शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या उन्हात ग्रामीण भागात महिलांची वाळवणासाठी लगबग

By admin | Updated: April 11, 2017 02:25 IST

मार्च ते मे या कडक उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागातील महिलांची वर्षभराच्या वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे. गावागावांत घरासमोरील अंगणांत एखादी

- उमेश जाधव,  टिटवाळा

मार्च ते मे या कडक उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागातील महिलांची वर्षभराच्या वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे. गावागावांत घरासमोरील अंगणांत एखादी रांगोळी काढल्याप्रमाणे वाळवणाचे पदार्थ ठेवलेले आढळतात.उन्हाळा सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातील महिलांना वाळवणाचे वेध लागतात. उडीद व मुगाचे पापड, तांदूळ व गव्हाच्या कुरडया, पापड्या, खारवड्या, सांडगे, चिकवड्या, कोंडवड्या, मिरगुंड यांच्या वाळवणाने सारे अंगण भरून गेलेले असते. घरातील कॉट, टेबल, खुर्च्या अंगणांत मांडून त्यावर वाळवणाचे पदार्थ पसरलेले असतात. याचबरोबर वर्षभरासाठी लागणारे मसाले, कडधान्य, लाल मिरच्या, हळकुंड, जिरे, राजिणे, कोकम, चिंच, तांदूळ, फाटी(सरपण)आदी जीवनावश्यक वस्तूंना कडकडीत उन्हं लावून ती कीड लागू नये, याकरिता जपून ठेवली जातात. त्यांची यासाठीधावपळ सुरू आहे. घरासमोरील अंगणात उन्हातान्हाची तमा न बाळगतामहिला, मुली वाळवण घालताना आणि त्याची राखण करताना दिसतात. काही ठिकाणी आजूबाजूच्या दोनचार घरांतील महिला एकत्र येऊन वाळवण करतात. ग्रामीण भागालगत असलेल्या कल्याण, डोंबिवली, ठाणे यासारख्या शहरांत वाळवणाकरिता जागा उपलब्ध नाही आणि महिलांकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अनेक महिला तयार पापड, कुरडया, तिखट, हळद, कोकम, चिंच बाजारातून विकत आणतात. या शहरांमधील अनेक दुकानांमध्ये हे जिन्नस विक्रीकरिता ठेवले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील काही महिला हातखर्चाला पैसे हवे म्हणून कुटुंबाच्या गरजेपेक्षा जास्त वाळवण करतात. त्याची स्थानिक व्यापारी, महिला बचत गटांना विक्री करतात. हीच घरगुती उत्पादने आकर्षक पॅकिंगद्वारे शहरांमधील दुकाने, मॉलमध्ये चढ्या किमतीत विकली जातात.वयोवृद्ध महिलांच्या मार्गदर्शनाखाली वाळवण केले जाते. सुक्या मासळीचे वाळवणही याच काळात सुरू असते. मांदेली, ढोमेली, वाकटी, जवळा, सुकट, बोंबील, माकली अशी विविध प्रकारची सुकी मच्छी कोळीवाडे व अन्य काही भागांत वाळवताना दिसत आहेत. पावसाळ्यात जेव्हा समुद्रातील मासेमारी बंद असते, तेव्हा हीच सुकी मासळी जेवणाची लज्जत वाढवते, असे मत्स्यप्रेमींचे म्हणणे आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील शेतीवर पोट असलेली कुटुंबे त्याच कामात गढून जातात. अशावेळी उन्हाळ्यात केलेले वाळवण शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे दोनवेळा पोट भरायला उपयोगी पडते.सध्या सुरू असलेले वाळवण आम्हाला वर्षभर पुरवावे लागते. पावसाळ्यात याचा खूप वापर होतो. या सर्व खाद्यपदार्थांना व्यवस्थित उन्हं दिली नाही, तर ती खराब होतात. त्यानंतर, त्यांची साठवण हेही तेवढेच जोखमीचे काम असते.-कुसुम जाधव व ऊर्मिला जाधव, गृहिणी, फळेगाव