शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात हाऊसिंग फेडरेशन करणार पर्यावरणपूरक सामूहिक अग्निहोत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 22:14 IST

ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केल्याची माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी दिली.

ठळक मुद्देदहा हजार ठाणेकर होणार सहभागीपर्यावरण संवर्धनासाठी प्रथमच आयोजनसाडेचार हजार रहिवाशांनी केली नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि विश्वफाऊंडेशनच्या वतीने ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. या अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या होमकुंडासह सर्व साहित्याचेही मोफत वाटप केले जाणार असल्याची माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी बुधवारी दिली.येत्या ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास उपवन तलावाच्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये हा अनोखा उपक्रम होणार आहे. याठिकाणी उपस्थित राहण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकापासून पोखरण रोड क्रमांक एक येथील कॅडबरी कंपनी आणि पोखरण रोड क्रमांक दोन येथील मारिया हॉल तसेच माजिवडा येथून ठाणे परिवहन सेवेची (टीएमटी) दुपारी ३.३० ते ५.३० या काळात बसची व्यवस्था केली आहे.सामूहिक अग्निहोत्र हा पर्यावरणासाठी पूरक असा होम असून तो अक्कलकोट शिवपुरी येथील गजानन महाराज यांनी सुरू केलेला आहे. तो सूर्योदय आणि सूर्यास्त अशा दोन वेळेलाच करणे अपेक्षित असतो. असा अग्निहोत्र घरी केल्यास त्यापासून सकारात्मक ऊर्जा तयार होते. विद्यार्थ्यांसाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. हाउसिंग फेडरेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्र मास शिवपुरी येथील डॉक्टर त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.सोसायट्यांसह विद्यार्थ्यांचाही सहभागया अग्निहोत्रासाठी वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर या भागातील अनेक गृहसंकुलांतील रहिवासी सहभाग घेणार आहेत. याच परिसरातील आर.जे. ठाकूर, थिराणी विद्यालय आणि ब्राह्मण विद्यालय या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीही आपला सहभाग नोंदविणार आहे. दहा हजार रहिवासी या अग्निहोत्रामध्ये सहभाग नोंदविण्याचे उद्दिष्ट असून त्यातील साडेचार हजार रहिवासी आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचेही राणे यांनी सांगितले. या अग्निहोत्रासाठी जोडप्याने एकत्र बसण्याची आवश्यकता नसून कोणतीही व्यक्ती बसू शकते. अग्निहोत्राने पवित्र आणि मंगल झालेल्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते. त्याचा उपयोग आपल्या परिसरातील पर्यावरणातील प्रदूषण कमी होऊन आॅक्सिजनमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे कार्बनडायॉक्साइडचे प्रमाण कमी होते. याला शास्त्रीय दृष्टिकोनातूनही मान्यता आहे. संपूर्ण जगात अनेक ठिकाणी असंख्य कुटुंबे अग्निहोत्राचे आचरण करून त्यापासून लाभ मिळवित असल्याचा दावाही राणे यांनी केला.

टॅग्स :thaneठाणेenvironmentपर्यावरणSocialसामाजिक