शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

रिक्षावाल्या काकांवरही आता विश्वास कसा ठेवायचा? अपहृत चिमुकल्या कैवल्यची साडेतीन तासांत सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:23 IST

शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षावाल्या काकानेच अपहरण केल्याने विश्वास ठेवायचा कोणावर? हा सवाल उपस्थित झाला आहे.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : पैशांच्या हव्यासापोटी मुलांचे अपहरण केल्याच्या घटना कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नवीन नाहीत. २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कैवल्य भोईर या ७ वर्षांच्या मुलाचे अपहरणाच्या प्रकाराने काळजाचा ठोका चुकविला; मानपाडा पोलिसांनी साडेतीन तासांत त्याची सुखरूप सुटका करत आरोपींना बेड्या ठोकल्या. यात शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षावाल्या काकानेच अपहरण केल्याने विश्वास ठेवायचा कोणावर? हा सवाल उपस्थित झाला आहे.

२८ मार्चला पूर्वेकडील रिजन्सी अनंतम गृहसंकुलातील महेश भोईर यांच्या खासगी शाळेत शिकणाऱ्या कैवल्यचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी दोन कोटींची खंडणी मागितली होती. ही माहिती मिळताच तपासकामी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी संपत फडोळ, महेश राळेभात, कलगोंडा पाटील, अभिजित पाटील अधिकाऱ्यांची पथके नेमली.  कैवल्य सकाळी सात वाजता शाळेत जाण्यासाठी रिक्षातून निघाला होता. सकाळी रिक्षाचालक वीरेन पाटीलच्या मोबाइलवरून कैवल्यचे वडील महेश यांना व्हॉट्सॲप कॉल आला. अनोळखी व्यक्तीने संवाद साधत तुमच्या मुलाचे रिक्षा चालकासह अपहरण केले आहे. २ कोटी रुपये द्यावे लागतील, पोलिसांना कळविल्यास दोघांना मारण्याची धमकी दिली होती.

वाढदिवसाच्या पार्टीत शिजला कटकैवल्यचे वडील महेश यांना एका जमिनीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपये मिळाले होते. याची माहिती वीरेन आणि संकेत यांना होती. त्यातूनच कोनगावात राहणाऱ्या विजय देवडेकर याच्या २७ मार्चच्या वाढदिवसाच्या पार्टीत अपहरणाचा कट रचला. अपहरण करून दोन कोटी मिळाल्यावर ते आपापसात वाटून घेतले जाणार होते. दरम्यान, या गुन्ह्यात सात आरोपींना अटक केली. यातील काही जण अल्पवयीन आहेत.

संशय बळावला, ठोकल्या बेड्याकैवल्यला शाळेत ने-आण वीरेन आणि त्याचा भाऊ करायचा. वीरेनच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत वीरेन सोबत संकेत मढवी असल्याची माहिती मिळाली.  पोलिसांनी वीरेन आणि संकेतचे मोबाइल ट्रेस केले असता वीरेन शहापूरच्या दिशेने गेला तर संकेतचे कनेक्शन द्वारलीला सापडले. संकेतला ताब्यात घेत चौकशी केली असता वीरेन याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला आणि त्याच्या साथीने अपहरणाचा कट रचल्याचे उघड झाले आणि वीरेनलादेखील बेड्या ठोकत पोलिसांनी कैवल्यची सुटका केली.

डोंबिवलीतील अपहरणाच्या घटना २५ जुलै २००९ : यश शहा या ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी अपहरण करून हत्या केली होती. त्याचा मृतदेह २७ जुलैला बदलापूरमधील एका गावात सापडला होता. २५ ऑक्टोबर २००९ : दहा वर्षीय प्रिन्स जैनचे अपहरण झाले होते. परंतु त्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले. २ फेब्रुवारी २०१० : डोंबिवलीतील तुषार सोनी या दहा वर्षीय मुलाची खंडणीसाठी अपहरण करून हत्या केली होती. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ३ फेब्रुवारीला आजदे गावात आढळला होता. ९ नोव्हेंबर २०२२ : रुद्रा झा (१२) चे दीड कोटीसाठी अपहरण झाले होते. पोलिसांनी ७२ तासांच्या तपासात त्याची सुटका करत ५ आरोपींना बेड्या ठोकल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी