शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या उन्हात ग्रामीण भागात महिलांची वाळवणासाठी लगबग

By admin | Updated: April 11, 2017 02:25 IST

मार्च ते मे या कडक उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागातील महिलांची वर्षभराच्या वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे. गावागावांत घरासमोरील अंगणांत एखादी

- उमेश जाधव,  टिटवाळा

मार्च ते मे या कडक उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागातील महिलांची वर्षभराच्या वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे. गावागावांत घरासमोरील अंगणांत एखादी रांगोळी काढल्याप्रमाणे वाळवणाचे पदार्थ ठेवलेले आढळतात.उन्हाळा सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातील महिलांना वाळवणाचे वेध लागतात. उडीद व मुगाचे पापड, तांदूळ व गव्हाच्या कुरडया, पापड्या, खारवड्या, सांडगे, चिकवड्या, कोंडवड्या, मिरगुंड यांच्या वाळवणाने सारे अंगण भरून गेलेले असते. घरातील कॉट, टेबल, खुर्च्या अंगणांत मांडून त्यावर वाळवणाचे पदार्थ पसरलेले असतात. याचबरोबर वर्षभरासाठी लागणारे मसाले, कडधान्य, लाल मिरच्या, हळकुंड, जिरे, राजिणे, कोकम, चिंच, तांदूळ, फाटी(सरपण)आदी जीवनावश्यक वस्तूंना कडकडीत उन्हं लावून ती कीड लागू नये, याकरिता जपून ठेवली जातात. त्यांची यासाठीधावपळ सुरू आहे. घरासमोरील अंगणात उन्हातान्हाची तमा न बाळगतामहिला, मुली वाळवण घालताना आणि त्याची राखण करताना दिसतात. काही ठिकाणी आजूबाजूच्या दोनचार घरांतील महिला एकत्र येऊन वाळवण करतात. ग्रामीण भागालगत असलेल्या कल्याण, डोंबिवली, ठाणे यासारख्या शहरांत वाळवणाकरिता जागा उपलब्ध नाही आणि महिलांकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अनेक महिला तयार पापड, कुरडया, तिखट, हळद, कोकम, चिंच बाजारातून विकत आणतात. या शहरांमधील अनेक दुकानांमध्ये हे जिन्नस विक्रीकरिता ठेवले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील काही महिला हातखर्चाला पैसे हवे म्हणून कुटुंबाच्या गरजेपेक्षा जास्त वाळवण करतात. त्याची स्थानिक व्यापारी, महिला बचत गटांना विक्री करतात. हीच घरगुती उत्पादने आकर्षक पॅकिंगद्वारे शहरांमधील दुकाने, मॉलमध्ये चढ्या किमतीत विकली जातात.वयोवृद्ध महिलांच्या मार्गदर्शनाखाली वाळवण केले जाते. सुक्या मासळीचे वाळवणही याच काळात सुरू असते. मांदेली, ढोमेली, वाकटी, जवळा, सुकट, बोंबील, माकली अशी विविध प्रकारची सुकी मच्छी कोळीवाडे व अन्य काही भागांत वाळवताना दिसत आहेत. पावसाळ्यात जेव्हा समुद्रातील मासेमारी बंद असते, तेव्हा हीच सुकी मासळी जेवणाची लज्जत वाढवते, असे मत्स्यप्रेमींचे म्हणणे आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील शेतीवर पोट असलेली कुटुंबे त्याच कामात गढून जातात. अशावेळी उन्हाळ्यात केलेले वाळवण शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे दोनवेळा पोट भरायला उपयोगी पडते.सध्या सुरू असलेले वाळवण आम्हाला वर्षभर पुरवावे लागते. पावसाळ्यात याचा खूप वापर होतो. या सर्व खाद्यपदार्थांना व्यवस्थित उन्हं दिली नाही, तर ती खराब होतात. त्यानंतर, त्यांची साठवण हेही तेवढेच जोखमीचे काम असते.-कुसुम जाधव व ऊर्मिला जाधव, गृहिणी, फळेगाव