शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पालकमंत्र्यांच्या घरात, तर आयुक्तांच्या दारात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 00:48 IST

सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते.

ठाणे : ठाण्यात मान्सूपूर्व पहिल्याच पावसाने पालिकेच्या कामांची पोलखोल केली. सोमवारी अवघा एक तास पडलेल्या पावसामुळे पालकमंत्र्यांच्या निवास्थानाच्या तळघरात पाणी शिरले होते, तर आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरही पाणीच पाणी झाले होते. शहराच्या इतर भागातही ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने नाल्यातील कचरा बाहेर फेकला गेल्याचे आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूककोंडीचाही सामना करावा लागला.

सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. रात्री ९ च्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. फक्त एक तास पाऊस झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. शहरातील जे सखल भाग आहेत, त्या ठिकाणी पाणी साचलेच, मात्र याचा विशेष फटका पालिका आयुक्तांचा बंगला आणि पालकमंत्र्यांनादेखील बसला. हिरानंदानी इस्टेस्टकडे जाणाऱ्या पातलीपाडा येथे जाणाºया रस्त्यावर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा बंगला आहे. त्याच्या समोरच्या रस्त्यावरच मोठ्याप्रमाणात पाणी साचले. त्यातही पातलीपाडा येथील सेवा रस्त्याचे काम केले असले तरी त्याचा स्लोप हा पुढे हिरानंदानी इस्टेटकडे जाणाºया रस्त्याला दिल्याने आणि सेवा रस्ता आणि मुख्य रस्त्याच्यामध्ये असलेल्या फुटपाथखालील गटाराचे तोंड बंद असल्याने, तसेच काही ठिकाणी मुख्य व सेवा रस्ताच एक झाल्याने पावसाचे पाणी आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर जमा झालेहोते. दुसरीकडे मान्सूनपूर्व कामांवर जातीने लक्ष देणाºया पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नितिन कंपनी येथील बंगल्याच्या बेसमेंटमध्येदेखील पाणी शिरल्याने ते बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत जेटिंगची मशिन आणि पंप लावले होते.अनेक घरांत शिरले पाणी : एरव्ही मोठा पाऊस झाला की शहरातील सखल भागातही पाणी प्रत्येक वर्षी साचत असले तरी सोमवारी एका तासाच्या पावसानेच सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले. यामध्ये वंदना सिनेमा, लोकमान्यनगर, शिवाईनगर, वर्तकनगर भागात नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावर पाणी साचले होते. रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पडझडदेखील झाली असून सिद्धार्थनगर येथे भिंत कोसळल्याची घटना घडली. तर कॅडबरीच्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ या ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. विशेष म्हणजे या पावसाने घोडबंदर येथील आर मॉल येथे हायवेवर पाणी साचले होते.वीजपुरवठा झाला खंडित : सोमवारच्या एका तासाच्या पावसामुळे नागरिकांना केवळ नालेसफाईचा फटका बसला नसून अनेक ठिकाणी या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. बाजार पेठ, घोडबंदर रोड, मल्हार सिनेमा परिसर, कळवा, खारेगाव आणि ठाण्यातील काही भागात रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी सकाळीदेखील शहरातील काही भागात वीज गुल होती. पावसाळ्यापूर्वी विजेच्या वाहिन्या टाकण्याची कामे पूर्ण करून त्यानंतर या कामासाठी खड्डा खोदू नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. तर काही कामांना मुदतवाढदेखील दिली होती. त्यामुळेच कदाचित ठाणेकरांना याचा फटका बसला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.सर्वत्र दाणादाणच्पहिल्याच पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी दाणादाण उडाली. पावसामुळे बदलापूरमध्ये तब्बल ८ तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. मुरबाड आणि शेणवा येथे काही घरांवरील पत्रे वादळीवाºयाने उडून गेले. याशिवाय काही घरांवरील कौलांचे नुकसान झाले.च्कल्याणमध्ये ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याने गटारे तुंबली. पालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे केली होती. परंतू नाल्यांमधून काढलेला कचरा तिथेच टाकल्याने तो पावसासोबत पुन्हा नाल्यांमध्ये वाहून गेला. त्यामुळे नाले तुंबले. याशिवाय कल्याणमध्ये काही भागात घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसEknath Shindeएकनाथ शिंदे