शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना हवीय मतदानानंतर सुटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 06:42 IST

मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतदान झाल्यानंतरही रात्री सुमारे २ वाजेपर्यंत निवडणूक कामात गुंतून राहणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुस-या दिवशी सुटी देण्यात यावी,

ठाणे : मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतदान झाल्यानंतरही रात्री सुमारे २ वाजेपर्यंत निवडणूक कामात गुंतून राहणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुस-या दिवशी सुटी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी ठाण्यासह पालघर, रायगड आदी कोकणातील जिल्ह्यांमधील शिक्षकांनी केली आहे. संबंधित माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिका-यांना याबाबत लेखी निवेदनाद्वारे साकडे घातले असल्याची माहिती ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली.लोकसभा निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याआधीच्या दिवसापासूनच शिक्षक व शिक्षकेतर शालेय कर्मचाºयांना निवडणूक कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी लागते. मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना दिलेल्या मतदानकेंद्राचा ताबा घ्यावा लागतो. दिलेले साहित्य जबाबदारीने सांभाळत साहित्याजवळच झोपावे लागते. ही जोखमीची जबाबदारी संबंधित शिक्षक, कर्मचाºयांना दुसºया दिवसाच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत किंवा साहित्य निवडणूक आयोगाकडे जमा होईपर्यंत पार पाडावी लागते. त्यानंतर, घरी येण्यास बहुतांश शिक्षकांना ३० एप्रिलची पहाट उजाडणार आहे. त्यामुळे सतत दोन दिवस कामाचा ताण घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना ३० एप्रिल रोजी सुटी देणे क्रमप्राप्त होईल, याची शिक्षणाधिकाºयांना निवेदनाद्वारे करून दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींना निवडणुकीच्या कामासाठी, महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदानकेंद्रांवरील कामासाठी मोठ्या प्रमाणात नेमले आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा हजार ७१५ मतदानकेंद्रांवर सुमारे ४७ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे निवडणूक यंत्रणेसाठी कामाला लागले आहेत. माध्यमिक, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचा मोठ्या समावेश आहे. मतदानकेंद्रांवर दोन दिवस तणावाखाली असणाºया शिक्षकांनी सुटीची मागणी लावून धरलीआहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे