शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

गृहनिर्माण मंत्र्यांचा ठाण्यातील ‘त्या’ ४० पोलीस कुटूंबीयांना दिलासा; तरीही टांगती तलवार

By जितेंद्र कालेकर | Updated: October 5, 2020 00:51 IST

वर्तकनगर येथील दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे महापालिकेनेही कारवाई न करण्याबाबतचा दिलासा दिला आहे. तरीही वर्तकनगर पोलिसांनी ही घरे रिक्त करण्याबाबत तगादा लावल्याने पोलीस कुटूंबीयांमध्ये तणावात आहेत.

ठळक मुद्दे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याची एक आठवडयाची मुदत४० कुटूूंबीय प्रचंड तणावात

ठाणे: तांत्रिकदृष्ट्या अती धोकादायकमध्ये गणल्या गेलेल्या वर्तकनगर येथील १४ आणि १६ या दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे महापालिकेनेही कारवाई न करण्याबाबतचा दिलासा दिला आहे. तरीही वर्तकनगर पोलिसांनी मात्र निवासस्थाने रिक्त करण्याबाबत पुनरुच्चार केल्याने येथील ४० कुटूूंबीय प्रचंड तणावात आहेत.ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीने म्हाडा वसाहतीमधील पोलीस निवासस्थाने असलेल्या या दोन इमारतींना धोकादायक इमारतीचे तांत्रिक परिक्षण अहवाल (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) तसेच स्थैर्यता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टीफिकेट) सादर करण्याची नोटीस चार महिन्यांपूर्वी बजावली होती. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत सी- २ बी (अर्थात रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे) या प्रवर्गात समाविष्ट केली. दरम्यान, ठामपाच्या पॅनलवरील एका वास्तुविशारदाकडून तांत्रिक परिक्षणही येथील रहिवाशांनी केले. मात्र, कोरोनामुळे दुरुस्तीची कामे अर्धवट राहिल्यामुळे स्थैर्यता प्रमाणपत्र मिळालेच नाही. त्यामुळे एक महिन्यापूर्वी दुसऱ्या वास्तुविशारदाकडून पदरमोड करुन रहिवाशांनी तांत्रिक परिक्षणही केले. दुरुस्तीही सुरु झाली. तोपर्यंत भिवंडीची दुर्घटना झाल्याने महापालिकेने (दुरुस्ती करुन राहण्यायोग्य असलेल्या) इमारतीला अतिधोकादायकचा फलक लावला. तसे पत्रही पोलीस प्रशासनाला दिले. त्याचआधारे वर्तकनगर पोलिसांनी ही घरे तातडीने रिक्त करण्याच्या नोटीसा बजावल्या. हीच कैफियत पोलीस कुटूंबीयांनी मांडल्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी यात मध्यस्थी केली. स्थैर्यता प्रमाणपत्र आणि किरकोळ दुरुस्ती करण्याच्या अटीवर कारवाई न करण्याचे ठामपाच्या सहायक आयुक्त पंडीत यांनी मान्यही केले. तरीही शनिवारी पुन्हा येथील पोलीस कुटूंबीयांना वर्तकनगर पोलिसांकडून घरे रिक्त करण्याचे फर्मान गेल्याने ऐन कोरोनासारख्या साथीच्या आजारात घरांचे स्थलांतर कसे करायचे? या तणावातच येथील कुटूंबीय आहेत. रविवारी पुन्हा या कुटूंबीयांनी आपली कैफियत मांडल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी चर्चेअंती घरे रिक्त करण्याच्या कारवाईला स्थगिती मिळविण्यात येईल, असे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी या कुटूंबीयांना दिले.* या कारणांसाठी रहिवाशांचा नकारइमारतीमध्ये एका अधिका-यासह आठ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. ठाण्यात डयूटीवरील कर्मचाऱ्यांना देऊ केलेली सिद्धी हॉल येथील पर्यायी वसाहतीची अवस्था या इमारतींपेक्षाही बिकट आहे. निवृत्त तसेच मृत पावलेल्या पोलीस कुटूंबीयांचा कोणताही विचार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे इमारत अतिधोकादायक नसून ती दुरुस्ती करुन राहण्यायोग्य असल्यामुळेच घरे रिक्त करण्याला रहिवाशांचा नकार आहे.

‘‘ इमारत क्रमांक १४ आणि १६ च्या रहिवाशांनी इमारतीचे स्थैर्यता प्रमाणपत्र दिल्यास त्यांच्यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही. परंतू, तांत्रिक परिक्षण अहवालात दर्शविल्याप्रमाणे इमारतीमध्ये दुरुस्ती करुन हे प्रमाणपत्र तातडीने देणे गरजेचे आहे. अन्यथा इमारत अतिधोकादायक यादीत समाविष्ट होऊ शकते.’’अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका...............................

‘‘ कोविडमुळे तांत्रिक परिक्षण (स्ट्रक्चरल आॅडीट रिपोर्ट) अहवालात दर्शविलेली इमारतीची दुरुस्ती झाली नव्हती. ती सध्या करण्यात येत आहे. लवकरच महापालिकेत स्थैर्यता प्रमाणपत्रही सादर केले जाणार आहे. ठाणे महापालिकेने स्थैर्यता प्रमाणपत्र देण्यासाठी आठवडयाची मुदत दिली आहे. त्यामुळे वर्तकनगर पोलिसांनीही कोविडसारख्या गंभीर परिस्थितीमध्ये घरे रिक्त करण्याची कारवाई थांबविणे आवश्यक आहे.’’प्रशांत सातपुते, शिवसेना विभागप्रमुख, वर्तकनगर, ठाणे (रहिवाशी इमारत क्रमांक १४)

 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका