात आली. संबंधित कंत्राटदाराने कामाचे आदेश मिळाल्यापासून ३६ महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच तीन वर्षांत आधारवाडी येथील सध्याच्या डम्पिंग परिसरातील जमा असलेल्या कचऱ्याचे बायो रिमेडिएशन करून कचऱ्याने व्यापलेल्या क्षेत्रापैकी कमीतकमी १९ हजार ४०० चौरस मीटर जागा मोकळी करणे व डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने कायमस्वरूपी बंद करावयाचे आहे. एकीकडे आधारवाडी डम्पिंग बंद करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली, तर दुसरीकडे मांडा येथे घनकचऱ्यासाठी सुनियोजित लॅण्डफीलसाठी आराखडा तयार करणे, बांधकाम करणे त्याचबरोबर ३ वर्षांच्या कालावधीसाठी दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे, या शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे, या भरावभूमी प्रकल्पालाही स्थायीने मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)१७ गावांचा कचरा टाकायचा कुठे ?डोंबिवली : केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांपैकी १७ गावांचा कचरा पूर्वेतील स्टार कॉलनीजवळील एका भूखंडावर टाकला जात आहे. त्यास इमारतींमधील रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांनी तेथेच दुसरी जागा पाहिली असून त्यालाही रहिवाशांनी गुरुवारी कडाडून विरोध केला. केडीएमसीच्या घंटागाड्यांद्वारे गावांमधील गोळा केलेला कचरा स्टार कॉलनीतील भूखंडावर एकत्र केला जातो. तेथे कचऱ्यातील प्लास्टिक वेगळे केले जाते. त्यानंतर, दुपारपर्यंत एक ट्रक आणि जेसीबीद्वारे हा कचरा कल्याणला डम्पिंग ग्राउंडमध्ये नेला जातो. पण, या कामात वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा कचरा तेथे साठल्याने परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होतो. त्याला पर्याय म्हणून नजीकच्याच मोकळ्या भूखंडामध्ये कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छता अधिकारी नरेंद्र धोत्रे यांनी जागेची पाहणी केली. पण, त्यासही रहिवाशांनी विरोध केला. मात्र, हा भूखंड नेमका कोणाचा आहे, तेथे कचरा टाकण्यास विरोध का झाला, हे कळू शकले नाही. कोणाचा रोष, राग नको, पण काम तर व्हायला हवे, यासाठी धोत्रे यांनी सध्या जेथे कचरा टाकला जात आहे, तेथेच त्याची तातडीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी कामही सुरू केले आहे.