शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:58 IST

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्या ऐवजी सरसकट अवजड वाहनांना बंदी केल्याने त्याचा प्रचंड ताण घोडबंदर मार्ग व मुंबई - अहमदाबाद महामार्गावर येऊन नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्या ऐवजी सरसकट अवजड वाहनांना बंदी केल्याने त्याचा प्रचंड ताण घोडबंदर मार्ग व मुंबई - अहमदाबाद महामार्गावर येऊन नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तांनी ह्या पूर्ण अवजड वाहन बंदी बाबत नाराजी व्यक्त करत परखड भूमिका घेतल्या नंतर आता ठाणे पोलीस आयुक्तालयाने अवजड वाहन बंदीच्या वेळेत बदल केला आहे. शिवाय ठाण्याच्या बंदी नुसार मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने देखील अवजड वाहनांच्या बंदी बाबत अधिसूचना जारी केली आहे. 

घोडबंदर मार्गावरून मुख्यत्वे परिसरातील अनेक औद्योगिक वसाहती, जेएनपीटी बंदर आदी ठिकाणी माल - इंधन वाहू अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. ठाण्यातील वाहतूक कोंडी वरून राजकारण तापले आहे. त्यातूनच ठाणे पोलीस आयुक्तालयाने शहरात चक्क सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली. 

ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गवरील गायमुख येथे अवजड वाहने अडवून ठेवल्याने घोडबंदर मार्ग पासून मुंबई - अहमदाबाद महामार्ग देखील जाम झाला. तब्बल १५ किमी अंतराचा जाम लागला. त्यात अवजडच नव्हे तर लहान व प्रवासी बस आदी वाहने देखील अडकून पडली. लोकांचे अतोनात हाल झाले. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी याची गंभीर दखल घेत अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत प्रवेश बंद बद्दल ठाणे पोलिसां कडे नाराजी व्यक्त केली. कारण इतक्या मोठ्या संख्येने मालवाहू वाहने असताना तब्बल १८ तास प्रवेश बंद करणे नवीन अडचणी निर्माण करणारे ठरले. त्या नंतर ठाणे पोलिसांनी वेळेत बदल करत आता सकाळी ६ ते ११ आणि दुपारी ३ ते रात्री ११ ह्या वेळेत अवजड वाहनांना २ ऑक्टोबर पर्यंत बंदी जारी केली आहे. 

ठाणे पोलिसांच्या अवजड वाहन बंदी नुसार आता मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने देखील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरात बाजूकडून ठाणे, भिवंडी शहर, कल्याण शहर दिशेकडे जाणा-या तसेच मुंबई व मिराभाईंदर शहरातून ठाणे बाजूस जाणा-या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना प्रवेश बंदी मनाई बाबत अधिसूचना जारी केली आहे. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पार्किंग करण्यास मनाई केली आहे. 

२० सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत ही अवजड वाहन बंदी सकाळी ६ ते १० पर्यंत व सायंकाळी ५ पासून ते रात्रौ १० वाजे पर्यंत असणार आहे. 

प्रवेश बंद- १) राष्ट्रीय महामार्ग क्र ४८- गुजरात बाजूकडून येणा-या सर्व अवजड वाहनांना खानिवडे टोल प्लाजा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

प्रवेश बंद- २) राष्ट्रीय महामार्ग क्र ४८- पालघर- विरार बाजूकडून येणा-या सर्व अवजड वाहनांना शिरसाट फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

प्रवेश बंद - ३) राष्ट्रीय महामार्ग क्र ४८- पालघर- वसई बाजूकडून येणा-या सर्व अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

प्रवेश बंद- ४) पश्चिम दृतगतीमार्ग मुंबई व काशिमीरा बाजूकडून घोडबंदर रोड, ठाणे करीता जाण्या-या सर्व अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेल जवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेhighwayमहामार्ग