शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

गृहनिर्माण मंत्र्यांचा ठाण्यातील ‘त्या’ ४० पोलीस कुटूंबीयांना दिलासा; तरीही टांगती तलवार

By जितेंद्र कालेकर | Updated: October 5, 2020 00:51 IST

वर्तकनगर येथील दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे महापालिकेनेही कारवाई न करण्याबाबतचा दिलासा दिला आहे. तरीही वर्तकनगर पोलिसांनी ही घरे रिक्त करण्याबाबत तगादा लावल्याने पोलीस कुटूंबीयांमध्ये तणावात आहेत.

ठळक मुद्दे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याची एक आठवडयाची मुदत४० कुटूूंबीय प्रचंड तणावात

ठाणे: तांत्रिकदृष्ट्या अती धोकादायकमध्ये गणल्या गेलेल्या वर्तकनगर येथील १४ आणि १६ या दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे महापालिकेनेही कारवाई न करण्याबाबतचा दिलासा दिला आहे. तरीही वर्तकनगर पोलिसांनी मात्र निवासस्थाने रिक्त करण्याबाबत पुनरुच्चार केल्याने येथील ४० कुटूूंबीय प्रचंड तणावात आहेत.ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीने म्हाडा वसाहतीमधील पोलीस निवासस्थाने असलेल्या या दोन इमारतींना धोकादायक इमारतीचे तांत्रिक परिक्षण अहवाल (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) तसेच स्थैर्यता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टीफिकेट) सादर करण्याची नोटीस चार महिन्यांपूर्वी बजावली होती. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत सी- २ बी (अर्थात रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे) या प्रवर्गात समाविष्ट केली. दरम्यान, ठामपाच्या पॅनलवरील एका वास्तुविशारदाकडून तांत्रिक परिक्षणही येथील रहिवाशांनी केले. मात्र, कोरोनामुळे दुरुस्तीची कामे अर्धवट राहिल्यामुळे स्थैर्यता प्रमाणपत्र मिळालेच नाही. त्यामुळे एक महिन्यापूर्वी दुसऱ्या वास्तुविशारदाकडून पदरमोड करुन रहिवाशांनी तांत्रिक परिक्षणही केले. दुरुस्तीही सुरु झाली. तोपर्यंत भिवंडीची दुर्घटना झाल्याने महापालिकेने (दुरुस्ती करुन राहण्यायोग्य असलेल्या) इमारतीला अतिधोकादायकचा फलक लावला. तसे पत्रही पोलीस प्रशासनाला दिले. त्याचआधारे वर्तकनगर पोलिसांनी ही घरे तातडीने रिक्त करण्याच्या नोटीसा बजावल्या. हीच कैफियत पोलीस कुटूंबीयांनी मांडल्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी यात मध्यस्थी केली. स्थैर्यता प्रमाणपत्र आणि किरकोळ दुरुस्ती करण्याच्या अटीवर कारवाई न करण्याचे ठामपाच्या सहायक आयुक्त पंडीत यांनी मान्यही केले. तरीही शनिवारी पुन्हा येथील पोलीस कुटूंबीयांना वर्तकनगर पोलिसांकडून घरे रिक्त करण्याचे फर्मान गेल्याने ऐन कोरोनासारख्या साथीच्या आजारात घरांचे स्थलांतर कसे करायचे? या तणावातच येथील कुटूंबीय आहेत. रविवारी पुन्हा या कुटूंबीयांनी आपली कैफियत मांडल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी चर्चेअंती घरे रिक्त करण्याच्या कारवाईला स्थगिती मिळविण्यात येईल, असे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी या कुटूंबीयांना दिले.* या कारणांसाठी रहिवाशांचा नकारइमारतीमध्ये एका अधिका-यासह आठ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. ठाण्यात डयूटीवरील कर्मचाऱ्यांना देऊ केलेली सिद्धी हॉल येथील पर्यायी वसाहतीची अवस्था या इमारतींपेक्षाही बिकट आहे. निवृत्त तसेच मृत पावलेल्या पोलीस कुटूंबीयांचा कोणताही विचार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे इमारत अतिधोकादायक नसून ती दुरुस्ती करुन राहण्यायोग्य असल्यामुळेच घरे रिक्त करण्याला रहिवाशांचा नकार आहे.

‘‘ इमारत क्रमांक १४ आणि १६ च्या रहिवाशांनी इमारतीचे स्थैर्यता प्रमाणपत्र दिल्यास त्यांच्यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही. परंतू, तांत्रिक परिक्षण अहवालात दर्शविल्याप्रमाणे इमारतीमध्ये दुरुस्ती करुन हे प्रमाणपत्र तातडीने देणे गरजेचे आहे. अन्यथा इमारत अतिधोकादायक यादीत समाविष्ट होऊ शकते.’’अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका...............................

‘‘ कोविडमुळे तांत्रिक परिक्षण (स्ट्रक्चरल आॅडीट रिपोर्ट) अहवालात दर्शविलेली इमारतीची दुरुस्ती झाली नव्हती. ती सध्या करण्यात येत आहे. लवकरच महापालिकेत स्थैर्यता प्रमाणपत्रही सादर केले जाणार आहे. ठाणे महापालिकेने स्थैर्यता प्रमाणपत्र देण्यासाठी आठवडयाची मुदत दिली आहे. त्यामुळे वर्तकनगर पोलिसांनीही कोविडसारख्या गंभीर परिस्थितीमध्ये घरे रिक्त करण्याची कारवाई थांबविणे आवश्यक आहे.’’प्रशांत सातपुते, शिवसेना विभागप्रमुख, वर्तकनगर, ठाणे (रहिवाशी इमारत क्रमांक १४)

 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका