शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

कारवाई कशी करणार? ‘बुस्टर’शिवाय पाणीच येत नाही; नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 15:29 IST

- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही जादा पाणीपुरवठा होऊनही शहरात समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना बुस्टर ...

- सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही जादा पाणीपुरवठा होऊनही शहरात समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना बुस्टर मोटरपंप लावल्याशिवाय पाणी मिळत नाही. परंतु, उल्हासनगर महापालिका त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, हे एक कोडे निर्माण झाले आहे.

उल्हासनगर मनपाच्या हद्दीतून बारमाही उल्हास नदी वाहत असूनही पिण्याच्या पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसी दरदिवशी १४० एमएलडी पाणीपुरवठा शहराला करत असतानाही अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने, शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाल्याची टीका होत आहे. बुस्टर मशीनशिवाय मुबलक पाणीपुरवठ्यासाठी ४०० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना काही वर्षांपूर्वी राबविण्यात आली. या योजने अंतर्गत मुख्य नवीन जलवाहिन्या, ११ उंच जलकुंभ, एक भूमिगत पाण्याची टाकी, पंपिंग स्टेशन व ५५ हजार पाण्याचे मीटर बसविण्यात आले. तरीही श्रीमंतांच्या परिसरात मुबलक पाणीपुरवठा, तर झोपडपट्टी भागात अर्धा तासाशिवाय पाणीपुरवठा होत नाही.

शहरात ८८ हजार नळजोडणी

शहरात १ लाख ७० हजार मालमत्ताधारक असताना घरगुती नळजोडणीची संख्या ८९ हजार, तर बिगर घरगुती नळजोडणी पाच हजारांपेक्षा जास्त आहेत. नळजोडणीचे सर्वेक्षण केल्यास नळजोडणी वाढण्याची शक्यता आहे.

 शहराचा भूभाग उंच सखल असल्याने व झोपडपट्टींमधील जलवाहिन्या जुन्या, गळक्या झाल्याने, बुस्टर मशीनशिवाय नागरिकांना पाणी येत नाही. याबाबत कारवाई करणे महापालिकेच्या विचाराधीन आहे.

- जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर मनपा

शहराला १४० एमएलडी पाणीपुरवठा

महापालिकेला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणीपुरवठा होत असूनही अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे १६० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. परंतु, प्रत्यक्षात १३० एमएलडी पाणीपुरवठा शहराला मंजूर आहे.

--------

* ‘बुस्टर’शिवाय पाणी नाही

शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा असल्याने नागरिकांना पाण्यासाठी बुस्टर मशीन लावावी लागते. त्यामुळे शहरांत घरोघरी ही मशीन आहे.

* दिवसाआड पाणीपुरवठा

लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त पाणीपुरवठा होऊनही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे.

-------

प्रतिक्रिया

उल्हासनगरला दरदिवशी १४० एमएलडी पाणीपुरवठा होऊनही झोपडपट्टी भागात पाणीटंचाई आहे, तर उच्चभ्रू भागात पाणीटंचाई का नाही, असा प्रश्न महापालिकेला आहे.

- शिवाजी रगडे, रहिवासी

--------

टॅग्स :water shortageपाणीकपातthaneठाणे