शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

तान्हुलीसह बाळंतिणीला भरपावसात केले बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:26 IST

भाईंदर येथील एका खासगी जागेत पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या रखवालदार कुटुंबास सोमवारी सकाळी साडेसात वाजता भरपावसात महापालिका प्रशासनाने बेघर केले.

मीरा रोड : भाईंदर येथील एका खासगी जागेत पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या रखवालदार कुटुंबास सोमवारी सकाळी साडेसात वाजता भरपावसात महापालिका प्रशासनाने बेघर केले. यात नुकतीच बाळंत झालेली महिला आणि तिच्या सात दिवसांच्या तान्हुलीलाही निर्दयीपणाने बेघर करत पालिकेने अमानुषतेचे दर्शन घडवले. या मायलेकीसह वृध्दांनादेखील पोलीस बंदोबस्तात बाहेर खेचून झोपडे पाडण्यात आले.भार्इंदर उड्डाणपुलाखाली पुष्पलीला इमारतीलगत मुर्धा येथील बाळकृष्ण म्हात्रे कुटुंबियांची पुर्वीपासूनची शेतजमीन असून शेतजमीनीच्या संरक्षणासाठी त्यांनी श्रीराम पवार यांना सुमारे २० वर्षांपासून रखवालदार म्हणून ठेवले आहे.पवार हे आपली पत्नी जमना, भार्इंदर सेकंडरी शाळेत १० वीत शिकणारी मुलगी पुजा व ९ वीत शिकणारी आरती तसेच ९ वर्षांचा मुलगा प्रसाद यांच्यासह राहतात. त्यांचा मेव्हणा गिरमाजी सुर्यवंशीदेखील पत्नी पुजा, ज्येष्ठ नागरिक असलेले वडील भुजंगराव व आईसोबत गेल्या काही वर्षांपासून एकाच पत्र्याच्या झोपडीत राहतात.सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास भाजप आमदार नरेंद्र मेहता, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, नगरसेविका वर्षा भानुशाली हे पालिका प्रभाग अधिकारी सुनील यादव यांच्यासह पालिका कर्मचारी व मोठा पोलीस फाटा घेऊन आले. आधी पदपथावरील काही झोपड्या हटवण्यात आल्या. त्यानंतर खाजगी जागेतील पवार - सुर्यवंशी कुटुंबियांचे पत्र्याचे झोपडे घरातील लोकांना बळजबरी हुसकावून पाडण्यात आले. बाहेर पाऊस पडतोय, घरात ७ दिवसांचे बाळ व बाळंतीण आहे. शाळेत शिकणाºया मुली व वृध्द आहेत, अशा विनवण्या त्यांनी केल्या. घरात सामान आहे. त्यामुळे एक दिवसाची मुदत देण्यास सांगितले. परंतु आमदार, नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. घरात गॅसवर बाळंतिणीसाठी पेय उकळत ठेवले होते. तेदेखील गॅस बंद करुन बाहेर काढले.भरपावसात बाळ आणि बाळंतीणीला पाहून याच भागात राहणारे ६५ वर्षांचे रहिवासी राजेंद्र शाह यांचे काळीज हेलावले. त्यांना राहवले नाही आणि त्यांनी बाळ - बाळंतिणीला आपल्या सदनिकेत राहण्याची तसेच जेवण आदीची व्यवस्था करुन दिली. शाह यांनी महापालिकेची ही कारवाई अमानविय असल्याचे म्हटले.दुपारी शाळेतून आलेल्या पुजा आणि आरती यांना आपले उध्वस्त घर पाहुन रडुच कोसळले. आजही या कुटुंबियांचे सामान उघड्यावर आहे. बाळंतीण झालेल्या पुजा आपल्या ७ दिवसांच्या तान्हुलीला घेऊन डोक्यावर छप्पर मिळणार का, या विवंचनेत आहेत. वृध्द सुर्यवंशी दाम्पत्य रस्त्याच्या कडेला भरपावसात रात्र काढत आहेत.वास्तविक पावसाळ्यात राहती घरं न तोडण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. पालिका अधिकारी शासनाच्या या आदेशाचा हवाला देत शहरात राजरोस चालणारी बेकायदा बांधकामे पाडत नाहीत. पण येथे मात्र भरपावसात, तेही चक्कसकाळी साडेसात वाजता मोठ्या ताफ्यासह जाऊन पालिकेने कारवाई केली.>संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीआ. मेहतांनी मात्र, आपला नवरात्री उत्सव आहे म्हणून नव्हे तर रहिवाशांच्या मागणीवरुन पालिकेने तोडक कारवाई केली आहे. अनधिकृत घर, झोपडे असेल तर कारवाई होईल, असे म्हटले आहे. पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी या प्रकरणाची चौकशी अतिरीक्त आयुक्तांना करण्यास सांगितल्याचे म्हटले आहे.खाजगी जागेत जुने झोपडे असूनही भरपावसात महापालिका प्रशासन व आमदार, नगरसेवकांनी कारवाई करायला लावली. यात बाळंतीणीसह ७ दिवसांच्या नवजात बाळास तसेच शाळेत शिकणाºया मुलींनादेखील निर्दयीपणे बेघर करणे हा अमानुषपणा असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक, झारा मर्चंट, ममता अधिकारी, शोभा महाजन, राजश्री वेलदर, भावना तिवारी यांच्यासह माधवी गायकवाड, शिबानी जोशी, भारती त्रिवेदी आदिंनी केला आहे. त्यांनी या सर्वांवर कठोर कारवाईची मागणी करतानाच बाळ - बाळंतीण व विद्यार्थींनीसह पालिका आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण आयुक्त उपलब्ध नव्हते.