शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

राहुल गांधीच्या यात्रेचा मार्ग बदलण्याचा अधिकार त्यांना कसा? मनोज शिंदे यांचा आव्हाडांना अप्रत्यक्ष सवाल

By अजित मांडके | Updated: March 13, 2024 16:51 IST

भारत जोडो यात्रेनिमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी हे ठाणे जिल्ह्यात येत असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

ठाणे : कॉंग्रसेचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ठाण्यात येत आहेत. परंतु त्यांच्या यात्रेचा मार्ग हा वागळे इस्टेट मधून नियोजीत असतांना तो कळवा, मुंब्य्रातून का वळविण्यात आला असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशचे नेते मनोज शिंदे यांनी उपस्थित करीत थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले आहे. परंतु शिंदे यांनी उपस्थित केलेल्या सवालनंतर ठाण्यातील कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

भारत जोडो यात्रेनिमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी हे ठाणे जिल्ह्यात येत असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. परंतु नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्यात राहुल गांधी येत असतांना त्यांची पत्रकार परिषद भलतेच घेताहेत असा थेट आरोप आता मनोज शिंदे यांनी केला आहे.राहुल गांधी ठाणे जिल्ह्यात येत असतांना त्यांची यात्रा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघातून वळवण्यात आल्याने राजकीय वतुर्ळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची फारशी ताकद उरलेली नाही. संघटनात्मक पातळीवर भिवंडीतील ठराविक मतदार संघापुरते उरलेल्या काँग्रेसने राहुल गांधींच्या यात्रेचा मुक्काम याच भागात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मात्र भिवंडी वरून निघणारी यात्रा खारेगाव टोल नाक्यावरून थेट मुंब्य्राच्या दिशेने जाणार आहे. येथून कळव्यात आणि पुढे ठाण्यातील जांभळी नाका येथे यात्रा येईल.

जिल्ह्यात कॉंग्रेसची अवस्था फारशी चांगली नाही. त्यात जितेंद्र आव्हाडांनीच या यात्रेचा बराचसा भार आपल्या खांद्यावर घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच या यात्रेचा मार्ग हा त्यांच्या कळवा मुंब्य्रातून जाणार असल्याचे बोलले जात आहे. या यात्रेच्या मागार्ची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार राजन विचारे, कॉंग्रेस ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते. परंतु या यात्रेच्या नियोजनात डावलण्यात आल्याने काँग्रेसचा एक गट नाराज असून त्यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी या पत्रकार परिषदेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत.

राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली आहे. महाविकास आघाडीचे नेते या यात्रेत सामील होऊ शकतात.या यात्रेसाठी पक्षाने प्रत्येक ठिकाणी समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमार्फत यात्रेचे नियोजन केले जात आहे. असे असताना यात्रेच्या नियोजनाबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे पत्रकार परिषद कशी घेऊ शकतात. असा सवाल उपस्थित करीत जी यात्रा ठाण्यातील वागळे पट्यातून जाणार असतांना तो मार्गच यातून वगळण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा