शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

"खारफुटीवर भराव टाकून एका दिवसात जमीन गायब", गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 15:31 IST

Jitendra Awhad News: महापालिका हद्दीत अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा गाजत असतांना आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमुळे आणखी खबळळ उडाली आहे.

ठाणे - महापालिका हद्दीत अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा गाजत असतांना आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमुळे आणखी खबळळ उडाली आहे. कळव्यातील खारभुमी वरील अनाधिकृत बांधकामांवर त्वरीत कारवाई करा, आधी ११० एकर आता कागदोपत्री ७२ एकर नंतर उरेल ७ एकर असे त्यांचे ट्विट आहे. तसेच एका दिवसात येथील खारफुटी भराव टाकून कशी गायब करण्यात आली याचे फोटे देखील त्यांनी टाकल्याने या अनाधिकृत बांधकामांना आर्शिवाद कोणाचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

राज्यात जेव्हा कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यावेळेस कळवा, खारेगाव भागातील या ७२ एकर जागेवर सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता. तसेच याच ठिकाणी इनडोअर स्टेडीअम, जिल्हा परिषदेचे मुख्यालय देखील  उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून बोर्डही लावण्यात आला. परंतु त्यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर या ठिकाणी बीकेसीच्या धर्तीवर कॅम्पस उभारण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. परंतु त्याला देखील मुर्त स्वरुप आलेले नाही. तर येथील काही जागेवर निवडणुक विभागाचे कार्यालय देखील सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची चाचपणी देखील झालेली आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार तसे असले तरी देखील त्याचे काम अद्याप तेथे सुरु करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे आता येथे रातोरात भराव टाकून खारफुटी कोणी उध्वस्त केली असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आव्हाड यांनी टि¦ट करुन कारवाईची मागणी केली आहे. नाही तर भविष्यात येथे केवळ ७ एकर जागा शिल्लक राहिल असा इशाराही त्यांनी दिला. याठिकाणी मागील दोन वर्षापासून मैदानाच्या चौफेर बाजूने अनाधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. परंतु त्यावर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित करीत महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यातून काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. परंतु त्यामुळे हळू हळू हे मैदानच आता गिळंकृत केले जात आहे. त्यामुळे किमान आजूबाजूच्या अनाधिकृत बांधकामांवर तरी कारवाई व्हावी अशी इच्छा आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

भराव कोणाचा आहे, हे माहित नाही. हे सरकार कडून केले जात असल्याचे सांगितले गेले आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी खुप मोठी जागा ही सरकारी आहे, जी लपवली जात आहे. त्याठिकाणी मागील दोन वर्षात पक्या चाळी बांधण्यात आलेल्या आहेत. किमान त्या चाळी तरी पाडा, अनेक वेळा महसुल अधिका:यांना सांगून देखील त्यावर काहीच कारवाई होत नाही. (जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माणमंत्री )

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे