शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई कशी करणार? ‘बुस्टर’शिवाय पाणीच येत नाही; नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 15:29 IST

- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही जादा पाणीपुरवठा होऊनही शहरात समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना बुस्टर ...

- सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही जादा पाणीपुरवठा होऊनही शहरात समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना बुस्टर मोटरपंप लावल्याशिवाय पाणी मिळत नाही. परंतु, उल्हासनगर महापालिका त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, हे एक कोडे निर्माण झाले आहे.

उल्हासनगर मनपाच्या हद्दीतून बारमाही उल्हास नदी वाहत असूनही पिण्याच्या पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसी दरदिवशी १४० एमएलडी पाणीपुरवठा शहराला करत असतानाही अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने, शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाल्याची टीका होत आहे. बुस्टर मशीनशिवाय मुबलक पाणीपुरवठ्यासाठी ४०० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना काही वर्षांपूर्वी राबविण्यात आली. या योजने अंतर्गत मुख्य नवीन जलवाहिन्या, ११ उंच जलकुंभ, एक भूमिगत पाण्याची टाकी, पंपिंग स्टेशन व ५५ हजार पाण्याचे मीटर बसविण्यात आले. तरीही श्रीमंतांच्या परिसरात मुबलक पाणीपुरवठा, तर झोपडपट्टी भागात अर्धा तासाशिवाय पाणीपुरवठा होत नाही.

शहरात ८८ हजार नळजोडणी

शहरात १ लाख ७० हजार मालमत्ताधारक असताना घरगुती नळजोडणीची संख्या ८९ हजार, तर बिगर घरगुती नळजोडणी पाच हजारांपेक्षा जास्त आहेत. नळजोडणीचे सर्वेक्षण केल्यास नळजोडणी वाढण्याची शक्यता आहे.

 शहराचा भूभाग उंच सखल असल्याने व झोपडपट्टींमधील जलवाहिन्या जुन्या, गळक्या झाल्याने, बुस्टर मशीनशिवाय नागरिकांना पाणी येत नाही. याबाबत कारवाई करणे महापालिकेच्या विचाराधीन आहे.

- जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर मनपा

शहराला १४० एमएलडी पाणीपुरवठा

महापालिकेला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणीपुरवठा होत असूनही अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे १६० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. परंतु, प्रत्यक्षात १३० एमएलडी पाणीपुरवठा शहराला मंजूर आहे.

--------

* ‘बुस्टर’शिवाय पाणी नाही

शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा असल्याने नागरिकांना पाण्यासाठी बुस्टर मशीन लावावी लागते. त्यामुळे शहरांत घरोघरी ही मशीन आहे.

* दिवसाआड पाणीपुरवठा

लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त पाणीपुरवठा होऊनही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे.

-------

प्रतिक्रिया

उल्हासनगरला दरदिवशी १४० एमएलडी पाणीपुरवठा होऊनही झोपडपट्टी भागात पाणीटंचाई आहे, तर उच्चभ्रू भागात पाणीटंचाई का नाही, असा प्रश्न महापालिकेला आहे.

- शिवाजी रगडे, रहिवासी

--------

टॅग्स :water shortageपाणीकपातthaneठाणे