शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कारवाई कशी करणार? ‘बुस्टर’शिवाय पाणीच येत नाही; नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 15:29 IST

- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही जादा पाणीपुरवठा होऊनही शहरात समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना बुस्टर ...

- सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही जादा पाणीपुरवठा होऊनही शहरात समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना बुस्टर मोटरपंप लावल्याशिवाय पाणी मिळत नाही. परंतु, उल्हासनगर महापालिका त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, हे एक कोडे निर्माण झाले आहे.

उल्हासनगर मनपाच्या हद्दीतून बारमाही उल्हास नदी वाहत असूनही पिण्याच्या पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसी दरदिवशी १४० एमएलडी पाणीपुरवठा शहराला करत असतानाही अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने, शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाल्याची टीका होत आहे. बुस्टर मशीनशिवाय मुबलक पाणीपुरवठ्यासाठी ४०० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना काही वर्षांपूर्वी राबविण्यात आली. या योजने अंतर्गत मुख्य नवीन जलवाहिन्या, ११ उंच जलकुंभ, एक भूमिगत पाण्याची टाकी, पंपिंग स्टेशन व ५५ हजार पाण्याचे मीटर बसविण्यात आले. तरीही श्रीमंतांच्या परिसरात मुबलक पाणीपुरवठा, तर झोपडपट्टी भागात अर्धा तासाशिवाय पाणीपुरवठा होत नाही.

शहरात ८८ हजार नळजोडणी

शहरात १ लाख ७० हजार मालमत्ताधारक असताना घरगुती नळजोडणीची संख्या ८९ हजार, तर बिगर घरगुती नळजोडणी पाच हजारांपेक्षा जास्त आहेत. नळजोडणीचे सर्वेक्षण केल्यास नळजोडणी वाढण्याची शक्यता आहे.

 शहराचा भूभाग उंच सखल असल्याने व झोपडपट्टींमधील जलवाहिन्या जुन्या, गळक्या झाल्याने, बुस्टर मशीनशिवाय नागरिकांना पाणी येत नाही. याबाबत कारवाई करणे महापालिकेच्या विचाराधीन आहे.

- जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर मनपा

शहराला १४० एमएलडी पाणीपुरवठा

महापालिकेला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणीपुरवठा होत असूनही अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे १६० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. परंतु, प्रत्यक्षात १३० एमएलडी पाणीपुरवठा शहराला मंजूर आहे.

--------

* ‘बुस्टर’शिवाय पाणी नाही

शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा असल्याने नागरिकांना पाण्यासाठी बुस्टर मशीन लावावी लागते. त्यामुळे शहरांत घरोघरी ही मशीन आहे.

* दिवसाआड पाणीपुरवठा

लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त पाणीपुरवठा होऊनही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे.

-------

प्रतिक्रिया

उल्हासनगरला दरदिवशी १४० एमएलडी पाणीपुरवठा होऊनही झोपडपट्टी भागात पाणीटंचाई आहे, तर उच्चभ्रू भागात पाणीटंचाई का नाही, असा प्रश्न महापालिकेला आहे.

- शिवाजी रगडे, रहिवासी

--------

टॅग्स :water shortageपाणीकपातthaneठाणे