शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

कडाक्याच्या उन्हात ग्रामीण भागात महिलांची वाळवणासाठी लगबग

By admin | Updated: April 11, 2017 02:25 IST

मार्च ते मे या कडक उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागातील महिलांची वर्षभराच्या वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे. गावागावांत घरासमोरील अंगणांत एखादी

- उमेश जाधव,  टिटवाळा

मार्च ते मे या कडक उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागातील महिलांची वर्षभराच्या वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे. गावागावांत घरासमोरील अंगणांत एखादी रांगोळी काढल्याप्रमाणे वाळवणाचे पदार्थ ठेवलेले आढळतात.उन्हाळा सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातील महिलांना वाळवणाचे वेध लागतात. उडीद व मुगाचे पापड, तांदूळ व गव्हाच्या कुरडया, पापड्या, खारवड्या, सांडगे, चिकवड्या, कोंडवड्या, मिरगुंड यांच्या वाळवणाने सारे अंगण भरून गेलेले असते. घरातील कॉट, टेबल, खुर्च्या अंगणांत मांडून त्यावर वाळवणाचे पदार्थ पसरलेले असतात. याचबरोबर वर्षभरासाठी लागणारे मसाले, कडधान्य, लाल मिरच्या, हळकुंड, जिरे, राजिणे, कोकम, चिंच, तांदूळ, फाटी(सरपण)आदी जीवनावश्यक वस्तूंना कडकडीत उन्हं लावून ती कीड लागू नये, याकरिता जपून ठेवली जातात. त्यांची यासाठीधावपळ सुरू आहे. घरासमोरील अंगणात उन्हातान्हाची तमा न बाळगतामहिला, मुली वाळवण घालताना आणि त्याची राखण करताना दिसतात. काही ठिकाणी आजूबाजूच्या दोनचार घरांतील महिला एकत्र येऊन वाळवण करतात. ग्रामीण भागालगत असलेल्या कल्याण, डोंबिवली, ठाणे यासारख्या शहरांत वाळवणाकरिता जागा उपलब्ध नाही आणि महिलांकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अनेक महिला तयार पापड, कुरडया, तिखट, हळद, कोकम, चिंच बाजारातून विकत आणतात. या शहरांमधील अनेक दुकानांमध्ये हे जिन्नस विक्रीकरिता ठेवले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील काही महिला हातखर्चाला पैसे हवे म्हणून कुटुंबाच्या गरजेपेक्षा जास्त वाळवण करतात. त्याची स्थानिक व्यापारी, महिला बचत गटांना विक्री करतात. हीच घरगुती उत्पादने आकर्षक पॅकिंगद्वारे शहरांमधील दुकाने, मॉलमध्ये चढ्या किमतीत विकली जातात.वयोवृद्ध महिलांच्या मार्गदर्शनाखाली वाळवण केले जाते. सुक्या मासळीचे वाळवणही याच काळात सुरू असते. मांदेली, ढोमेली, वाकटी, जवळा, सुकट, बोंबील, माकली अशी विविध प्रकारची सुकी मच्छी कोळीवाडे व अन्य काही भागांत वाळवताना दिसत आहेत. पावसाळ्यात जेव्हा समुद्रातील मासेमारी बंद असते, तेव्हा हीच सुकी मासळी जेवणाची लज्जत वाढवते, असे मत्स्यप्रेमींचे म्हणणे आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील शेतीवर पोट असलेली कुटुंबे त्याच कामात गढून जातात. अशावेळी उन्हाळ्यात केलेले वाळवण शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे दोनवेळा पोट भरायला उपयोगी पडते.सध्या सुरू असलेले वाळवण आम्हाला वर्षभर पुरवावे लागते. पावसाळ्यात याचा खूप वापर होतो. या सर्व खाद्यपदार्थांना व्यवस्थित उन्हं दिली नाही, तर ती खराब होतात. त्यानंतर, त्यांची साठवण हेही तेवढेच जोखमीचे काम असते.-कुसुम जाधव व ऊर्मिला जाधव, गृहिणी, फळेगाव